शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

परतीचा पाऊस सोयाबीन, कपाशीच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 05:00 IST

प्रशासनात १ जूनपासून पावसाची नियमित नोंद घ्यायला सुरुवात होते. ती नोंद ३० सप्टेंबरपर्यत सुरू असते व त्यानंतर येणारा परतीचा पाऊस हा अवकाळी प्रकारात गणला जातो. परतीचा पाऊस हा याच सुमारास सुरू होतो. यावर्षीदेखील परतीचा पाऊस सुरू झाल्याबाबत हवामान विभागात मतभिन्नता असली तरी जिल्हा प्रशासनात मात्र परतीचा पाऊसच गृहीत धरला जात आहे.

ठळक मुद्देहंगाम बाधित : शेंगांना कोंब, पिकांचे सरासरी ७५ टक्के नुकसान, हंगामात शेतकऱ्यांच्या घरी पीक नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सोयाबीन सवंगणीचा हंगाम सुरू होताच परतीच्या पावसालाही सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाणार अशी स्थिती निर्माण झालेली आहे. ऑगस्ट महिन्यापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे पहिल्या टप्प्यातील सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटायला लागले आहेत. भारी जमिनीतील कपाशीची बोंडगळ सुरू झाली आहे. दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे.प्रशासनात १ जूनपासून पावसाची नियमित नोंद घ्यायला सुरुवात होते. ती नोंद ३० सप्टेंबरपर्यत सुरू असते व त्यानंतर येणारा परतीचा पाऊस हा अवकाळी प्रकारात गणला जातो. परतीचा पाऊस हा याच सुमारास सुरू होतो. यावर्षीदेखील परतीचा पाऊस सुरू झाल्याबाबत हवामान विभागात मतभिन्नता असली तरी जिल्हा प्रशासनात मात्र परतीचा पाऊसच गृहीत धरला जात आहे. साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने लावलेली रिपरिप सप्टेंबर संपत असतानाही सुरू आहे. रोज कुठे ना कुठे पावसाची नोंद होत आहे. सतत ढगाळ वातावरण व पावसाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहे. पेरणीच्या काळात गायब झाल्यानंतर पावसाने धरलेला जोर अद्यापही संपलेला नाही.पावसात मूग, उडीद ही पिके पूर्णत: उद्ध्वस्त झाली. आता सोयाबीनचा हंगाम सुरू होतो. मात्र, सततच्या पावसामुळे काप्लेक्स स्थिती निर्माण झालेली आहे. मुळकूज, खोडकुज, चक्रीभुंगा, मोझॅक आदींमुळे सोयाबीनच्या सरासरी उत्पादनात किमान ५० ते ६० टक्के घट झाली आहे. सवंगणीच्या काळातदेखील पाऊस पिच्छा सोडत नसल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. जमिनीत आर्द्रता असल्याने कापणी करता येत नाही. अशा विपरीत परिस्थितीत शेंगाना कोंब फुटायला लागले आहेत. नगदी पीक या अर्थाने शेतकरी सोयाबीन पेरतात. यंदा तीन लाख हेक्टरपैकी ७५ टक्के सोयाबीनचे नुकसान झाले आहे.कपाशीवर बोंडअळी अन् बोंडगळमूग, उडिदापाठोपाठ सोयाबीनही हातचे गेल्याने शेतकऱ्यांची आशा कपाशीवर आहेत. मात्र, बहुतांश भागातील कपाशीवर यंदाही गुलाबी बोंडअळीचा अटॅक झाला आहे. सततच्या पावसामुळे जमिनीत पाण्याचा निचरा न झाल्याने बुरशीजन्य रोग व ढगाळ वातावरणामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. पावसामुळे कपाशीची बोंडे काळी पडून गळ व्हायला लागली आहे. शेतकऱ्यांना फवारणीला पुरेसा अवधी या प्रतिकूल वातावरणामुळे मिळालेला नसल्याने यंदा कपाशीचेही पीक हातचे जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.मेळघाट माघारले, जिल्ह्यात सरासरी पारजिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत ७४९.८ मिमी पाऊस अपेक्षित असतो. यंदा ७७९.६ मिमी पाऊस झाला आहे. ही टक्केवारी १०५ आहे. धामणगाव रेल्वेसह चिखलदरा व धारणी तालुके वगळता उर्वरित ११ तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी पार केली आहे. यामध्ये अमरावती ११० टक्के, भातकुली १२१, नांदगाव खंडेश्वर १२५, चांदूर रेल्वे १०९, तिवसा १११, मोर्शी १२२, वरूड १२६, दर्यापूर १४३, अंजनगाव सुर्जी १३१, अचलपूर ८६, चांदूर बाजार १३०, धामणगाव रेल्वे ८७, चिखलदरा ५८ व धारणी तालुक्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस झाला.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती