शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते की गटारे, खड्डे चुकविण्याची कसरत

By admin | Updated: August 5, 2016 23:59 IST

मागील महिन्याभरापासून धुवांधार कोसळत असलेल्या पावसाने शहराची दुरवस्था केली आहे.

पावसाने वाहून गेली खडी : डागडुजी कागदावरचअमरावती : मागील महिन्याभरापासून धुवांधार कोसळत असलेल्या पावसाने शहराची दुरवस्था केली आहे. खड्डे बुजविण्यासाठी वापरलेली खडी व मुरूम अस्ताव्यस्त झाल्याने खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत. अंतर्गत रस्त्यांची तर अक्षरश:चाळणी झाली आहे. पावसाचे पाणी गटारातून कमी आणि रस्त्यांवरुन अधिक वाहात असल्याने रस्ते की गटारे, असा प्रश्न निर्माण होतो.शहरातील झोपडपट्टी, मुस्लिमबहुल परिसरातील गटारे तुंबल्याने दुर्गंधीयुक्त पाण्याची भर पडली आहे. याच घाण पाण्यातून वाट काढताना खड्डे चुकविण्याची कसरत वाहनचालकांना करावी लागत आहे. जिल्ह्यात यंदा जून-जुलैमध्ये चांगला पाऊस झाला. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर कायम आहे. या पावसाने रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. नागरिकांची ओरड झाल्यानंतर महापालिकेने काही रस्त्यांच्या डागडुजीची कामे हाती घेतली. मात्र, डागडुजीच्या नावावर खड्डयांमध्ये केवळ खडी आणि बारिक वाळू टाकल्याने ते खड्डे पावसाने पुन्हा जैसे थे झाले आहेत. महापालिकेने बुजविलेले खड्डे अवघ्या दोन दिवसांत उघडे पडले. दोन दिवसांपासून पाऊस कोसळत असल्याने शहराची दुरवस्था प्रकर्षाने दिसू लागली आहे. दररोज घडताहेत अपघात अमरावती : बेलपुरा, समाधाननगर, अंबानाल्यावरचा भाग, स्मशानभूमी परिसरातील रस्त्यावरचे खड्डे तर अपघाताचे निमंत्रण देणारे ठरले आहेत. खापर्डे बगिचातील रस्त्यांची दुरवस्था एक प्रतिनिधीक ज्वलंत उदाहरण आहे. मातीमिश्रित खड्ड्यांमुळे या भागात रोज एखादा तरी छोटासा अपघात नित्याची बाब बनली आहे. मालवीय चौकात तर अक्षरश: तळे साचते. या भागात रेल्वेच्या कुंपणभिंतीचे काम सुरू असल्याने रस्त्याची गटारगंगा झाली आहे. शहराच्या विविध भागात पावसाच्या पाण्यासमवेत येणारा गाळ नंतर रस्त्यावर पसरल्याने त्याचा घाण वास सहन करण्यापलिकडे नागरिकांच्या हाती काही उरत नाही. कचराकुंड्यांमधील कचरा हलविला गेल्या नसल्याने पावसाने तो ओला होऊन त्याचीही दुर्गंधी शहरात पसरते. पाऊस आणखी काही दिवस बरसत राहिला तर शहराची दैनावस्था अधिक प्रकर्षाने उघड होण्याची चिन्हे आहेत. ही तर नित्याचीच बाब ४दरवर्षी पावसाळ्यात शहराची दैनावस्था होते. पावसाळ्यापूर्वी कामे कागदावर केली जात असल्याने नाले ओव्हरफ्लो होऊन त्यातील पाणी नागरिकांच्या घरात शिरणे, ही नित्याचीच बाब आहे. यशोदानगर, महादेवखोरी या शिवाय मुस्लिमबहुल परिसरात रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहणे, ही देखील नवी बाब नाही. पार्वतीनगर, महादेवनगर, अकोली रोड, छाया कॉलोनी याही परिसरात नाल्याचे पाणी घरात शिरल्याचे प्रसंग ताजे आहेत. त्याचप्रमाणे रस्त्यातील खड्डे अमरावतीकरांच्या पाचवीलाच पुजले आहेत.