शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

परतवाड्यात ३० महिला घेणार अवयवदानाचा संकल्प, राज्यातील पहिलाच अभिनव प्रयोग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 21:28 IST

अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असले तरी त्यासाठी अजूनही नागरिक-नातेवाईक धजावत नाहीत. तथापि, परतवाड्यातील तब्बल ३० महिलांनी एकदिलाने अवयवदानाचा संकल्प केला आहे. परतवाडा येथे महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधून पुनर्जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून बुधवारी त्या संकल्पपत्र भरून देतील.

- नरेंद्र जावरे

परतवाडा : अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असले तरी त्यासाठी अजूनही नागरिक-नातेवाईक धजावत नाहीत. तथापि, परतवाड्यातील तब्बल ३० महिलांनी एकदिलाने अवयवदानाचा संकल्प केला आहे. परतवाडा येथे महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधून पुनर्जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून बुधवारी त्या संकल्पपत्र भरून देतील. राज्यात बहुधा पहिल्यांदा महिलांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात अवयवदान जागृती उपक्रम होत आहे. परतवाडा शहरात पुनर्जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत २५ नागरिकांनी अवयवदानाचा  संकल्प केला आहे. बुधवारी महात्मा फुले जयंतीनिमित्त तब्बल ३० महिला संकल्प करणार आहेत. यामुळे परतवाडा शहरातील अवयवदात्यांची संख्या ५५ झाली आहे. मृत्यूनंतर आपल्या शरीरातील आवश्यक असे अवयव दुसºयाला दान देऊन त्याचे उर्वरित आयुष्य उज्ज्वल करण्याचे कार्य स्पृहणीय आहे. याबद्दल जनमानसात मोठ्या प्रमाणात जागृती व्हावी, यासाठी राज्यस्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. त्याला अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे सर्वाधिक प्रमाणात यश मिळत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. अमरावती येथे तीन रुग्णांचे उर्वरित आयुष्य अवयवदान करून उज्ज्वल करण्यात आले. त्यात एका किडनी प्रत्यारोपण केलेल्या रुग्णाचासुद्धा समावेश आहे.

महिला घेणार आज संकल्प अवयवदान करण्याचा संकल्प आतापर्यंत मोठ्या प्रमाणात युवकांनी आणि पुरुषांनीच घेतला. परंतु, पहिल्यांदा 30 महिला अवयवदान करण्याचा हा अभिनव संकल्प बुधवारी करणार आहेत. इतर महिला, युवकांमध्ये त्या जनजागृती करणार आहेत. 

पुनर्जीवन फाऊंडेशनच्या माध्यमातून बुधवारी ३० महिला अवयवदानाचा संकल्प करणार आहेत. यापूर्वी २५ जणांनी हा संकल्प केला आहे. डॉ. राजेश उभाड, अध्यक्ष, पुनर्जीवन फाउंडेशन, परतवाडा

टॅग्स :Organ donationअवयव दान