शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

परतीचा पाऊस सोयाबीन, कपाशीच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 05:00 IST

प्रशासनात १ जूनपासून पावसाची नियमित नोंद घ्यायला सुरुवात होते. ती नोंद ३० सप्टेंबरपर्यत सुरू असते व त्यानंतर येणारा परतीचा पाऊस हा अवकाळी प्रकारात गणला जातो. परतीचा पाऊस हा याच सुमारास सुरू होतो. यावर्षीदेखील परतीचा पाऊस सुरू झाल्याबाबत हवामान विभागात मतभिन्नता असली तरी जिल्हा प्रशासनात मात्र परतीचा पाऊसच गृहीत धरला जात आहे.

ठळक मुद्देहंगाम बाधित : शेंगांना कोंब, पिकांचे सरासरी ७५ टक्के नुकसान, हंगामात शेतकऱ्यांच्या घरी पीक नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सोयाबीन सवंगणीचा हंगाम सुरू होताच परतीच्या पावसालाही सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाणार अशी स्थिती निर्माण झालेली आहे. ऑगस्ट महिन्यापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे पहिल्या टप्प्यातील सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटायला लागले आहेत. भारी जमिनीतील कपाशीची बोंडगळ सुरू झाली आहे. दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे.प्रशासनात १ जूनपासून पावसाची नियमित नोंद घ्यायला सुरुवात होते. ती नोंद ३० सप्टेंबरपर्यत सुरू असते व त्यानंतर येणारा परतीचा पाऊस हा अवकाळी प्रकारात गणला जातो. परतीचा पाऊस हा याच सुमारास सुरू होतो. यावर्षीदेखील परतीचा पाऊस सुरू झाल्याबाबत हवामान विभागात मतभिन्नता असली तरी जिल्हा प्रशासनात मात्र परतीचा पाऊसच गृहीत धरला जात आहे. साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने लावलेली रिपरिप सप्टेंबर संपत असतानाही सुरू आहे. रोज कुठे ना कुठे पावसाची नोंद होत आहे. सतत ढगाळ वातावरण व पावसाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहे. पेरणीच्या काळात गायब झाल्यानंतर पावसाने धरलेला जोर अद्यापही संपलेला नाही.पावसात मूग, उडीद ही पिके पूर्णत: उद्ध्वस्त झाली. आता सोयाबीनचा हंगाम सुरू होतो. मात्र, सततच्या पावसामुळे काप्लेक्स स्थिती निर्माण झालेली आहे. मुळकूज, खोडकुज, चक्रीभुंगा, मोझॅक आदींमुळे सोयाबीनच्या सरासरी उत्पादनात किमान ५० ते ६० टक्के घट झाली आहे. सवंगणीच्या काळातदेखील पाऊस पिच्छा सोडत नसल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. जमिनीत आर्द्रता असल्याने कापणी करता येत नाही. अशा विपरीत परिस्थितीत शेंगाना कोंब फुटायला लागले आहेत. नगदी पीक या अर्थाने शेतकरी सोयाबीन पेरतात. यंदा तीन लाख हेक्टरपैकी ७५ टक्के सोयाबीनचे नुकसान झाले आहे.कपाशीवर बोंडअळी अन् बोंडगळमूग, उडिदापाठोपाठ सोयाबीनही हातचे गेल्याने शेतकऱ्यांची आशा कपाशीवर आहेत. मात्र, बहुतांश भागातील कपाशीवर यंदाही गुलाबी बोंडअळीचा अटॅक झाला आहे. सततच्या पावसामुळे जमिनीत पाण्याचा निचरा न झाल्याने बुरशीजन्य रोग व ढगाळ वातावरणामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. पावसामुळे कपाशीची बोंडे काळी पडून गळ व्हायला लागली आहे. शेतकऱ्यांना फवारणीला पुरेसा अवधी या प्रतिकूल वातावरणामुळे मिळालेला नसल्याने यंदा कपाशीचेही पीक हातचे जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.मेळघाट माघारले, जिल्ह्यात सरासरी पारजिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत ७४९.८ मिमी पाऊस अपेक्षित असतो. यंदा ७७९.६ मिमी पाऊस झाला आहे. ही टक्केवारी १०५ आहे. धामणगाव रेल्वेसह चिखलदरा व धारणी तालुके वगळता उर्वरित ११ तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी पार केली आहे. यामध्ये अमरावती ११० टक्के, भातकुली १२१, नांदगाव खंडेश्वर १२५, चांदूर रेल्वे १०९, तिवसा १११, मोर्शी १२२, वरूड १२६, दर्यापूर १४३, अंजनगाव सुर्जी १३१, अचलपूर ८६, चांदूर बाजार १३०, धामणगाव रेल्वे ८७, चिखलदरा ५८ व धारणी तालुक्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस झाला.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती