शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

परतीचा पाऊस सोयाबीन, कपाशीच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 05:00 IST

प्रशासनात १ जूनपासून पावसाची नियमित नोंद घ्यायला सुरुवात होते. ती नोंद ३० सप्टेंबरपर्यत सुरू असते व त्यानंतर येणारा परतीचा पाऊस हा अवकाळी प्रकारात गणला जातो. परतीचा पाऊस हा याच सुमारास सुरू होतो. यावर्षीदेखील परतीचा पाऊस सुरू झाल्याबाबत हवामान विभागात मतभिन्नता असली तरी जिल्हा प्रशासनात मात्र परतीचा पाऊसच गृहीत धरला जात आहे.

ठळक मुद्देहंगाम बाधित : शेंगांना कोंब, पिकांचे सरासरी ७५ टक्के नुकसान, हंगामात शेतकऱ्यांच्या घरी पीक नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सोयाबीन सवंगणीचा हंगाम सुरू होताच परतीच्या पावसालाही सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाणार अशी स्थिती निर्माण झालेली आहे. ऑगस्ट महिन्यापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे पहिल्या टप्प्यातील सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटायला लागले आहेत. भारी जमिनीतील कपाशीची बोंडगळ सुरू झाली आहे. दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे.प्रशासनात १ जूनपासून पावसाची नियमित नोंद घ्यायला सुरुवात होते. ती नोंद ३० सप्टेंबरपर्यत सुरू असते व त्यानंतर येणारा परतीचा पाऊस हा अवकाळी प्रकारात गणला जातो. परतीचा पाऊस हा याच सुमारास सुरू होतो. यावर्षीदेखील परतीचा पाऊस सुरू झाल्याबाबत हवामान विभागात मतभिन्नता असली तरी जिल्हा प्रशासनात मात्र परतीचा पाऊसच गृहीत धरला जात आहे. साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने लावलेली रिपरिप सप्टेंबर संपत असतानाही सुरू आहे. रोज कुठे ना कुठे पावसाची नोंद होत आहे. सतत ढगाळ वातावरण व पावसाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहे. पेरणीच्या काळात गायब झाल्यानंतर पावसाने धरलेला जोर अद्यापही संपलेला नाही.पावसात मूग, उडीद ही पिके पूर्णत: उद्ध्वस्त झाली. आता सोयाबीनचा हंगाम सुरू होतो. मात्र, सततच्या पावसामुळे काप्लेक्स स्थिती निर्माण झालेली आहे. मुळकूज, खोडकुज, चक्रीभुंगा, मोझॅक आदींमुळे सोयाबीनच्या सरासरी उत्पादनात किमान ५० ते ६० टक्के घट झाली आहे. सवंगणीच्या काळातदेखील पाऊस पिच्छा सोडत नसल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. जमिनीत आर्द्रता असल्याने कापणी करता येत नाही. अशा विपरीत परिस्थितीत शेंगाना कोंब फुटायला लागले आहेत. नगदी पीक या अर्थाने शेतकरी सोयाबीन पेरतात. यंदा तीन लाख हेक्टरपैकी ७५ टक्के सोयाबीनचे नुकसान झाले आहे.कपाशीवर बोंडअळी अन् बोंडगळमूग, उडिदापाठोपाठ सोयाबीनही हातचे गेल्याने शेतकऱ्यांची आशा कपाशीवर आहेत. मात्र, बहुतांश भागातील कपाशीवर यंदाही गुलाबी बोंडअळीचा अटॅक झाला आहे. सततच्या पावसामुळे जमिनीत पाण्याचा निचरा न झाल्याने बुरशीजन्य रोग व ढगाळ वातावरणामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. पावसामुळे कपाशीची बोंडे काळी पडून गळ व्हायला लागली आहे. शेतकऱ्यांना फवारणीला पुरेसा अवधी या प्रतिकूल वातावरणामुळे मिळालेला नसल्याने यंदा कपाशीचेही पीक हातचे जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.मेळघाट माघारले, जिल्ह्यात सरासरी पारजिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत ७४९.८ मिमी पाऊस अपेक्षित असतो. यंदा ७७९.६ मिमी पाऊस झाला आहे. ही टक्केवारी १०५ आहे. धामणगाव रेल्वेसह चिखलदरा व धारणी तालुके वगळता उर्वरित ११ तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी पार केली आहे. यामध्ये अमरावती ११० टक्के, भातकुली १२१, नांदगाव खंडेश्वर १२५, चांदूर रेल्वे १०९, तिवसा १११, मोर्शी १२२, वरूड १२६, दर्यापूर १४३, अंजनगाव सुर्जी १३१, अचलपूर ८६, चांदूर बाजार १३०, धामणगाव रेल्वे ८७, चिखलदरा ५८ व धारणी तालुक्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस झाला.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती