शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

कुमारी मातांवरील संशोधन प्रकल्प राज्य महिला आयोगाला सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 11:32 IST

राज्य महिला आयोगाच्या अर्थसाहाय्याने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील वूमेन्स स्टडीज सेंटरने तयार केलेला ‘यवतमाळ जिल्ह्यातील कुमारी मातांच्या समस्यांचे अध्ययन’ या विषयावरील संशोधन प्रकल्पाचा अहवाल आयोगाला सादर करण्यात आला.

ठळक मुद्देसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा पुढाकार आयोगाचे प्रकल्पास अर्थसहाय्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य महिला आयोगाच्या अर्थसाहाय्याने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील वूमेन्स स्टडीज सेंटरने तयार केलेला ‘यवतमाळ जिल्ह्यातील कुमारी मातांच्या समस्यांचे अध्ययन’ या विषयावरील संशोधन प्रकल्पाचा अहवाल आयोगाला सादर करण्यात आला. या प्रकल्पात प्रतिबंधक, समस्या निराकरणाशी संबंधित उपायांचा अंतर्भाव आहे.विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात ‘कुमारी माता’ ही एक गंभीर समस्या आहे. दिवसेंदिवस ही समस्या उग्र रूप धारण करीत आहे. विशेषत: झरी-जामनी या तालुक्यात या समस्येचे प्रमाण अधिक आहे. या भागातील कोलाम आदिवासी जमातीशी ही समस्या निगडित आहे. त्यामुळे या संशोधनात झरी-जामनी परिसर निवडण्यात आला. प्रकल्प संचालक डॉ.वैशाली गुडधे व प्रकल्प सहायक म्हणून वैभव अर्मळ यांनी कार्य केले. या संशोधनात झरी-जामनी परिसरातील कुमारी मातांच्या पार्श्वभूमीचे अध्ययन करून त्यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक, आरोग्यविषयक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थितीचे अध्ययन करण्यात आलेले आहे. शिवाय कुमारी मातांच्या समस्या निदर्शनास आणून त्या सबंधित समस्यामागील मूळ कारणे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. ही समस्या कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाही सूचविण्यात आलेल्या आहेत.निरंतर दारिद्र्य, पायाभूत सुविधांचा अभावकुमारी माता या विषयाकडे आदिवासी समुदाय आणि ग्रामीण व नागरी समुदाय अशा दोन्ही समुदायांमध्ये बघण्याची दृष्टी भिन्न आहे. ही भिन्नता या समुदायातील स्त्री-पुरुष दर्जानुसार व लैंगिक नीतीनुसार निर्माण झाली आहे. आदिवासी समुदायात अलीकडच्या काळात या विषयाला समस्या म्हणून बघितले जाऊ लागले आहे. कुमारी माता होण्यामागे सांस्कृतिक प्रभावाचा अंशत: प्रभाव असला तरी निरंतर दारिद्र्य, पायाभूत सुविधांचा अभाव व त्यामुळे आलेली विकास वंचितता, शारीरिक संबंधाबाबत योग्य माहितीचा अभाव, आरोग्य सुविधांचा अभाव ही मुख्य कारणे आढळून आली.संशोधनातून प्रश्न, समस्या दूर करण्यासाठी करण्यात आलेल्या शिफारशींमुळे ही समस्या सोडवण्यास लाभ होणार आहे. त्यादृष्टीने स्थानिक परिसरातील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, स्वयंसेवी संस्था यांनाही ही समस्या दूर करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.- मुरलीधर चांदेकर, कुलगुरु, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.

टॅग्स :Socialसामाजिक