शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

परतीचा पाऊस, सोयाबीनचे मातेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2022 23:00 IST

  यंदाच्या हंगामात तब्बल ८४ महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. सर्वच तालुक्यात पावसाची सरासरी पार झालेली आहे. अतिवृष्टी शिवाय ५ जुलैपासून सतत पाऊस सुरू असल्याने दोन लाख हेक्टरमधील सोयाबीनचे आधीच नुकसान झालेले आहे. यातून शेतकरी सावरत नाही तोच पाच दिवसांपासून पुन्हा पाऊस सुरू झाल्याने काढणीच्या हंगामात सोयाबीन मातीमोल होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  सोयाबीन काढणीच्या हंगामात पावसाने पुन्हा रिपरिप लावल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. पावसाने गंज्या भिजल्या तर शेतात पाणी साचल्याने उभे सोयाबीन सडायला लागल्याने मातेरे झाले झाले आहे. प्रतवारी खराब झाल्याने व्यापारी पडून मागत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  यंदाच्या हंगामात तब्बल ८४ महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. सर्वच तालुक्यात पावसाची सरासरी पार झालेली आहे. अतिवृष्टी शिवाय ५ जुलैपासून सतत पाऊस सुरू असल्याने दोन लाख हेक्टरमधील सोयाबीनचे आधीच नुकसान झालेले आहे. यातून शेतकरी सावरत नाही तोच पाच दिवसांपासून पुन्हा पाऊस सुरू झाल्याने काढणीच्या हंगामात सोयाबीन मातीमोल होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगणी करून गंजी लावल्या होत्या, त्यामध्ये पाणी शिरल्याने सोयाबीन सडायला लागले आहे. पावसामुळे सोयाबीनच्या शेंगामधून बिजांकुर फुटत आहे. याशिवाय उशिरा पेरणी झालेल्या सोयाबीनची कायिक वाढ झाल्याने शेंगा कमी व पोचत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.पावसाने सोयाबीनची प्रतवारी कमी झालेली आहे. त्यामुळे व्यापारी भाव पाडून मागत आले. महिनाभरापूर्वी ५ ते ६ हजारांपर्यंत असलेला भाव आता चार हजारांवर आलेला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तोंडचा घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच शेतमाल पडून मागत असल्याने नाफेड केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे. 

अर्ध्याअधिक तुरीवर ‘मर’सततचा पाऊस अतिवृष्टीमुळे शेतात तलाव साचल्याने तुरीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन ‘मर’ रोगाने तूर जागेवरच सुकायला लागली आहे.  जिल्ह्यात किमान ५० हजार हेक्टरवर हे संकट ओढावलेले आहे. तुरीला यंदा चांगला भाव असताना पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

कपाशीवर बोंडसड अन् बोंडअळीसततच्या पावसाने कपाशीच्या बोंडावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामध्ये बोंड सडून गळ सुरू झालेली आहे. याशिवाय शेतात पाणी साचल्याने ‘पॅराविल्ट’मुळे कपाशी जागेवरच सुकायला लागली आहे. याशिवाय बोंडअळीला पोषक वातावरण असल्याने प्रादुर्भाव वाढला. 

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती