शहरं
Join us  
Trending Stories
1
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
2
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
3
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
4
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
5
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
6
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
7
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
8
Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं गाडीत बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
9
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
10
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
12
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
13
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
14
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
15
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
16
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
17
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
18
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
19
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
20
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 05:00 IST

गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र संततधार पावसामुळे सोयाबीन पिकावर रोगराईने पीक खराब झाले आहे. पिकांवर आलेल्या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी शेतकरी निरनिराळ्या कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. पण, पावसात औषधांची केलेली फवारणी धुवून निघत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने सोयाबीन व तूर पिकांची लागवड करतात.

ठळक मुद्देखर्च निघणेही कठीण : शेतात पाणी, तूर-कपाशी पिकासाठी धोकादायक

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : जिल्ह्यात मोसमी पाऊस सर्वत्र संततधार कोसळल्यानंतर आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. अगोदर संततधार पावसाने पिकांवर आलेल्या रोगराईने हाहाकार माजविला. त्यात सखल भागातील काही शेतांमध्ये अजूनही पाणी साचले आहे. आता परतीचा पाऊस आला, तर तूर, सोयाबीन, मिरची पिकांसाठी तो धोकादायक ठरणार आहे.गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र संततधार पावसामुळे सोयाबीन पिकावर रोगराईने पीक खराब झाले आहे. पिकांवर आलेल्या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी शेतकरी निरनिराळ्या कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. पण, पावसात औषधांची केलेली फवारणी धुवून निघत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने सोयाबीन व तूर पिकांची लागवड करतात. परंतु, गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन पिकाला भाव नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशी पिकाची लागवड केली. काही शेतकऱ्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची लागवड केली होती. मात्र, यंदा दमदार हजेरी लावणाऱ्या पावसात ही पिके कोलमडून पडली. सोयाबीन पीक यंदा कमी पावसामुळे येणार की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना वाटू लागली होती. मात्र, निसर्गाच्या लहरीपणाने अर्धा पावसाळा उलटल्यावर आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात गणेश चतुर्थीपासून पावसाने कहरच केला. यादरम्यान संततधार पावसाने अनेकदा शेतात पाणी साचले होते. या साचलेले पाण्याने पिकांवर निरनिराळ्या रोगांनी खरीप पिके धोक्यात आली, शिवाय ती पिवळी पडली.आधीच सततच्या पावसाने खरीप पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला. परंतु, आता सोयाबीन पीक हातात आले असताना, ऐन मळणीच्या वेळीच परतीचा पाऊस कोसळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक होत्याचे नव्हते झाले आहे. हाती काहीच आलेले नसल्याने तूर, कपाशी पिकावर आलेल्या रोगाकरिता औषधाची फवारणी कशी करावी, असा प्रश्नही शेतकऱ्यांपुढे आहे.तालुक्यात सोयाबीन पिकावर रोग आला असल्याने कुठे पिकांमध्ये जनावरे घातली, तर काही शेतकऱ्यांनी तीन महिन्यांची वाया जाऊ नये म्हणून मिळेल ते पीक काढून घेण्यासाठी धडपड चालविली आहे. त्यांना अवघे एकरी दोन ते तीन क्विंटल सोयाबीन पीक मिळत आहे.कोरोनाकाळात प्रदूषणाला आळा बसल्याने पाऊस चांगला कोसळण्याचे भाकीत वर्तविले जात होते. त्यानुसार पाऊसदेखील कोसळला. मात्र, त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. खरिपाच्या सुरुवातीपासून पिकांच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांनी खर्च केला. मात्र, आज पीक घरात येताना मोबदला तर दूर, खर्च निघणेही कठीण झाले आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती