शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

परतीच्या पावसाने घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 05:00 IST

गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र संततधार पावसामुळे सोयाबीन पिकावर रोगराईने पीक खराब झाले आहे. पिकांवर आलेल्या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी शेतकरी निरनिराळ्या कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. पण, पावसात औषधांची केलेली फवारणी धुवून निघत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने सोयाबीन व तूर पिकांची लागवड करतात.

ठळक मुद्देखर्च निघणेही कठीण : शेतात पाणी, तूर-कपाशी पिकासाठी धोकादायक

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : जिल्ह्यात मोसमी पाऊस सर्वत्र संततधार कोसळल्यानंतर आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. अगोदर संततधार पावसाने पिकांवर आलेल्या रोगराईने हाहाकार माजविला. त्यात सखल भागातील काही शेतांमध्ये अजूनही पाणी साचले आहे. आता परतीचा पाऊस आला, तर तूर, सोयाबीन, मिरची पिकांसाठी तो धोकादायक ठरणार आहे.गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र संततधार पावसामुळे सोयाबीन पिकावर रोगराईने पीक खराब झाले आहे. पिकांवर आलेल्या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी शेतकरी निरनिराळ्या कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. पण, पावसात औषधांची केलेली फवारणी धुवून निघत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने सोयाबीन व तूर पिकांची लागवड करतात. परंतु, गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन पिकाला भाव नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशी पिकाची लागवड केली. काही शेतकऱ्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची लागवड केली होती. मात्र, यंदा दमदार हजेरी लावणाऱ्या पावसात ही पिके कोलमडून पडली. सोयाबीन पीक यंदा कमी पावसामुळे येणार की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना वाटू लागली होती. मात्र, निसर्गाच्या लहरीपणाने अर्धा पावसाळा उलटल्यावर आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात गणेश चतुर्थीपासून पावसाने कहरच केला. यादरम्यान संततधार पावसाने अनेकदा शेतात पाणी साचले होते. या साचलेले पाण्याने पिकांवर निरनिराळ्या रोगांनी खरीप पिके धोक्यात आली, शिवाय ती पिवळी पडली.आधीच सततच्या पावसाने खरीप पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला. परंतु, आता सोयाबीन पीक हातात आले असताना, ऐन मळणीच्या वेळीच परतीचा पाऊस कोसळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक होत्याचे नव्हते झाले आहे. हाती काहीच आलेले नसल्याने तूर, कपाशी पिकावर आलेल्या रोगाकरिता औषधाची फवारणी कशी करावी, असा प्रश्नही शेतकऱ्यांपुढे आहे.तालुक्यात सोयाबीन पिकावर रोग आला असल्याने कुठे पिकांमध्ये जनावरे घातली, तर काही शेतकऱ्यांनी तीन महिन्यांची वाया जाऊ नये म्हणून मिळेल ते पीक काढून घेण्यासाठी धडपड चालविली आहे. त्यांना अवघे एकरी दोन ते तीन क्विंटल सोयाबीन पीक मिळत आहे.कोरोनाकाळात प्रदूषणाला आळा बसल्याने पाऊस चांगला कोसळण्याचे भाकीत वर्तविले जात होते. त्यानुसार पाऊसदेखील कोसळला. मात्र, त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. खरिपाच्या सुरुवातीपासून पिकांच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांनी खर्च केला. मात्र, आज पीक घरात येताना मोबदला तर दूर, खर्च निघणेही कठीण झाले आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती