शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वीटभट्ट्यांना महसूल विभागाचे अभय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 01:14 IST

परिसरातील श्रीक्षेत्र कोंडेश्वर मार्गावर वीटभट्ट्या मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने उन्हाळ्याची चाहूल लागताच उष्णतेचे परिणाम जाणवू लागले आहे. त्यामुळे येत्या शिवरात्रीच्या पर्वावर या मार्गाने हजारो भाविक ये-जा करतात. मात्र, या वीटभट्टयांची उष्णता आतापासूनच नकोशी वाटत असल्याने महसूल विभागाने या अवैध वीटभट्टा त्वरित बंद कराव्या, ......

ठळक मुद्देकोंडेश्वर मार्ग धोक्याचा : उन्हाळ्यात होणार जिवाची लाही-लाही

श्यामकांत सहस्त्रभोजने ।लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : परिसरातील श्रीक्षेत्र कोंडेश्वर मार्गावर वीटभट्ट्या मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने उन्हाळ्याची चाहूल लागताच उष्णतेचे परिणाम जाणवू लागले आहे. त्यामुळे येत्या शिवरात्रीच्या पर्वावर या मार्गाने हजारो भाविक ये-जा करतात. मात्र, या वीटभट्टयांची उष्णता आतापासूनच नकोशी वाटत असल्याने महसूल विभागाने या अवैध वीटभट्टा त्वरित बंद कराव्या, अशी मागणी असताना महसूल विभागाचे याला अभय का, असा सवाल त्रस्त भाविक व कामगार करीत आहे.वीटभट्ट्यांचा व्यवसाय बडनेऱ्यात मोठ्या प्रमाणात आहे. अमरावती शहराला वाहतुकीस सोयीचे जात असल्याने याच भागातील विटा बांधकामाकरिता वापरण्यात येते. यातील काही वीटभट्ट्या नियमसंगत चालू आहेत. मात्र, बहुतांश शासकीय जागेत अवैध वीटभट्ट्या सुरू केल्याने धूर मोठ्या प्रमाणात पसरतो. परिणामी आजूबाजूच्या पिकांवरसुद्धा त्याला विपरीत परिणाम जाणवू लागला आहे. तसेच विटा भाजल्यानंतर स्थलांतरण करताना मोठ्या प्रमाणात धूळ वातारवणात पसरल्याने या मार्गावरून ये-जा करणाºया वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. कोंडेश्वर मार्गालगच एक्सप्रेस हायवे असल्याने जड वाहनांसह अनेक वाहने धावतात. यावरदेखील धुळीचा परिणाम जाणवत आहे.या परिसरात प्रसिद्ध असलेले कोंडेश्वर देवस्थानात भाविकांची नियमित दर्शनाकरिता जे-जा सुरू असल्याने या मार्गावरील अवैध वीटभट्ट्या शासनाने त्वरित हटवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.महसूल विभाग घेतील काय दखल?कोंडेश्वर मार्गावरील अवैध वीटभट्ट्या हटविण्यासंदर्भात 'लोकमत'ने वारंवार हा मुद्दा लोकदरबारात मांडला. मात्र, महसूल विभागाने यावर अपेक्षित कारवाई अद्यापही केलेली नाही. त्यामुळे आता तरी याची दखल महसूल विभागाने घ्यावी, अशी अपेक्षा त्रस्त भाविकांनी व्यक्त केली आहे.वीटभट्यांच्या उष्णतेने उन्हाळा होणार असह्यउन्हाळ्याच्या दिवसांत वीटभट्या सुरू झाल्यानंतर या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना उष्णतेचे चटके असह्य होऊ लागतात. त्यामुळे अवैध वीटभट्ट्या हटविणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.तहसीलदारांनी जाणावे गांभीर्यकोंडेश्वर तसेच जुना बायपास मार्गावरून भाविक व कामगारांना उन्हाळ्यात ये-जा करणे फार कठीण जाते. शरीर भाजल्यागत वेदना सहन कराव्या लागतात. त्यामुळे या समस्येचे गांभीर्य ओळखून त्वरित कारवाई करावी, अशी मागणी एमआयडीसीतील कामगारांनी केली आहे.