शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

परतवाडा, तिवस्यात संपूर्ण दारुबंदी

By admin | Updated: April 6, 2017 00:04 IST

अमरावती : हायवेवरील ५०० मीटर अंतरावरील सर्व प्रकारची दारु दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

न्यायालयाच्या आदेशाचा फटका : जिल्ह्यात मद्यविक्रीच्या ३९८ दुकानांना टाळेअमरावती : अमरावती : हायवेवरील ५०० मीटर अंतरावरील सर्व प्रकारची दारु दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार परतवाडा व तिवस्यात संपूर्ण दारूबंदी झाली असून यादोन्ही शहरांत एकही दुकान खुले नसल्याने अवैध मद्यविक्रीला उधाण आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची राज्य उत्पादन शुल्क विभागाने काटेकोर अंमलबजावणी केली आहे. परिणामी १ एप्रिलपासून मद्यविक्री परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले नाही. बहुतांश मद्यविक्री परवानाधारकांनी नूतनीकरणासाठी अर्ज केले आहेत. मात्र, याबाबत शासनाकडून अद्यापही सुधारित आदेश नाहीत. त्यामुळे ‘एक्साईज’ला शासनादेशाची प्रतीक्षा आहे. राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील परवानाधारक मद्यविक्रेत्यांनी याप्रकरणात पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी एक्साईज कार्यालयात गर्दी केली आहे. जिल्ह्यात १४ तालुक्यांमध्ये दारुबंदीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यात परतवाडा व तिवसा शहरात नव्या आदेशामुळे एकही दारू दुकान सुरु करता आले नाही. १ एप्रिलपासून सर्व मद्यविक्री दुकानांना टाळे लागले आहे. हायवेवर ५०० मीटरच्या आतील बाधित मद्यविक्री परवानाधारकांना ही दुकाने बंद करण्याबाबत ‘एक्साईज’ने नोटीस बजावून आधीच अवगत केले होते. मात्र, काही दुकानांना अंतरमोजणीमध्ये काठावर अभय मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. परतवाड्यात दारूबंदीमुळे मद्यपींना अचलपूर शहरात जाऊन दारु रिचवावी लागत असल्याचे दिसून येते. तिवसा येथे अवैधरित्या दारू विकली जात आहे.अवैध मद्यविक्रीला उधाणजिल्ह्यात ४८२ पैकी ३९८ मद्यविक्रीची दुकाने बंद झाल्यामुळे अवैध विक्रीला उधाण आले आहे. अव्वाचा सव्वा दरात मद्यविक्री होत आहे. दारू दुकानांवर खरेदीसाठी उसळणारी गर्दी बघता काही मद्यपी चढ्या दरात दारु खरेदी करीत आहेत. रामनवमीच्या दिवशी मंगळवारी ‘ड्राय डे’ असताना अवैध दारुविक्रीला जोर आला होता. आता पोलीस, एक्साईज विभागाला अवैध दारूविक्री रोखण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. ‘वाईन शॉप’ भोवती पोलिसांचा बंदोबस्तबडनेरा शहरात एकच वाईन शॉप बाधित होण्यापासून वाचले आहे. त्यामुळे या दुकानावर मद्यपींची मोठी गर्दी उसळली आहे. सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास दारु खरेदी करण्यासाठी मद्यपींनी रेल्वेस्थानक मार्ग बंद केला होता. परिणामी विदर्भ एक्सप्रेसने जाणाऱ्या प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. अखेर पोलीस बंदोबस्तात हे मद्यविक्रीचे दुकान बंद करण्याचा प्रसंग ओढवला, हे विशेष.