शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

हरविलेले मोबाईल नागरिकांना परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 23:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हरविलेले मोबाइल ट्रेस करून शोधलेले ३० मोबाइल सायबर पोलिसांनी सोमवारी नागरिकांना परत केले. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या हस्ते ते मोबाइल संबंधित नागरिकांच्या स्वाधीन करण्यात आले. १ एप्रिल रोजी सायबर ठाणे सुरू झाल्यानंतर पोलिसांनी ३० मोबाइल ट्रेस करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.शहर पोलीस आयुक्तालयातील सभागृहात सोमवारी मिसिंग ...

ठळक मुद्देमिसिंग मोबाईल : सायबर पोलिसांकडून ट्रेस, ३० जणांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हरविलेले मोबाइल ट्रेस करून शोधलेले ३० मोबाइल सायबर पोलिसांनी सोमवारी नागरिकांना परत केले. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या हस्ते ते मोबाइल संबंधित नागरिकांच्या स्वाधीन करण्यात आले. १ एप्रिल रोजी सायबर ठाणे सुरू झाल्यानंतर पोलिसांनी ३० मोबाइल ट्रेस करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.शहर पोलीस आयुक्तालयातील सभागृहात सोमवारी मिसिंग मोबाइल परत करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायबर ठाण्याच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महिनाभरात हरविलेल्या मोबाइलचे शोधकार्य केले. मोबाईल ट्रेस करून ते वापरणाऱ्या नागरिकांकडून जप्त केले. जप्त केलेल्या ३० मोबाइलची किंमत ३ लाख ३५ हजार ४४८ रुपये आहे. मागील दोन वर्षांत शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतून ७०० च्या जवळपास नागरिकांचे मोबाईल हरविले आहेत. या मोबाइलचा शोध सायबर ठाण्याचे पोलीस करीत असून सद्यस्थितीत ३० मोबाईल ट्रेस करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.बहुतांश मोबाइल नागपुरी गेट हद्दीतून जप्तहरविलेले मोबाइल ट्रेस झाल्यानंतर त्यापैकी सर्वाधिक मोबाइल नागपुरी गेट व खोलापुरी गेट हद्दीतील नागरिकांजवळ असल्याचे निदर्शनास आले. सायबर पोलिसांनी संबंधित व्यक्तींकडून ते मोबाइल जप्त करण्यात आले. याच परिसरात बहुतांश मोबाइल चोर आढळून आले असून, हे मोबाइल हरविलेले होते की, चोरण्यात आले याबाबत संभ्रम कायम आहे.ट्रेसिंगसाठी सायबर टीमचे परिश्रमहरविलेले मोबाईल ट्रेस करणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सत्कार केला. सहायक पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्यासोबतच पोलीस उपनिरीक्षक ईश्वर वर्गे, पोलीस शिपाई सुधीर चर्जन, सचिन भोयर, गोपाल सोळंके यांनी अथक परिश्रम घेतले.यांना मिळाले मोबाईलसंदीप भादर्गे, नितू वाघमारे, जितेंद्र शर्मा, सचीन गुप्ता, खुशबु साहू, अभिजीत रहाटे, सुरेश मालाणी, प्रशांत हाडे, ऋषिकेश राठी, राहुल कोंडे, अशलेश चौधरी, अशोक वाटेकर, दिलीप आहुजा, आदित्य खंडलेवार, आदीत्य कोरडे, सौरभ निगोंट व मुकुंद इंदुरकर यांना सोमवारी मोबाईल परत करण्यात आले.