शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

सर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवा

By admin | Updated: August 25, 2015 00:28 IST

महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाद्वारे महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे.

पालकमंत्री पोटे यांचे प्रतिपादन : महाराजस्व अभियानांतर्गत समाधान योजनेचा प्रारंभअमरावती : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाद्वारे महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांचे महसूल व इतर शासकीय कार्यालयांशी संबंधित प्रश्न सामाजिक बांधिलकीतून निकाली काढावे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.स्थानिक तहसील कार्यालयाच्या वतीने वलगाव येथे महाराजस्व अभियान २०१५-१६ अंतर्गत विस्तारित समाधान योजना या दिवसानिमित्त एक दिवशीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून पालकमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार यशोमती ठाकूर, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, वलगाव पंचायत समिती सदस्या सुनंदा उगले, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय मुळे, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, तहसीलदार सुरेश बगळे आदी उपस्थित होते.पालकमंत्री पुढे म्हणाले, महाराजस्व अभियान हा शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून या अभियानांतर्गत विस्तारित समाधान योजना नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आहे. ग्रामीण भागातील जनतेचे, शेतकऱ्यांचे महसूल व इतर शासकीय विभागाशी संबंधित समस्या व अडचणींचे निराकरण गाव पातळीवर त्याच ठिकाणी संबंधित विभागाने करावे, असे निर्देश देऊन पालकमंत्री म्हणाले. गाव पातळीवर ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना सर्व शासकीय योजनांची माहिती, त्यानुषंगाने मिळणारे विविध लाभ, महसूल विभागाशी संबंधित दाखले, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलीयर, शेतीचा ७/१२ उतारा आदी महसूल विषयक कामे त्याच गावी एकाच ठिकाणी पारदर्शकतेने करावे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत त्या योजनांची माहिती नागरिकांनी घेऊन लाभ घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले. अधिकारी हा शासनाचा चेहरा असतो. समाजात शासनाची प्रतिमा चांगली राहण्यासाठी अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या अडचणी प्राधान्याने सोडवाव्यात. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून प्रवृत्त करण्यासाठी शासनाव्दारे अन्न सुरक्षा योजना पुरस्कृत करण्यात आली आहे. जिल्ह्यात या योजनेचा दोन हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना पाच किलो अन्नधान्य वितरित केले जाते. सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीयांच्या कल्याणार्थ राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा. शेतकऱ्यांच्या सुलभतेसाठी महसूल विभागाव्दारे संगणीकृत शेतीचा ७/१२ उतारा फक्त रुपये १५ मध्ये शेतकऱ्यांच्या गावी देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहितीही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.यावेळी आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या, घरकूल योजनेंतर्गत गरजू व खरोखर पात्र असणाऱ्या उमेदवारांना घरकूल उपलब्ध करून द्यावे. तसेच गावातील रस्ते दुरूस्ती, शेतजमीन वाटणी, अतिक्रमित जमीन, पाणंद रस्ते यासबंधीच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी शासकीय यंत्रणेने जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. या परिसरातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून खचलेल्या विहिरी बांधण्यासाठी निधी झाला पाहिजे, असे ठाकूर यांनी सांगितले.जिल्हाधिकारी किरण गित्ते मार्गदर्शन करताना म्हणाले, महसूल विभागाद्वारे ग्रामस्थांच्या समस्या गाव पातळीवर सोडविण्यासाठी हे अभियान आहे. या शिबिरात कृषी, आरोग्य, जलसंपदा, शिक्षण, प्रादेशिक परिवहन, महसूल यासह इतर विभागांचे एकूण ३० स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. मार्च २०१६ पर्यंत सुमारे २०० कार्यक्रम या अभियांतर्गत घेण्यात येतील.जिल्ह्यातील नागरिकांच्या काही तक्रारी व सूचना असल्यास त्या नोंदविण्यासाठी १८०० २३३ ६४४८ टोलफ्री क्रमांकाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे संचालन नीता लबडे यांनी तर आभार प्रदर्शन धीरज नांदवे यांनी केले. यावेळी वलगाव परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घेण्यासाठी उपस्थित होते. (प्रतिनिधी)