शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

भूजल उपशावर निर्बंध, बोअरवेल खोदाईवर नियंत्रण

By admin | Updated: April 24, 2016 00:04 IST

बेसुमार पाणी उपशामुळे खालावलेला भूजल साठा आणि पाण्याच्या शोधासाठी भूगर्भात खोलवर जाण्याच्या

जलपातळी घटली : महाराष्ट्र भूजल अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणीअमरावती : बेसुमार पाणी उपशामुळे खालावलेला भूजल साठा आणि पाण्याच्या शोधासाठी भूगर्भात खोलवर जाण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी २०० फुटापेक्षा खोलवर बोअरवेल खोदण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्यात पाणी टंचाईने उग्ररुप धारण केले आहे. या टंचाई स्थितीमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असल्याने बोअरवेलच्या खोलीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र भूजल (विकास व्यवस्थापन) अधिनियमाची राज्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्यात यापुढील काळात दुष्काळी परिस्थिती टाळण्यासाठी बोअरवेल खोदाईवर नियंत्रण आणणे गरजेचे झाले आहे. जमिनीत जेवढे पाणी मुरते, त्यापेक्षा कित्येक पटींनी अधिक पाणी भूगर्भातून उपसले जावे. राज्याच्या काही भागात भुजलाचे अतिशोषण झाले आहे. भूजलाचा वापर आणि शोषित पाणलोटचे नियमन, त्याचे दुष्परिणाम तसेच लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन करण्यासंदर्भातील एक दृष्टीनिबंध भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने तयार केला आहे. त्यामध्ये पाणलोट क्षेत्रात होणारा भूजलाचा अतिरेकी वापर, स्थिरता, विहिरीमधील कमी झालेले पाणी आणि सिंचन क्षेत्रात झालेली घट यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्याची स्थितीमार्च २०१६ मध्ये अचलपूर, चांदूरबाजार, चांदूररेल्वे आणि अंजनगाव सुर्जी तालुका वगळता अन्य तालुक्यातील भूजल पातळीत सरासरी ०.१८ मिटरने घट दिसून आली आहे. मार्च २०१६ मध्ये भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने भूजल पातळीचे सर्वेक्षण करण्यात आले. यात १४३ विहिरीतील निरीक्षण नोंदविण्यात आले. ड्रायझोनमध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्रात बोअरवेल करता येत नाही.