शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

वरूड येथे महाराजस्व अभियानाला प्रतिसाद

By admin | Updated: September 6, 2015 00:06 IST

समाजाचे ऋण फेडणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आलेल्या नागरिकांना मायबाप ...

प्रवीण पोटे : मायबाप समजून नागरिकांची कामे करा वरुड : समाजाचे ऋण फेडणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आलेल्या नागरिकांना मायबाप समजून कामे करण्याचे कळकळीचे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये आयोजित महाराजस्व अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी केले.पुढे बोलताना ना. पोटे म्हणाले की, ज्या सरकारने साठ वर्षांत केले नाही ते आम्ही नऊ महिन्यांत करून दाखविले. जलशिवार योजनेअंतर्गत २४१ टीएमसी पाण्याची उपलब्धता होऊन १५ हजार हेक्टर जमिनीची सिंचन व्यवस्था झाली. शासनाच्या लोकहिताच्या अनेक योजना आहेत. त्या तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचत नाही. याकरिता कार्यकर्त्यांनी पुढे येऊन कार्य करावे. या योजनांचा लाभ सर्वसामान्य शेतकरी, नागरिकांना घेता येईल. आम्ही मंत्री जरी असलो तरी जनतेचे सेवक आहोत, हे विसरुन चालणार नाही. अधिकारी हा शासनाचा चेहरा असता. तो पारदर्शीर् असणे गरजेचे आहे. सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांनी कामात हयगय केल्यास आम्हाला कळवा. त्याला वठणीवर आणण्याचे काम आम्ही करणार असल्याचेही पोटे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाहून आ. अनिल बोंडे यांनी सांगितले की, तालुक्यातील सिंचन प्रकल्पाचे काम संथगतीने सुरु आहे. नागठाणा २, भेमडी, झटामझीरी तसेच पवनी प्रकल्प आहे. भ्रष्टाचारामुळेच पंढरी प्रक्लपाचा कंत्रादार जेलमध्ये गेल्याचेही सांगण्यास ते विसरले नाही. यावेळी आ. अनिल बोंडे, नगराध्यक्ष रवींद्र थोरात, शेंदूरजनाघाटच्या नगराध्यक्ष सरिता चेरडे, पंचायत समिती सभापती निता जिचकार, वसुधा बोंडे, जि.प.सदस्य अर्चना मुरुमकर, सुनीता डाहाके, बबन लायदे पाटील, प्रभाकर काळे, रमेश देशमुख, बाळासाहेब मुरुमकर, प्रभाकर काळे सह आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपविभागिय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी केले. यामध्ये महाराजस्व अभियानाबाबत माहिती दिली. सर्व विभाग एकाच छताखाली आणून एकाच दिवशी नागरिकांची कामे करण्याचा उद्देश असल्याचेही सोगितले. याप्रसंगी ग्रामीण रुग्णालय संलग्नीत रक्तदाता संघाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले. होते यावेळी रुग्णालयाचे अधीक्षक प्रमोद पोतदार, जितेेंद्र शेटीये, सचिव चरण सोनारे, पंकज केचे यांचा पालकमंत्री पोटे, आ. बोंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रक्तदाता संघाबाबत माहिती संजय खासबागे यांनी दिली. महाराजस्व अभियानादरम्यान नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)