शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

फेलोशिपचे सुधारीत दर लागू, पण आदिवासी मंत्रालयात प्रस्ताव धुळखात

By गणेश वासनिक | Updated: March 4, 2024 17:42 IST

संशोधक आदिवासी विद्यार्थ्यांना सुधारीत दराची प्रतीक्षा, केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशाला बगल.

गणेश वासनिक,अमरावती :विद्यापीठ अनुदान आयोगाने फेलोशिप योजनेमध्ये सुधारणा केली असून अधिछात्रवृतीचे सुधारित दर १ जानेवारी २०२३ पासून लागू केले आहेत. मात्र फेलोशिप सुधारीत दराच्या प्रस्तावाची फाईल मंत्रालयात धुळखात पडली आहे. परिणामी संशोधन करणारे आदिवासी विद्यार्थी फेलोशिपच्या सुधारित दरापासून वंचित असल्याचे उघडकीस आले आहे.

राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पीएच.डी अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय मिळावे म्हणून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या संस्थेच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना पीएच.डीसाठी संशोधन अधिछात्रवृत्ती योजना ३ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार सुरू करण्यात आली.या योजनेतंर्गत प्रत्येक वर्षी १०० विद्यार्थ्यांना अधिकतम ५वर्षासाठी फेलोशिप दिली जाते. आता यूजीसीने फेलोशिप योजनेमध्ये सुधारणा केली आहे. याच अनुषंगाने भारत सरकार जनजाती मंत्रालय नवी दिल्ली, सारथी, महाज्योती या संस्थांकडून देण्यात येणारी फेलोशिप ही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित नियमानुसार देण्यात येत आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या संस्थेकडून देण्यात येणारी फेलोशिप सुद्धा विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारीत दरानुसार देण्यात यावी, अशी मागणी अनुसूचित जमातीच्या पीएच. डी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेच्या आयुक्ताकडे २७ डिसेंबर २०२३ रोजी व १९ जानेवारी २०२३ रोजी केली आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागणीच्या अनुषंगाने आयुक्त पुणे यांनी १९ जानेवारी २०२४ रोजी आदिवासी विकास विभागाचे सचिव यांच्याकडे सुधारीत दरानुसार १ जानेवारी २०२३ पासून अधिछात्रवृत्तीचे सुधारीत दर व घरभाडे भत्ता देण्यात यावा,असा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे. परंतु हा प्रस्ताव आदिवासी मंत्रालयात धूळखात पडून आहे. मात्र, आदिवासी विकास विभागाकडून प्रस्तावास अद्यापही मंजुरी देण्यात आलेली नाही.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित दरानुसार सारथी, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळते. आदिवासी विकास विभागानेही सुधारित दर प्रस्तावास तात्काळ मंजुरात देऊन संशोधन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थांना लाभ द्यावा. तसेच फेलोशिप विद्यार्थी संख्येची मर्यादा दरवर्षी ५०० करण्यात यावी.- ॲड. प्रमोद घोडाम संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम.

टॅग्स :Amravatiअमरावतीuniversityविद्यापीठ