शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बीपीएल धारकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By admin | Updated: December 13, 2014 00:37 IST

वडाळी परिसरातील बीपीएल लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेतून वगळ्ण्यात आल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे.

अमरावती : वडाळी परिसरातील बीपीएल लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेतून वगळ्ण्यात आल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांना या योजनेचा लाभ द्यावा, या मागणीचे निवेदन नुकतेच येथील त्रस्त नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी वडाळी, देवीनगर, प्रबुध्दनगर, गजानननगर येथील शेकडो नागरिक उपस्थित होते. वडाळी परिसरातील अनेक कष्टकरी व मजूर आणि आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना नवीन रेशनकार्ड धारकांना अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. या नागरिकांसाठी असलेल्या नमुना अ मिळविण्याचा कालावधी वाढवून देणे, रेशन कार्डातून नाव कमी करणे, मुलांच नावे समाविष्ट करणे, दुय्यम पत्रिका देणे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. वर्ष २००५-०६ मध्ये झालेल्या दारिद्रय रेषेच्या सर्वेक्षणामधून अनेक गरीब कुटुंबांची नावे वगळण्यात आली होती. त्यावर नागरिकांनी आक्षेप नोंदविला. ज्या कुटुंबांजवळ दारिद्रय रेषेचे कार्ड नाही, त्या कुटुंबांना शासनाच्या घरकुल योजना व इतर योजनांपासून वंचित रहावे लागते. अशा सर्व जाती, प्रवर्गातील सर्व आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांची नावे दारिद्रय रेषेमध्ये समाविष्ट करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देताना परिसरातील त्रस्त नागरिक संजय चव्हाण, रामेश्वर आंबेकर, सैयद अख्तर मदारी, अमोल गोफणे, राकेश उसरेटे, राजू व्यवहारे, प्रमोद राऊत, संजय वानखडे, राजेश मुंजाडे, बाळासाहेब जेवडे, सागर खुळे, आरिफ खाँ मदारी, शिवदास गायकवाड, कल्पना वैद्य, शालिनी टाके, प्रणिती दिवे, कविता गंडेवार, ललिता आंबेकर, शशिकला वानखडे, कविता बेनिवाल सचिन काकिरवार, पंकज गुहे, विलास बोस, जानराव बनसोेड आदी उपस्थित होते. रेशन कार्डशी संबंधित सर्व समस्या तातडीने सोडवून नवीन रेशनकार्ड तसेच दारिद्रय रेषा प्रमाणपत्र वडाळी तसेच परिसरातील गोरगरीब नागरिकांना तातडीने वितरीत करावे, अशी मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. यावेळी परिसरातील अनेक संतप्त नागरिक उपस्थित होेते.