शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

गावकऱ्यांना मिळणार जंगलात हक्काचा वाटा

By admin | Updated: June 22, 2014 23:48 IST

वनक्षेत्रातील गावांना जंगलाचे काही क्षेत्र चरितार्थासाठी देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महाराष्ट्र वनग्राम कायद्यानुसार वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून संबंधित

महत्त्वाकांक्षी निर्णय : नैसर्गिक वनसंपदेची विक्री करण्याची परवानगीअमरावती : वनक्षेत्रातील गावांना जंगलाचे काही क्षेत्र चरितार्थासाठी देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महाराष्ट्र वनग्राम कायद्यानुसार वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून संबंधित गावांना नैसर्गिक उत्पादनांची विक्री करता येणार आहे. स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न यामुळे सुटणार असला तरी यापुढे जंगलांच्या संरक्षणाची जबाबदारीसुध्दा स्थानिकांवर राहणार आहे. पूर्वीपासून अनेक गावांचा उदरनिर्वाह जंगलांवर अवलंबून आहे. मात्र, भारतीय वनअधिनियम कायदा १९२७ नुसार स्थानिक रहिवाशांना जंगलातील वस्तू परवानगीशिवाय घेता येत नाहीत. जळतण आणि जनावरांसाठी गवत घेण्याचा अधिकार नाही. मागील काही वर्षांत जंगलाचे आगीपासून संरक्षण करणे आणि वनक्षेत्र वाढविण्यासाठी गावांनी पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर वनक्षेत्रातील गावांना वनांचा काही भाग चरितार्थासाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र वनग्राम शासन आदेश मार्च २०१४ नुसार ग्रामस्थांना जंगलातील काही भागांचा उपयोग करता येईल. यासाठी जिल्ह्यातील विविध वनक्षेत्रालगतच्या प्रत्येकी एका गावाची निवड केली जाईल. या लाभासाठी संबंधित गावाने चराईबंदी, कुऱ्हाडबंदी आणि शिकारबंदी ठराव पारित करणे आवश्यक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संबंधित गावाला जिल्हास्तरीय संत तुकाराम वनग्राम पुरस्कार प्राप्त असावा आणि गेल्या तीन वर्षांत जंगलात आगीची घटना घडलेली नसावी, अशी अट यासाठी टाकण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने ग्रामवन घोषित केल्यास तातडीने जंगलाचा काही भाग गावकऱ्यांना दिला जाईल. या कामासाठी गावात वनव्यवस्थापन समिती स्थापन केली जाईल. समितीतील वनविभागाचे कर्मचारी तांत्रिक मार्गदर्शन करतील. गावकऱ्यांना जंगलातून बिबा, करवंद, चारोळी, गवत आणि फळांची विक्री करता येणार आहे. या उत्पन्नातील काही भाग जंगल आणि गावाच्या विकासासाठी वापरला जाणार आहे. लवकरच हा निर्णय काही निवडक गावांना लागू होणार आहे.