शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

४० गावांचा रस्ता जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:00 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची सीमा वाढल्याने स्थानिक नागरिकांसह गावांना जोडणाऱ्या मुख्य मार्गांनासुद्धा त्याचा फटका बसला आहे. दोन वर्षांपासून जंगलातून जाणाऱ्या तालुका मुख्यालयासह गावखेड्यांना जोडणारे सर्व रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यांच्या नूतनीकरण वजा रस्ता चौपदरीकरणाच्या कामाला वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या जाचक अटीपुढे परवानगी मिळालेली नाही.

ठळक मुद्देप्रशासन नियमात गुरफटले : दरड कोसळू लागल्या, मोठ्या अपघाताची भीती

नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या जाचक नियमांपुढे सार्वजनिक बांधकाम विभागाने नांग्या टाकल्या आहेत. मात्र, पहाडावरून कोसळणाऱ्या दरडी मोठ्या अपघाताला आमंत्रण देत आहेत. तालुक्यातील घटांग ते काटकुंभपर्यंतचा रस्ता परिसरातील ४० गावखेड्यांतून ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी जीवघेणा ठरला आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची सीमा वाढल्याने स्थानिक नागरिकांसह गावांना जोडणाऱ्या मुख्य मार्गांनासुद्धा त्याचा फटका बसला आहे. दोन वर्षांपासून जंगलातून जाणाऱ्या तालुका मुख्यालयासह गावखेड्यांना जोडणारे सर्व रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यांच्या नूतनीकरण वजा रस्ता चौपदरीकरणाच्या कामाला वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या जाचक अटीपुढे परवानगी मिळालेली नाही. संरक्षित आणि अतिसंरक्षित परिक्षेत्र घोषित केल्याने दगडाला हात लावण्याचीही परवानगी नाही. तोसुद्धा एक मोठा गंभीर गुन्हा आहे. परिणामी परतवाडा, घटांग ते काटकुंभपर्यंत महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमारेषेपर्यंत जात असलेला हा रस्ता परिसरातील नागरिकांच्या जिवावर उठला आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही प्रशासन पूर्णत: दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. दरड कोसळून ढिगाºयाखाली दबून जीवितहानी झाल्यास संबंधित विभागाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पीयूष मालवीय व सहकाऱ्यांनी केली आहे.बांधकाम विभागाचे बांधले हातघटांग ते जारिदापर्यंत मध्य प्रदेशचा भाग वगळता रस्ता देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. मात्र, कोसळलेली दरड, दगड उचलल्यास व्याघ्र आणि वनविभागातर्फे कारवाईच्या नोटीसचे पत्र पाठविले जात आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने व्याघ्र प्रकल्पाच्या डोंगरातून कोसळणाऱ्या दरडी उचलणे बंद केले आहे.घरी परतण्याची हमी नाहीकाटकुंभ, चुरणी, जारिदा ते अतिदुर्गम हतरू परिसरातील ४० पेक्षा अधिक आदिवासी पाड्यांतील शेकडो नागरिकांसाठी काटकुंभ ते घटांग मार्ग सोईचा आहे. चिखलदरा, धारणी आणि परतवाडा येथे जाण्यासाठी जवळचा असलेल्या घटांगपासून दोन किलोमीटर अंतरापर्यंत असलेल्या घाटवळणातून उंच पहाडावरून मोठ्या प्रमाणात दरड, दगड, माती, झाडे कोसळत आहे. त्या ढिगाऱ्याखाली कधी अपघात होईल, याची शाश्वती नाही. परिणामी घरी परत जाण्याची हमी उरलेली नाही.वाहतूक सुरळीत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग दरडी उचलायचा. वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या नियमांचा बडगा आल्याने त्यांनीच रस्त्यावरील गौण खनिज, माती, झाडे उचलण्याबाबत पत्र पाठविले आहे.- मिलिंद पाटणकर,उपविभागीय अभियंताघटांग ते मध्यप्रदेशच्या कुकुरूपर्यंत रस्त्यावर कोसळलेले दगड उचलण्यासह काही कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या दरडींची पाहणी करून अपघात होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे.- निशा मोकाशेवनपरिक्षेत्र अधिकारी, घटांग

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा