शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

कुमारी मातांवरील संशोधन प्रकल्प राज्य महिला आयोगाला सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 11:32 IST

राज्य महिला आयोगाच्या अर्थसाहाय्याने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील वूमेन्स स्टडीज सेंटरने तयार केलेला ‘यवतमाळ जिल्ह्यातील कुमारी मातांच्या समस्यांचे अध्ययन’ या विषयावरील संशोधन प्रकल्पाचा अहवाल आयोगाला सादर करण्यात आला.

ठळक मुद्देसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा पुढाकार आयोगाचे प्रकल्पास अर्थसहाय्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य महिला आयोगाच्या अर्थसाहाय्याने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील वूमेन्स स्टडीज सेंटरने तयार केलेला ‘यवतमाळ जिल्ह्यातील कुमारी मातांच्या समस्यांचे अध्ययन’ या विषयावरील संशोधन प्रकल्पाचा अहवाल आयोगाला सादर करण्यात आला. या प्रकल्पात प्रतिबंधक, समस्या निराकरणाशी संबंधित उपायांचा अंतर्भाव आहे.विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात ‘कुमारी माता’ ही एक गंभीर समस्या आहे. दिवसेंदिवस ही समस्या उग्र रूप धारण करीत आहे. विशेषत: झरी-जामनी या तालुक्यात या समस्येचे प्रमाण अधिक आहे. या भागातील कोलाम आदिवासी जमातीशी ही समस्या निगडित आहे. त्यामुळे या संशोधनात झरी-जामनी परिसर निवडण्यात आला. प्रकल्प संचालक डॉ.वैशाली गुडधे व प्रकल्प सहायक म्हणून वैभव अर्मळ यांनी कार्य केले. या संशोधनात झरी-जामनी परिसरातील कुमारी मातांच्या पार्श्वभूमीचे अध्ययन करून त्यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक, आरोग्यविषयक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थितीचे अध्ययन करण्यात आलेले आहे. शिवाय कुमारी मातांच्या समस्या निदर्शनास आणून त्या सबंधित समस्यामागील मूळ कारणे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. ही समस्या कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाही सूचविण्यात आलेल्या आहेत.निरंतर दारिद्र्य, पायाभूत सुविधांचा अभावकुमारी माता या विषयाकडे आदिवासी समुदाय आणि ग्रामीण व नागरी समुदाय अशा दोन्ही समुदायांमध्ये बघण्याची दृष्टी भिन्न आहे. ही भिन्नता या समुदायातील स्त्री-पुरुष दर्जानुसार व लैंगिक नीतीनुसार निर्माण झाली आहे. आदिवासी समुदायात अलीकडच्या काळात या विषयाला समस्या म्हणून बघितले जाऊ लागले आहे. कुमारी माता होण्यामागे सांस्कृतिक प्रभावाचा अंशत: प्रभाव असला तरी निरंतर दारिद्र्य, पायाभूत सुविधांचा अभाव व त्यामुळे आलेली विकास वंचितता, शारीरिक संबंधाबाबत योग्य माहितीचा अभाव, आरोग्य सुविधांचा अभाव ही मुख्य कारणे आढळून आली.संशोधनातून प्रश्न, समस्या दूर करण्यासाठी करण्यात आलेल्या शिफारशींमुळे ही समस्या सोडवण्यास लाभ होणार आहे. त्यादृष्टीने स्थानिक परिसरातील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, स्वयंसेवी संस्था यांनाही ही समस्या दूर करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.- मुरलीधर चांदेकर, कुलगुरु, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.

टॅग्स :Socialसामाजिक