शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

शेतकऱ्यांनी स्वत:च व्हावे संशोधक

By admin | Updated: January 31, 2017 00:32 IST

पगारी कर्मचारी संशोधक होऊ शकत नाहीत. त्यामुळे संशोधनासाठी शासनावर अवलंबून न राहता

दादाजी खोब्रागडे : ‘तांदूळ महोत्सवा’चे थाटात उद्घाटन अमरावती : पगारी कर्मचारी संशोधक होऊ शकत नाहीत. त्यामुळे संशोधनासाठी शासनावर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी स्वत:च स्वत:च्या शेतात संशोधन करावे आणि नवनवीन फायदेशीर वाणांची निर्मिती करावी. उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन ‘एचएमटी’ तांदळाच्या वाणाचे जनक, कृषीभूषण दादाजी खोब्रागडे यांनी केले. फ्रेंड्स आॅफ फार्मर्स, कृषी समृद्धी शेतकी उत्पादन कंपनी व श्रमजीवी उत्पादक कंपनीच्या संयुक्त विद्यमाने नागपूर, भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांद्वारे उत्पादित तांदळाची ग्राहकांना थेट विक्री करण्यासाठी हा महोत्सवाचे आयोजित केला आहे. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव धनंजय धवड, शेतीतज्ज्ञ अरविंद नळकांडे, फ्रेंड्स आॅफ फार्मर्सच्या पौर्णिमा सवाई, ज्योत्स्ना ठाकरे आदींची उपस्थिती होती. दादाजी खोब्रागडे पुढे म्हणाले, शेतकरी आणि ग्राहकांमध्ये असलेल्या व्यापाऱ्यांच्या साखळीतून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यामध्ये ग्राहकांची फसवणूक तर होतेच पण शेतकरी देखील नाडवला जातो. अन्नधान्यामध्ये होणारी भेसळ हा त्यातलाच एक प्रकार आहे. शेतकरी धान्यात कधीच भेसळ करीत नाही तर व्यापारी भेसळ करतात. त्यामुळेच ग्राहकांनीही शेतकऱ्यांची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी त्यांच्याकडून अन्नधान्य, भाजीपाला खरेदी करून त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. कार्यक्रमाला फ्रेंड्स आॅफ फार्मर्सच्या रंजना झोंबाडे, ज्योत्सना ठाकरे, स्मिता पाटील, श्वेता खापेकर, पौर्णिमा सवई, रेखा जिचकार, माया पुसदेकर आदी उपस्थित होत्या. प्रास्ताविक कृषी समृद्धी प्रकल्पाचे रवि पाटील यांनी केले. महिलांचाच पुढाकार ४‘फ्रेंड्स आॅफ फार्मर्स’ हा महिला शेतकऱ्यांचाच समूह असून या समूहातील महिलांनी या आगळ्या-वेगळ्या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना शेतमालाच्या थेट विक्रीसाठी मदत करण्याच्या उद्देशाने महिलांनीच प्रथम पुढाकार घेतला असून, हेच या तांदूळ महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.