शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘मुंबई रिटर्न’ भिक्षुकांपासून कोरोना संक्रमणाचा धोका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 05:00 IST

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री शहरात चौकाचौकांत सिंग्नलवरील भिक्षुकांचे  ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवून त्यांना घरी पाठविले. तरीही गुरुवारी स्थानिक गर्ल्स हायस्कूल चौकात दुपारी १२ ते १ वाजताच्या सुमारास मुले, महिला व बालके  भीक मागताना दिसून आले.  काही मुले अपूर्ण कपड्यांत होती.  तोंडाला मास्क नाही. सिग्नलवर वाहन थांबताच वाहनचालकांना पैशाची मागणी ते करतात. खुल्या आकाशाखाली उघड्यावर जगणे हाच त्यांचा शिरस्ता आहे.

ठळक मुद्देप्रशासन अनभिज्ञ, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता ?

 गणेश वासनिक    लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना संक्रमितांची आणि मृत्यूची संख्या रोडावली असली तरी मुंबईहून परत पाठविलेल्या भिक्षुकांपासून शहरवासीयांना कोविड-१९चा धोका वाढला आहे. मुंबईहून आलेल्या या भिक्षुकांच्या माध्यमातून शहरात कोरानाची दुसरी लाटही पसरू शकते, याबाबत प्रशासन अनभिज्ञ आहे. मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे मुंबईत भीक मागून उपजिविका चालविणारे बहुतांश पारधी समाजातील महिला, पुरुष हे कुटुंबीयांसह अमरावतीत दाखल झाले आहेत. यात काही नजीकच्या गाव-खेड्यांतील व्यक्तींचासुद्धा समावेश आहे. चार ते पाच महिन्यांपासून मुंबईहून परतलेल्या भिक्षुकांनी अमरावतीत महत्त्वाच्या चाैकात ठिय्या मांडला आहे. यात राजकमल चौक, श्याम चौक, इर्विन चौक, गर्ल्स हायस्कूल चौक, रेल्वे स्टेशन चौक, बसस्थानक परिसराचा समावेश आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री शहरात चौकाचौकांत सिंग्नलवरील भिक्षुकांचे  ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवून त्यांना घरी पाठविले. तरीही गुरुवारी स्थानिक गर्ल्स हायस्कूल चौकात दुपारी १२ ते १ वाजताच्या सुमारास मुले, महिला व बालके  भीक मागताना दिसून आले.  काही मुले अपूर्ण कपड्यांत होती.  तोंडाला मास्क नाही. सिग्नलवर वाहन थांबताच वाहनचालकांना पैशाची मागणी ते करतात. खुल्या आकाशाखाली उघड्यावर जगणे हाच त्यांचा शिरस्ता आहे. दुकाने, प्रतिष्ठानांमध्ये दररोज भीक मागणाऱ्यांची संख्या २२५ च्या घरात  आहे. मुंबइईहून शहरात दाखल झालेल्यांची संख्या २०० च्या घरात आहे. चार-साडेचारशे भिक्षुक सतत वाहनचालकांच्या संपकार्त येत असल्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

कोरोना म्हणजे काय?मुंबई बंद होणार म्हणून तेथून हाकलले. एप्रिलपासून मूळ गावी पाेहोचलो. गावात उपजीविकेचे साधन नाही. त्यामुळे भीक मागून चार महिन्यांपासून अमरावतीत जगत आहे. कोरोना, मास्क काय आहे, हे माहिती नसल्याचे एकाने सांगितले. 

रस्त्यावरील भिक्षुकांना मास्क देणार कोण?रस्त्यावरील भिक्षुकांना पोट भरण्याची चिंता आहे. मिळेल ते खाणे आणि उघड्यावर जगणे, अशी त्यांची जीवनशैली आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याचे संकेत आहे. त्यामुळे सामाजिक स्ंघटना अथवा कार्यकर्त्यांनी  रस्त्यावरील भिक्षुकांना मास्क देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

सिग्नलवर भिक्षुकांची गर्दी ही बाब अशोभनीय आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ठाणेनिहाय बाहेरगावच्या भिक्षुकांना त्यांच्या मूळ गावी परत पाठविण्याचे नियोजन आखले आहे. बुधवारपासून कार्यवाही सुरू झाली आहे. दिवाळीपूर्वीच भिक्षुकांची ओळख पटवून त्यांना त्यांच्या घराकडे पाठविले जाणार आहे.- अशोक लांडे,  वाहतूक पोलीस निरीक्षक, पूर्व विभाग.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या