शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

रस्ते की गटारे, खड्डे चुकविण्याची कसरत

By admin | Updated: August 5, 2016 23:59 IST

मागील महिन्याभरापासून धुवांधार कोसळत असलेल्या पावसाने शहराची दुरवस्था केली आहे.

पावसाने वाहून गेली खडी : डागडुजी कागदावरचअमरावती : मागील महिन्याभरापासून धुवांधार कोसळत असलेल्या पावसाने शहराची दुरवस्था केली आहे. खड्डे बुजविण्यासाठी वापरलेली खडी व मुरूम अस्ताव्यस्त झाल्याने खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत. अंतर्गत रस्त्यांची तर अक्षरश:चाळणी झाली आहे. पावसाचे पाणी गटारातून कमी आणि रस्त्यांवरुन अधिक वाहात असल्याने रस्ते की गटारे, असा प्रश्न निर्माण होतो.शहरातील झोपडपट्टी, मुस्लिमबहुल परिसरातील गटारे तुंबल्याने दुर्गंधीयुक्त पाण्याची भर पडली आहे. याच घाण पाण्यातून वाट काढताना खड्डे चुकविण्याची कसरत वाहनचालकांना करावी लागत आहे. जिल्ह्यात यंदा जून-जुलैमध्ये चांगला पाऊस झाला. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर कायम आहे. या पावसाने रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. नागरिकांची ओरड झाल्यानंतर महापालिकेने काही रस्त्यांच्या डागडुजीची कामे हाती घेतली. मात्र, डागडुजीच्या नावावर खड्डयांमध्ये केवळ खडी आणि बारिक वाळू टाकल्याने ते खड्डे पावसाने पुन्हा जैसे थे झाले आहेत. महापालिकेने बुजविलेले खड्डे अवघ्या दोन दिवसांत उघडे पडले. दोन दिवसांपासून पाऊस कोसळत असल्याने शहराची दुरवस्था प्रकर्षाने दिसू लागली आहे. दररोज घडताहेत अपघात अमरावती : बेलपुरा, समाधाननगर, अंबानाल्यावरचा भाग, स्मशानभूमी परिसरातील रस्त्यावरचे खड्डे तर अपघाताचे निमंत्रण देणारे ठरले आहेत. खापर्डे बगिचातील रस्त्यांची दुरवस्था एक प्रतिनिधीक ज्वलंत उदाहरण आहे. मातीमिश्रित खड्ड्यांमुळे या भागात रोज एखादा तरी छोटासा अपघात नित्याची बाब बनली आहे. मालवीय चौकात तर अक्षरश: तळे साचते. या भागात रेल्वेच्या कुंपणभिंतीचे काम सुरू असल्याने रस्त्याची गटारगंगा झाली आहे. शहराच्या विविध भागात पावसाच्या पाण्यासमवेत येणारा गाळ नंतर रस्त्यावर पसरल्याने त्याचा घाण वास सहन करण्यापलिकडे नागरिकांच्या हाती काही उरत नाही. कचराकुंड्यांमधील कचरा हलविला गेल्या नसल्याने पावसाने तो ओला होऊन त्याचीही दुर्गंधी शहरात पसरते. पाऊस आणखी काही दिवस बरसत राहिला तर शहराची दैनावस्था अधिक प्रकर्षाने उघड होण्याची चिन्हे आहेत. ही तर नित्याचीच बाब ४दरवर्षी पावसाळ्यात शहराची दैनावस्था होते. पावसाळ्यापूर्वी कामे कागदावर केली जात असल्याने नाले ओव्हरफ्लो होऊन त्यातील पाणी नागरिकांच्या घरात शिरणे, ही नित्याचीच बाब आहे. यशोदानगर, महादेवखोरी या शिवाय मुस्लिमबहुल परिसरात रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहणे, ही देखील नवी बाब नाही. पार्वतीनगर, महादेवनगर, अकोली रोड, छाया कॉलोनी याही परिसरात नाल्याचे पाणी घरात शिरल्याचे प्रसंग ताजे आहेत. त्याचप्रमाणे रस्त्यातील खड्डे अमरावतीकरांच्या पाचवीलाच पुजले आहेत.