शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

भूजल उपशावर निर्बंध, बोअरवेल खोदाईवर नियंत्रण

By admin | Updated: April 24, 2016 00:04 IST

बेसुमार पाणी उपशामुळे खालावलेला भूजल साठा आणि पाण्याच्या शोधासाठी भूगर्भात खोलवर जाण्याच्या

जलपातळी घटली : महाराष्ट्र भूजल अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणीअमरावती : बेसुमार पाणी उपशामुळे खालावलेला भूजल साठा आणि पाण्याच्या शोधासाठी भूगर्भात खोलवर जाण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी २०० फुटापेक्षा खोलवर बोअरवेल खोदण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्यात पाणी टंचाईने उग्ररुप धारण केले आहे. या टंचाई स्थितीमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असल्याने बोअरवेलच्या खोलीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र भूजल (विकास व्यवस्थापन) अधिनियमाची राज्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्यात यापुढील काळात दुष्काळी परिस्थिती टाळण्यासाठी बोअरवेल खोदाईवर नियंत्रण आणणे गरजेचे झाले आहे. जमिनीत जेवढे पाणी मुरते, त्यापेक्षा कित्येक पटींनी अधिक पाणी भूगर्भातून उपसले जावे. राज्याच्या काही भागात भुजलाचे अतिशोषण झाले आहे. भूजलाचा वापर आणि शोषित पाणलोटचे नियमन, त्याचे दुष्परिणाम तसेच लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन करण्यासंदर्भातील एक दृष्टीनिबंध भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने तयार केला आहे. त्यामध्ये पाणलोट क्षेत्रात होणारा भूजलाचा अतिरेकी वापर, स्थिरता, विहिरीमधील कमी झालेले पाणी आणि सिंचन क्षेत्रात झालेली घट यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्याची स्थितीमार्च २०१६ मध्ये अचलपूर, चांदूरबाजार, चांदूररेल्वे आणि अंजनगाव सुर्जी तालुका वगळता अन्य तालुक्यातील भूजल पातळीत सरासरी ०.१८ मिटरने घट दिसून आली आहे. मार्च २०१६ मध्ये भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने भूजल पातळीचे सर्वेक्षण करण्यात आले. यात १४३ विहिरीतील निरीक्षण नोंदविण्यात आले. ड्रायझोनमध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्रात बोअरवेल करता येत नाही.