शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

परतीचा पाऊस, सोयाबीनचे मातेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2022 23:00 IST

  यंदाच्या हंगामात तब्बल ८४ महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. सर्वच तालुक्यात पावसाची सरासरी पार झालेली आहे. अतिवृष्टी शिवाय ५ जुलैपासून सतत पाऊस सुरू असल्याने दोन लाख हेक्टरमधील सोयाबीनचे आधीच नुकसान झालेले आहे. यातून शेतकरी सावरत नाही तोच पाच दिवसांपासून पुन्हा पाऊस सुरू झाल्याने काढणीच्या हंगामात सोयाबीन मातीमोल होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  सोयाबीन काढणीच्या हंगामात पावसाने पुन्हा रिपरिप लावल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. पावसाने गंज्या भिजल्या तर शेतात पाणी साचल्याने उभे सोयाबीन सडायला लागल्याने मातेरे झाले झाले आहे. प्रतवारी खराब झाल्याने व्यापारी पडून मागत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  यंदाच्या हंगामात तब्बल ८४ महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. सर्वच तालुक्यात पावसाची सरासरी पार झालेली आहे. अतिवृष्टी शिवाय ५ जुलैपासून सतत पाऊस सुरू असल्याने दोन लाख हेक्टरमधील सोयाबीनचे आधीच नुकसान झालेले आहे. यातून शेतकरी सावरत नाही तोच पाच दिवसांपासून पुन्हा पाऊस सुरू झाल्याने काढणीच्या हंगामात सोयाबीन मातीमोल होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगणी करून गंजी लावल्या होत्या, त्यामध्ये पाणी शिरल्याने सोयाबीन सडायला लागले आहे. पावसामुळे सोयाबीनच्या शेंगामधून बिजांकुर फुटत आहे. याशिवाय उशिरा पेरणी झालेल्या सोयाबीनची कायिक वाढ झाल्याने शेंगा कमी व पोचत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.पावसाने सोयाबीनची प्रतवारी कमी झालेली आहे. त्यामुळे व्यापारी भाव पाडून मागत आले. महिनाभरापूर्वी ५ ते ६ हजारांपर्यंत असलेला भाव आता चार हजारांवर आलेला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तोंडचा घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच शेतमाल पडून मागत असल्याने नाफेड केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे. 

अर्ध्याअधिक तुरीवर ‘मर’सततचा पाऊस अतिवृष्टीमुळे शेतात तलाव साचल्याने तुरीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन ‘मर’ रोगाने तूर जागेवरच सुकायला लागली आहे.  जिल्ह्यात किमान ५० हजार हेक्टरवर हे संकट ओढावलेले आहे. तुरीला यंदा चांगला भाव असताना पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

कपाशीवर बोंडसड अन् बोंडअळीसततच्या पावसाने कपाशीच्या बोंडावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामध्ये बोंड सडून गळ सुरू झालेली आहे. याशिवाय शेतात पाणी साचल्याने ‘पॅराविल्ट’मुळे कपाशी जागेवरच सुकायला लागली आहे. याशिवाय बोंडअळीला पोषक वातावरण असल्याने प्रादुर्भाव वाढला. 

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती