शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

२२ लाखांच्या महसुलात सूट

By admin | Updated: April 18, 2016 23:56 IST

जिल्ह्याची सुधारित व अंतिम पैसेवारी ५० पैशांच्या आत आल्याने शासनाने जिल्ह्यातील १ हजार ९६७ गावांत दुष्काळस्थिती जाहीर केली.

दुष्काळाची सवलत : ४ लाख ३३ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभगजानन मोहोड अमरावतीजिल्ह्याची सुधारित व अंतिम पैसेवारी ५० पैशांच्या आत आल्याने शासनाने जिल्ह्यातील १ हजार ९६७ गावांत दुष्काळस्थिती जाहीर केली. त्यामुळे २ हेक्टर शेती असणाऱ्या ४ लाख ३३ हजार ८०४ शेतकऱ्यांचा किमान २२ लाखांवर जमीन महसूल माफ होणार आहे. जिल्ह्यात सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळीस्थिती आहे. मागील वर्षी ैपैसेवारी ४३ पैसे होती. यावर्षी देखील ४३ पैसेच पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. त्यामुळे शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट मिळणार आहे. किंबहूना दुष्काळी प्रदेशात मिळणाऱ्या सोयी-सवलतींमधील ही एक प्रमुख सवलत आहे. जिल्ह्यात ५ एकराखालील ३ लाख ११ हजार ११५ शेतकरी व ५ एकरावरील १ लाख १४ हजार ८०४ शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना जमीन महसूलात सूट या सवलतीचा लाभ मिळणार आहे. अल्प व अत्यल्प भूधारकांकडून शेतसारा वसूल केला जात नाही. दरवर्षी शेतकऱ्यांकडून सामान्य जमीन महसूल, वाढीव जमीन महसूल, संकिर्ण महसुलासह अन्य महसुलाची वसुली शासन करीत असते. यापैकी सामान्य जमीन महसूल हा प्रतिएकर २० रुपयादरम्यान असतो. जिल्ह्यात ५० पैशांच्या आत पैसेवारी आल्याने २२ लाखांवर महसूल माफ होणार आहे. तलाठी साधारणपणे आॅक्टोबर ते नोव्हेंबरपासून जमीन महसूल गोळा करतात. मात्र पैसेवारी कमी आल्याने यावर्षी जमीन महसूलात शेतकऱ्यांना सूट मिळणार आहे. दुष्काळ उशिरा जाहीर झाल्याने शेतसाऱ्याची झाली वसुलीशासनाने खरिपाची सुधारित पैसेवारी व कमी पर्जन्यमान या निकषावर विभागातील फक्त बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळ घोषित केला. त्यामुळे हा जिल्हा वगळता उर्वरित चारही जिल्ह्यांत महसूल विभागाने ३१ मार्चपर्यंत शेतसारा वसूल केला. अमरावती जिल्ह्यात शासनाने २३ मार्च रोजी दुष्काळ स्थिती जाहीर केली. परंतु तलाठीवर्गाने ३१ मार्चपर्यंत जमीन महसुलाची वसुली केली. हा शेतसारा शेतकऱ्यांना परत मिळायला हवा, अशी मागणी आहे. जिल्ह्यात चार लाखांवर खातेदारमहसूल विभागाच्या नोंदीनुसार जिल्ह्ह्यात ४ लाख ३३ हजार ५४६ शेतकरी खातेदार आहेत. यापैकी ५ एकराच्या आतील ३ लाख ११ हजार ११५ शेतकरी खातेदार असून त्यांना जमीन महसूल माफ किंवा विशेषत्वाने महसुलाची कमी आकारणी केली जाते तर ५ एकरावरील १ लाख १४ हजार ८०४ खातेदार आहेत. त्यांचा जमीन महसूल आता माफ होणार आहे. जिल्ह्यातील १९६७ गावांमधील पैसेवारी ५० पैशांच्या आत आहे. साधारणत: २० ते २२ लाखांचा महसूल दरवर्षी जमा होतो. दुष्काळस्थिती झाल्याने या महसुलात शासन सूट देते. - शंकर शिरसुद्धे, उपजिल्हाधिकारी (महसूल)