शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

परतीचा पाऊस, सोयाबीनचे मातेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2022 23:00 IST

  यंदाच्या हंगामात तब्बल ८४ महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. सर्वच तालुक्यात पावसाची सरासरी पार झालेली आहे. अतिवृष्टी शिवाय ५ जुलैपासून सतत पाऊस सुरू असल्याने दोन लाख हेक्टरमधील सोयाबीनचे आधीच नुकसान झालेले आहे. यातून शेतकरी सावरत नाही तोच पाच दिवसांपासून पुन्हा पाऊस सुरू झाल्याने काढणीच्या हंगामात सोयाबीन मातीमोल होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  सोयाबीन काढणीच्या हंगामात पावसाने पुन्हा रिपरिप लावल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. पावसाने गंज्या भिजल्या तर शेतात पाणी साचल्याने उभे सोयाबीन सडायला लागल्याने मातेरे झाले झाले आहे. प्रतवारी खराब झाल्याने व्यापारी पडून मागत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  यंदाच्या हंगामात तब्बल ८४ महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. सर्वच तालुक्यात पावसाची सरासरी पार झालेली आहे. अतिवृष्टी शिवाय ५ जुलैपासून सतत पाऊस सुरू असल्याने दोन लाख हेक्टरमधील सोयाबीनचे आधीच नुकसान झालेले आहे. यातून शेतकरी सावरत नाही तोच पाच दिवसांपासून पुन्हा पाऊस सुरू झाल्याने काढणीच्या हंगामात सोयाबीन मातीमोल होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगणी करून गंजी लावल्या होत्या, त्यामध्ये पाणी शिरल्याने सोयाबीन सडायला लागले आहे. पावसामुळे सोयाबीनच्या शेंगामधून बिजांकुर फुटत आहे. याशिवाय उशिरा पेरणी झालेल्या सोयाबीनची कायिक वाढ झाल्याने शेंगा कमी व पोचत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.पावसाने सोयाबीनची प्रतवारी कमी झालेली आहे. त्यामुळे व्यापारी भाव पाडून मागत आले. महिनाभरापूर्वी ५ ते ६ हजारांपर्यंत असलेला भाव आता चार हजारांवर आलेला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तोंडचा घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच शेतमाल पडून मागत असल्याने नाफेड केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे. 

अर्ध्याअधिक तुरीवर ‘मर’सततचा पाऊस अतिवृष्टीमुळे शेतात तलाव साचल्याने तुरीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन ‘मर’ रोगाने तूर जागेवरच सुकायला लागली आहे.  जिल्ह्यात किमान ५० हजार हेक्टरवर हे संकट ओढावलेले आहे. तुरीला यंदा चांगला भाव असताना पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

कपाशीवर बोंडसड अन् बोंडअळीसततच्या पावसाने कपाशीच्या बोंडावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामध्ये बोंड सडून गळ सुरू झालेली आहे. याशिवाय शेतात पाणी साचल्याने ‘पॅराविल्ट’मुळे कपाशी जागेवरच सुकायला लागली आहे. याशिवाय बोंडअळीला पोषक वातावरण असल्याने प्रादुर्भाव वाढला. 

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती