शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

हातुर्णा येथील पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:23 IST

राजुरा बाजार : सन १९९१ च्या महापुरात वाहून गेलेल्या घराचा व पुनर्वसनचा प्रश्न शासनाने अद्याप निकाली न काढल्याने अखेर ...

राजुरा बाजार : सन १९९१ च्या महापुरात वाहून गेलेल्या घराचा व पुनर्वसनचा प्रश्न शासनाने अद्याप निकाली न काढल्याने अखेर हातुर्णा येथील नागरिकांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले आंदोलन केले. स्थानिक प्रशासनाविरुध्द रोष व्यक्त करून आंदोलक उग्र होण्याची शक्यता आहे. सन १९९१ साली वर्धा नदीला आलेल्या पुराचा हातुर्णा गावातील नागरिकांना जबर फटका बसला. यात अनेक घरे वाहून गेली. यावेळी हातुर्णा येथील १६९ नागरिकांचे पुनर्वसनाचे आश्वासन शासनाने दिले. कालांतराने तेथील शासकीय जमिनीवर पट्टेसुद्धा पाडण्यात आले. मात्र ३० वर्षांपासून १६९ पुनर्वसित नागरिकांना पट्ट्यांचे वाटप रखडले. पट्टे न मिळाल्याने क्षतिग्रस्त घरात राहणे नागरिकांच्या नशिबी आले आहे. आज उद्याच्या आशेवर आतापर्यंत घराचे स्वप्न बघणाऱ्या गावकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. आजपर्यंत अनेक लोकप्रतिनिधींकडे गार्हाणे मांडले. निवेदने दिलीत. परंतु पट्टे मिळालेच नाही. अनेकांची घरे खचली, पडली, काही नागरिक गावातच जागा मिळेल तिथे, तर कुणी भाड्याच्या घरात राहत आहेत. शेवटी आज त्या गावकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला व गावकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. या आंदोलनासंदर्भात ग्रामस्थांनी तहसीलदारांना पाच-सहा दिवसांपूर्वी निवेदन दिले. त्यातून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, प्रशासनाने निवेदनाची दखल न घेतल्याने अखेर बुधवारी सकाळी ११ वाजतापासून आंदोलक पाण्याच्या टाकीजवळ जमा झाले, काही नागरिक पाण्याच्या टाकीवर चढले. दरम्यान या आंदोलनाची माहिती मिळाल्यावरून नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी आंदोलनस्थळी दाखल झाल्या. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलक पाण्याच्या टाकीवरून खाली येण्यास तयार नसल्याने चर्चा होऊ शकली नाही. या आंदोलनात १६९ पुनर्वसनग्रस्त व कुटुंबीय सहभागी होते. यावेळी बेनोडा शहीदचे ठाणेदार मिलिंद सरकटे, उपनिरीक्षक गणपत पुपुलवार यांनी ताफ्यासह घस्तनास्थळ गाठले. वृत्तालिहिस्तोवर आंदोलक पाण्याच्या टाकीवरच होते. खाली पोलिसांचा बंदोबस्त तैनात केलेला होता. आंदोलकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांशीच चर्चा करणार, असा पवित्रा घेतला होता. यात विनोद ठाकरे, पंकज ठाकरे, हर्षल ठाकरे, मंगेश कोरडे, मनोहर रामटेके, नामदेव पेठे, सचिन पेठे, सारंग ठाकरे, जानराव चौधरी, दीपक पोहणे, सुरेश ठाकरे, दीपक ठाकरे, रामेश्वर अलोणे, श्रीराम घागरे, मधुकर गावंडे, सुनील गावंडे, शालिक धुर्वे, सुरेंद्र घाटोळे, सचिन पेठे, ज्योती गजानन ठाकरे, निर्मला चौधरी, कुसुम ठाकरे व ग्रामस्थ सहभागी होते.

आम्ही तहसीलदार, उपविभागीय अधिकारी मोर्शी यांना निवेदन दिले. विविध बैठका झाल्यात. मात्र प्रशासनाने प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आता आम्ही न्याय्य हक्कासाठी आरपारची लढाई लढू.

- विनोद ठाकरे,

आंदोलक ग्रामवासी