शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

२२ लाखांच्या महसुलात सूट

By admin | Updated: April 18, 2016 23:56 IST

जिल्ह्याची सुधारित व अंतिम पैसेवारी ५० पैशांच्या आत आल्याने शासनाने जिल्ह्यातील १ हजार ९६७ गावांत दुष्काळस्थिती जाहीर केली.

दुष्काळाची सवलत : ४ लाख ३३ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभगजानन मोहोड अमरावतीजिल्ह्याची सुधारित व अंतिम पैसेवारी ५० पैशांच्या आत आल्याने शासनाने जिल्ह्यातील १ हजार ९६७ गावांत दुष्काळस्थिती जाहीर केली. त्यामुळे २ हेक्टर शेती असणाऱ्या ४ लाख ३३ हजार ८०४ शेतकऱ्यांचा किमान २२ लाखांवर जमीन महसूल माफ होणार आहे. जिल्ह्यात सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळीस्थिती आहे. मागील वर्षी ैपैसेवारी ४३ पैसे होती. यावर्षी देखील ४३ पैसेच पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. त्यामुळे शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट मिळणार आहे. किंबहूना दुष्काळी प्रदेशात मिळणाऱ्या सोयी-सवलतींमधील ही एक प्रमुख सवलत आहे. जिल्ह्यात ५ एकराखालील ३ लाख ११ हजार ११५ शेतकरी व ५ एकरावरील १ लाख १४ हजार ८०४ शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना जमीन महसूलात सूट या सवलतीचा लाभ मिळणार आहे. अल्प व अत्यल्प भूधारकांकडून शेतसारा वसूल केला जात नाही. दरवर्षी शेतकऱ्यांकडून सामान्य जमीन महसूल, वाढीव जमीन महसूल, संकिर्ण महसुलासह अन्य महसुलाची वसुली शासन करीत असते. यापैकी सामान्य जमीन महसूल हा प्रतिएकर २० रुपयादरम्यान असतो. जिल्ह्यात ५० पैशांच्या आत पैसेवारी आल्याने २२ लाखांवर महसूल माफ होणार आहे. तलाठी साधारणपणे आॅक्टोबर ते नोव्हेंबरपासून जमीन महसूल गोळा करतात. मात्र पैसेवारी कमी आल्याने यावर्षी जमीन महसूलात शेतकऱ्यांना सूट मिळणार आहे. दुष्काळ उशिरा जाहीर झाल्याने शेतसाऱ्याची झाली वसुलीशासनाने खरिपाची सुधारित पैसेवारी व कमी पर्जन्यमान या निकषावर विभागातील फक्त बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळ घोषित केला. त्यामुळे हा जिल्हा वगळता उर्वरित चारही जिल्ह्यांत महसूल विभागाने ३१ मार्चपर्यंत शेतसारा वसूल केला. अमरावती जिल्ह्यात शासनाने २३ मार्च रोजी दुष्काळ स्थिती जाहीर केली. परंतु तलाठीवर्गाने ३१ मार्चपर्यंत जमीन महसुलाची वसुली केली. हा शेतसारा शेतकऱ्यांना परत मिळायला हवा, अशी मागणी आहे. जिल्ह्यात चार लाखांवर खातेदारमहसूल विभागाच्या नोंदीनुसार जिल्ह्ह्यात ४ लाख ३३ हजार ५४६ शेतकरी खातेदार आहेत. यापैकी ५ एकराच्या आतील ३ लाख ११ हजार ११५ शेतकरी खातेदार असून त्यांना जमीन महसूल माफ किंवा विशेषत्वाने महसुलाची कमी आकारणी केली जाते तर ५ एकरावरील १ लाख १४ हजार ८०४ खातेदार आहेत. त्यांचा जमीन महसूल आता माफ होणार आहे. जिल्ह्यातील १९६७ गावांमधील पैसेवारी ५० पैशांच्या आत आहे. साधारणत: २० ते २२ लाखांचा महसूल दरवर्षी जमा होतो. दुष्काळस्थिती झाल्याने या महसुलात शासन सूट देते. - शंकर शिरसुद्धे, उपजिल्हाधिकारी (महसूल)