शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

हातुर्णा येथील पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:23 IST

राजुरा बाजार : सन १९९१ च्या महापुरात वाहून गेलेल्या घराचा व पुनर्वसनचा प्रश्न शासनाने अद्याप निकाली न काढल्याने अखेर ...

राजुरा बाजार : सन १९९१ च्या महापुरात वाहून गेलेल्या घराचा व पुनर्वसनचा प्रश्न शासनाने अद्याप निकाली न काढल्याने अखेर हातुर्णा येथील नागरिकांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले आंदोलन केले. स्थानिक प्रशासनाविरुध्द रोष व्यक्त करून आंदोलक उग्र होण्याची शक्यता आहे. सन १९९१ साली वर्धा नदीला आलेल्या पुराचा हातुर्णा गावातील नागरिकांना जबर फटका बसला. यात अनेक घरे वाहून गेली. यावेळी हातुर्णा येथील १६९ नागरिकांचे पुनर्वसनाचे आश्वासन शासनाने दिले. कालांतराने तेथील शासकीय जमिनीवर पट्टेसुद्धा पाडण्यात आले. मात्र ३० वर्षांपासून १६९ पुनर्वसित नागरिकांना पट्ट्यांचे वाटप रखडले. पट्टे न मिळाल्याने क्षतिग्रस्त घरात राहणे नागरिकांच्या नशिबी आले आहे. आज उद्याच्या आशेवर आतापर्यंत घराचे स्वप्न बघणाऱ्या गावकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. आजपर्यंत अनेक लोकप्रतिनिधींकडे गार्हाणे मांडले. निवेदने दिलीत. परंतु पट्टे मिळालेच नाही. अनेकांची घरे खचली, पडली, काही नागरिक गावातच जागा मिळेल तिथे, तर कुणी भाड्याच्या घरात राहत आहेत. शेवटी आज त्या गावकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला व गावकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. या आंदोलनासंदर्भात ग्रामस्थांनी तहसीलदारांना पाच-सहा दिवसांपूर्वी निवेदन दिले. त्यातून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, प्रशासनाने निवेदनाची दखल न घेतल्याने अखेर बुधवारी सकाळी ११ वाजतापासून आंदोलक पाण्याच्या टाकीजवळ जमा झाले, काही नागरिक पाण्याच्या टाकीवर चढले. दरम्यान या आंदोलनाची माहिती मिळाल्यावरून नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी आंदोलनस्थळी दाखल झाल्या. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलक पाण्याच्या टाकीवरून खाली येण्यास तयार नसल्याने चर्चा होऊ शकली नाही. या आंदोलनात १६९ पुनर्वसनग्रस्त व कुटुंबीय सहभागी होते. यावेळी बेनोडा शहीदचे ठाणेदार मिलिंद सरकटे, उपनिरीक्षक गणपत पुपुलवार यांनी ताफ्यासह घस्तनास्थळ गाठले. वृत्तालिहिस्तोवर आंदोलक पाण्याच्या टाकीवरच होते. खाली पोलिसांचा बंदोबस्त तैनात केलेला होता. आंदोलकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांशीच चर्चा करणार, असा पवित्रा घेतला होता. यात विनोद ठाकरे, पंकज ठाकरे, हर्षल ठाकरे, मंगेश कोरडे, मनोहर रामटेके, नामदेव पेठे, सचिन पेठे, सारंग ठाकरे, जानराव चौधरी, दीपक पोहणे, सुरेश ठाकरे, दीपक ठाकरे, रामेश्वर अलोणे, श्रीराम घागरे, मधुकर गावंडे, सुनील गावंडे, शालिक धुर्वे, सुरेंद्र घाटोळे, सचिन पेठे, ज्योती गजानन ठाकरे, निर्मला चौधरी, कुसुम ठाकरे व ग्रामस्थ सहभागी होते.

आम्ही तहसीलदार, उपविभागीय अधिकारी मोर्शी यांना निवेदन दिले. विविध बैठका झाल्यात. मात्र प्रशासनाने प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आता आम्ही न्याय्य हक्कासाठी आरपारची लढाई लढू.

- विनोद ठाकरे,

आंदोलक ग्रामवासी