शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

गृह विभागाच्या कारागृहातून आदिवासींची 'राखीव' पदे बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 11:38 IST

Amravati : गट 'क' संवर्गात भरली १३५ पदे; १५ पदे अधिसंख्य, रिक्त पदेही गायब

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या कारागृह विभागातून अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेली 'क्लास वन, क्लास टू, क्लास फोर' ची पदे बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्र कारागृह विभागाचे मुख्यालय पुण्यात असून या विभागात ९ मध्यवर्ती कारागृहे, ३१ जिल्हा कारागृहे, १९ खुली कारागृहे, १ खुली वसाहत आणि १७२ दुय्यम कारागृहांचा समावेश आहे.

कारागृह महाराष्ट्र पुणे गट 'अ' ते 'ड' संवर्गात एकूण मंजूर पदे ५ हजार ६४ आहे. यातील केवळ गट 'क' संवर्गातील १५८ पदे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. परंतु अनुसूचित जमातींची गट 'क' संवर्गातील केवळ १३५ पदे भरलेली आहे. याच संवर्गातील २३ सवाया मनुश्य शिल्लक आहे 

अनुसूचित जमातींच्या राखीव जागेवर नियुक्त झालेल्या व नंतर मात्र जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या १५ आहे. परंतु ही १५ पदे रिक्त दाखविण्यात आलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ रोजी निर्णय देऊनही या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी राज्यात होत नसल्याचे चित्र आहे. 

अनुसूचित जमाती पदभरती तपशीलसंवर्ग                       एकूण मंजूर पदे              राखीव पदे                  भरलेली                 अधिसंख्यगट - अ                         ४७                                   ०                                 ०                              ०गट - ब                         ५१६                                  ०                                 ०                              ०गट - क                        ४४७२                              १५८                             १३५                          १५गट - ड                         २९                                    ०                                 ०                              ०एकूण                            ५०६४                              १५८                            १३५                          १५

"अधिसंख्य पदावर १५ जणांना वर्ग केल्यानंतर ती पदे रिक्त दाखवायला पाहिजे होती. पण दाखविण्यात आली नाही. सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ रोजी दिलेल्या निर्णयाची राज्यात कठोर अंमलबजावणी करून अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची विशेष पदभरती मोहीम राबविण्यात यावी."- सीमा मंगाम जिल्हाध्यक्ष, ट्रायबल वुमेन्स फोरम यवतमाळ

 

टॅग्स :Amravatiअमरावती