शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वीटभट्ट्यांना महसूल विभागाचे अभय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 01:14 IST

परिसरातील श्रीक्षेत्र कोंडेश्वर मार्गावर वीटभट्ट्या मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने उन्हाळ्याची चाहूल लागताच उष्णतेचे परिणाम जाणवू लागले आहे. त्यामुळे येत्या शिवरात्रीच्या पर्वावर या मार्गाने हजारो भाविक ये-जा करतात. मात्र, या वीटभट्टयांची उष्णता आतापासूनच नकोशी वाटत असल्याने महसूल विभागाने या अवैध वीटभट्टा त्वरित बंद कराव्या, ......

ठळक मुद्देकोंडेश्वर मार्ग धोक्याचा : उन्हाळ्यात होणार जिवाची लाही-लाही

श्यामकांत सहस्त्रभोजने ।लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : परिसरातील श्रीक्षेत्र कोंडेश्वर मार्गावर वीटभट्ट्या मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने उन्हाळ्याची चाहूल लागताच उष्णतेचे परिणाम जाणवू लागले आहे. त्यामुळे येत्या शिवरात्रीच्या पर्वावर या मार्गाने हजारो भाविक ये-जा करतात. मात्र, या वीटभट्टयांची उष्णता आतापासूनच नकोशी वाटत असल्याने महसूल विभागाने या अवैध वीटभट्टा त्वरित बंद कराव्या, अशी मागणी असताना महसूल विभागाचे याला अभय का, असा सवाल त्रस्त भाविक व कामगार करीत आहे.वीटभट्ट्यांचा व्यवसाय बडनेऱ्यात मोठ्या प्रमाणात आहे. अमरावती शहराला वाहतुकीस सोयीचे जात असल्याने याच भागातील विटा बांधकामाकरिता वापरण्यात येते. यातील काही वीटभट्ट्या नियमसंगत चालू आहेत. मात्र, बहुतांश शासकीय जागेत अवैध वीटभट्ट्या सुरू केल्याने धूर मोठ्या प्रमाणात पसरतो. परिणामी आजूबाजूच्या पिकांवरसुद्धा त्याला विपरीत परिणाम जाणवू लागला आहे. तसेच विटा भाजल्यानंतर स्थलांतरण करताना मोठ्या प्रमाणात धूळ वातारवणात पसरल्याने या मार्गावरून ये-जा करणाºया वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. कोंडेश्वर मार्गालगच एक्सप्रेस हायवे असल्याने जड वाहनांसह अनेक वाहने धावतात. यावरदेखील धुळीचा परिणाम जाणवत आहे.या परिसरात प्रसिद्ध असलेले कोंडेश्वर देवस्थानात भाविकांची नियमित दर्शनाकरिता जे-जा सुरू असल्याने या मार्गावरील अवैध वीटभट्ट्या शासनाने त्वरित हटवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.महसूल विभाग घेतील काय दखल?कोंडेश्वर मार्गावरील अवैध वीटभट्ट्या हटविण्यासंदर्भात 'लोकमत'ने वारंवार हा मुद्दा लोकदरबारात मांडला. मात्र, महसूल विभागाने यावर अपेक्षित कारवाई अद्यापही केलेली नाही. त्यामुळे आता तरी याची दखल महसूल विभागाने घ्यावी, अशी अपेक्षा त्रस्त भाविकांनी व्यक्त केली आहे.वीटभट्यांच्या उष्णतेने उन्हाळा होणार असह्यउन्हाळ्याच्या दिवसांत वीटभट्या सुरू झाल्यानंतर या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना उष्णतेचे चटके असह्य होऊ लागतात. त्यामुळे अवैध वीटभट्ट्या हटविणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.तहसीलदारांनी जाणावे गांभीर्यकोंडेश्वर तसेच जुना बायपास मार्गावरून भाविक व कामगारांना उन्हाळ्यात ये-जा करणे फार कठीण जाते. शरीर भाजल्यागत वेदना सहन कराव्या लागतात. त्यामुळे या समस्येचे गांभीर्य ओळखून त्वरित कारवाई करावी, अशी मागणी एमआयडीसीतील कामगारांनी केली आहे.