शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

बीपीएल धारकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By admin | Updated: December 13, 2014 00:37 IST

वडाळी परिसरातील बीपीएल लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेतून वगळ्ण्यात आल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे.

अमरावती : वडाळी परिसरातील बीपीएल लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेतून वगळ्ण्यात आल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांना या योजनेचा लाभ द्यावा, या मागणीचे निवेदन नुकतेच येथील त्रस्त नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी वडाळी, देवीनगर, प्रबुध्दनगर, गजानननगर येथील शेकडो नागरिक उपस्थित होते. वडाळी परिसरातील अनेक कष्टकरी व मजूर आणि आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना नवीन रेशनकार्ड धारकांना अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. या नागरिकांसाठी असलेल्या नमुना अ मिळविण्याचा कालावधी वाढवून देणे, रेशन कार्डातून नाव कमी करणे, मुलांच नावे समाविष्ट करणे, दुय्यम पत्रिका देणे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. वर्ष २००५-०६ मध्ये झालेल्या दारिद्रय रेषेच्या सर्वेक्षणामधून अनेक गरीब कुटुंबांची नावे वगळण्यात आली होती. त्यावर नागरिकांनी आक्षेप नोंदविला. ज्या कुटुंबांजवळ दारिद्रय रेषेचे कार्ड नाही, त्या कुटुंबांना शासनाच्या घरकुल योजना व इतर योजनांपासून वंचित रहावे लागते. अशा सर्व जाती, प्रवर्गातील सर्व आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांची नावे दारिद्रय रेषेमध्ये समाविष्ट करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देताना परिसरातील त्रस्त नागरिक संजय चव्हाण, रामेश्वर आंबेकर, सैयद अख्तर मदारी, अमोल गोफणे, राकेश उसरेटे, राजू व्यवहारे, प्रमोद राऊत, संजय वानखडे, राजेश मुंजाडे, बाळासाहेब जेवडे, सागर खुळे, आरिफ खाँ मदारी, शिवदास गायकवाड, कल्पना वैद्य, शालिनी टाके, प्रणिती दिवे, कविता गंडेवार, ललिता आंबेकर, शशिकला वानखडे, कविता बेनिवाल सचिन काकिरवार, पंकज गुहे, विलास बोस, जानराव बनसोेड आदी उपस्थित होते. रेशन कार्डशी संबंधित सर्व समस्या तातडीने सोडवून नवीन रेशनकार्ड तसेच दारिद्रय रेषा प्रमाणपत्र वडाळी तसेच परिसरातील गोरगरीब नागरिकांना तातडीने वितरीत करावे, अशी मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. यावेळी परिसरातील अनेक संतप्त नागरिक उपस्थित होेते.