शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘मुंबई रिटर्न’ भिक्षुकांपासून कोरोना संक्रमणाचा धोका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 05:00 IST

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री शहरात चौकाचौकांत सिंग्नलवरील भिक्षुकांचे  ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवून त्यांना घरी पाठविले. तरीही गुरुवारी स्थानिक गर्ल्स हायस्कूल चौकात दुपारी १२ ते १ वाजताच्या सुमारास मुले, महिला व बालके  भीक मागताना दिसून आले.  काही मुले अपूर्ण कपड्यांत होती.  तोंडाला मास्क नाही. सिग्नलवर वाहन थांबताच वाहनचालकांना पैशाची मागणी ते करतात. खुल्या आकाशाखाली उघड्यावर जगणे हाच त्यांचा शिरस्ता आहे.

ठळक मुद्देप्रशासन अनभिज्ञ, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता ?

 गणेश वासनिक    लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना संक्रमितांची आणि मृत्यूची संख्या रोडावली असली तरी मुंबईहून परत पाठविलेल्या भिक्षुकांपासून शहरवासीयांना कोविड-१९चा धोका वाढला आहे. मुंबईहून आलेल्या या भिक्षुकांच्या माध्यमातून शहरात कोरानाची दुसरी लाटही पसरू शकते, याबाबत प्रशासन अनभिज्ञ आहे. मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे मुंबईत भीक मागून उपजिविका चालविणारे बहुतांश पारधी समाजातील महिला, पुरुष हे कुटुंबीयांसह अमरावतीत दाखल झाले आहेत. यात काही नजीकच्या गाव-खेड्यांतील व्यक्तींचासुद्धा समावेश आहे. चार ते पाच महिन्यांपासून मुंबईहून परतलेल्या भिक्षुकांनी अमरावतीत महत्त्वाच्या चाैकात ठिय्या मांडला आहे. यात राजकमल चौक, श्याम चौक, इर्विन चौक, गर्ल्स हायस्कूल चौक, रेल्वे स्टेशन चौक, बसस्थानक परिसराचा समावेश आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री शहरात चौकाचौकांत सिंग्नलवरील भिक्षुकांचे  ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवून त्यांना घरी पाठविले. तरीही गुरुवारी स्थानिक गर्ल्स हायस्कूल चौकात दुपारी १२ ते १ वाजताच्या सुमारास मुले, महिला व बालके  भीक मागताना दिसून आले.  काही मुले अपूर्ण कपड्यांत होती.  तोंडाला मास्क नाही. सिग्नलवर वाहन थांबताच वाहनचालकांना पैशाची मागणी ते करतात. खुल्या आकाशाखाली उघड्यावर जगणे हाच त्यांचा शिरस्ता आहे. दुकाने, प्रतिष्ठानांमध्ये दररोज भीक मागणाऱ्यांची संख्या २२५ च्या घरात  आहे. मुंबइईहून शहरात दाखल झालेल्यांची संख्या २०० च्या घरात आहे. चार-साडेचारशे भिक्षुक सतत वाहनचालकांच्या संपकार्त येत असल्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

कोरोना म्हणजे काय?मुंबई बंद होणार म्हणून तेथून हाकलले. एप्रिलपासून मूळ गावी पाेहोचलो. गावात उपजीविकेचे साधन नाही. त्यामुळे भीक मागून चार महिन्यांपासून अमरावतीत जगत आहे. कोरोना, मास्क काय आहे, हे माहिती नसल्याचे एकाने सांगितले. 

रस्त्यावरील भिक्षुकांना मास्क देणार कोण?रस्त्यावरील भिक्षुकांना पोट भरण्याची चिंता आहे. मिळेल ते खाणे आणि उघड्यावर जगणे, अशी त्यांची जीवनशैली आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याचे संकेत आहे. त्यामुळे सामाजिक स्ंघटना अथवा कार्यकर्त्यांनी  रस्त्यावरील भिक्षुकांना मास्क देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

सिग्नलवर भिक्षुकांची गर्दी ही बाब अशोभनीय आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ठाणेनिहाय बाहेरगावच्या भिक्षुकांना त्यांच्या मूळ गावी परत पाठविण्याचे नियोजन आखले आहे. बुधवारपासून कार्यवाही सुरू झाली आहे. दिवाळीपूर्वीच भिक्षुकांची ओळख पटवून त्यांना त्यांच्या घराकडे पाठविले जाणार आहे.- अशोक लांडे,  वाहतूक पोलीस निरीक्षक, पूर्व विभाग.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या