शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वीटभट्ट्यांना महसूल विभागाचे अभय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 01:14 IST

परिसरातील श्रीक्षेत्र कोंडेश्वर मार्गावर वीटभट्ट्या मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने उन्हाळ्याची चाहूल लागताच उष्णतेचे परिणाम जाणवू लागले आहे. त्यामुळे येत्या शिवरात्रीच्या पर्वावर या मार्गाने हजारो भाविक ये-जा करतात. मात्र, या वीटभट्टयांची उष्णता आतापासूनच नकोशी वाटत असल्याने महसूल विभागाने या अवैध वीटभट्टा त्वरित बंद कराव्या, ......

ठळक मुद्देकोंडेश्वर मार्ग धोक्याचा : उन्हाळ्यात होणार जिवाची लाही-लाही

श्यामकांत सहस्त्रभोजने ।लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : परिसरातील श्रीक्षेत्र कोंडेश्वर मार्गावर वीटभट्ट्या मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने उन्हाळ्याची चाहूल लागताच उष्णतेचे परिणाम जाणवू लागले आहे. त्यामुळे येत्या शिवरात्रीच्या पर्वावर या मार्गाने हजारो भाविक ये-जा करतात. मात्र, या वीटभट्टयांची उष्णता आतापासूनच नकोशी वाटत असल्याने महसूल विभागाने या अवैध वीटभट्टा त्वरित बंद कराव्या, अशी मागणी असताना महसूल विभागाचे याला अभय का, असा सवाल त्रस्त भाविक व कामगार करीत आहे.वीटभट्ट्यांचा व्यवसाय बडनेऱ्यात मोठ्या प्रमाणात आहे. अमरावती शहराला वाहतुकीस सोयीचे जात असल्याने याच भागातील विटा बांधकामाकरिता वापरण्यात येते. यातील काही वीटभट्ट्या नियमसंगत चालू आहेत. मात्र, बहुतांश शासकीय जागेत अवैध वीटभट्ट्या सुरू केल्याने धूर मोठ्या प्रमाणात पसरतो. परिणामी आजूबाजूच्या पिकांवरसुद्धा त्याला विपरीत परिणाम जाणवू लागला आहे. तसेच विटा भाजल्यानंतर स्थलांतरण करताना मोठ्या प्रमाणात धूळ वातारवणात पसरल्याने या मार्गावरून ये-जा करणाºया वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. कोंडेश्वर मार्गालगच एक्सप्रेस हायवे असल्याने जड वाहनांसह अनेक वाहने धावतात. यावरदेखील धुळीचा परिणाम जाणवत आहे.या परिसरात प्रसिद्ध असलेले कोंडेश्वर देवस्थानात भाविकांची नियमित दर्शनाकरिता जे-जा सुरू असल्याने या मार्गावरील अवैध वीटभट्ट्या शासनाने त्वरित हटवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.महसूल विभाग घेतील काय दखल?कोंडेश्वर मार्गावरील अवैध वीटभट्ट्या हटविण्यासंदर्भात 'लोकमत'ने वारंवार हा मुद्दा लोकदरबारात मांडला. मात्र, महसूल विभागाने यावर अपेक्षित कारवाई अद्यापही केलेली नाही. त्यामुळे आता तरी याची दखल महसूल विभागाने घ्यावी, अशी अपेक्षा त्रस्त भाविकांनी व्यक्त केली आहे.वीटभट्यांच्या उष्णतेने उन्हाळा होणार असह्यउन्हाळ्याच्या दिवसांत वीटभट्या सुरू झाल्यानंतर या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना उष्णतेचे चटके असह्य होऊ लागतात. त्यामुळे अवैध वीटभट्ट्या हटविणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.तहसीलदारांनी जाणावे गांभीर्यकोंडेश्वर तसेच जुना बायपास मार्गावरून भाविक व कामगारांना उन्हाळ्यात ये-जा करणे फार कठीण जाते. शरीर भाजल्यागत वेदना सहन कराव्या लागतात. त्यामुळे या समस्येचे गांभीर्य ओळखून त्वरित कारवाई करावी, अशी मागणी एमआयडीसीतील कामगारांनी केली आहे.