शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

प्रकल्पाचे नाव बदलले, भूमिका जुनीच !

By admin | Updated: August 15, 2015 00:44 IST

सुमारे १८०० शेतकरी विस्थापित झालेत. या कुटुंबातील वारसांना प्रकल्पात सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आले. प्रत्यक्षात कंपनीने कामे खासगी कंत्राटदारांना दिली. परप्रांतीय मजूर आणले.

अमरावती : सुमारे १८०० शेतकरी विस्थापित झालेत. या कुटुंबातील वारसांना प्रकल्पात सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आले. प्रत्यक्षात कंपनीने कामे खासगी कंत्राटदारांना दिली. परप्रांतीय मजूर आणले. प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला देण्यात यावा, कुटुंबातील प्रत्येक सदस्याला रोजगार मिळावा, यासाठी १० वर्षांपासून प्रकल्पग्रस्त संघर्ष करीत आहेत. आता ही कंपनी ‘रतन इंडिया’ नावाने कार्यरत आहे. कंपनीच्या नावात बदल झाला. भूमिका मात्र जुनीच राहिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपलीकंपनीचे अधिकारी महाराष्ट्र राज्याचा कायदा व जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मानत नाहीत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या दिला. उद्योग राज्यमंत्री असलेल्या अमरावतीचे पालकमंत्री आंदोलकांना भेट न देता परस्परच बैठकीला निघून गेल्याने आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या भूमिकेचा निषेध केला.कामगार विभागाकडे नोंदणीच नाहीरतन इंडिया प्रकल्पात किती भूमिहीन प्रकल्पग्रस्तांना नोकरी दिल्यात. याविषयीची कुठलीही नोंदणी कामगार विभागाकडे उपलब्ध नाही. प्रत्यक्षात प्रकल्पात राजकीय व्यक्तींच्या कार्यकर्त्यांना नोकऱ्या देण्यात आल्यात. प्रकल्पग्रस्तांना डावलले, असा प्रकल्पग्रस्तांचा आरोप आहे. याची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी (प्रतिनिधी)कंपनी राज्य शासनाचे कायदे पाळत नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला जुमानत नाही. शासनाच्या महसुलावर ५० कोटींचा डल्ला मारते. प्रकल्पग्रस्तांच्या जिवाशी खेळते. कुठवर सहन करणार? आता माघार नाही. -प्रवीण मनोहर, आंदोलनप्रमुख.रतन इंडियाने पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना रोजगार दिला. आम्ही प्रकल्पग्रस्त भूमिहीन तसेच आहोत. कंपनी केवळ आश्वासन देते. कामावर परप्रांतीय मजूर आणते. त्यामुळे आम्हाला रोजगार मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. - नरेंद्र शामराव ढेले,प्रकल्पग्रस्त, वाघोली.पालकमंत्र्यांचा केला निषेधरतन इंडियाच्या भूमिकेविरोधात ७० वर्षीय वृद्ध प्रकल्पग्रस्ताने जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. शेकडो प्रकल्पग्रस्त पालकमंत्र्यांच्या दालनासमोर ठिय्या देऊन बसले होते. पालकमंत्र्यांनी भेट द्यावी, भावना समजून घ्यावी, अशी त्यांची मागणी होती. परंतु पालकमंत्री परस्पर बैठकीला निघून गेल्याने आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्र्यांचा निषेध केला. जिल्हाधिकाऱ्यांचा अपमान व्यवस्थापकीय संचालकाना पत्रप्रकल्पग्रस्तांशी बोलताना रतन इंडियाच्या वरिष्ठांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषाशैली आणि देहबोलीचा वापर केला. पकल्पग्रस्तांनी त्याचे व्हिडीओ शुटींगच जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. 'व्हिडीओ फुटेज' विश्वसनीस असल्याचे स्पष्ट झाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी व्यवस्थापकीय संचालक जयंत कावळे यांना लिहिलेल्या एका पत्रात सबंधित गंभीर प्रकाराचा उल्लेख केला आहे. जिल्हा दंडाधिकाऱ्यांविरुद्धच्या अशा असभ्य आणि बेकायदा वागणुकीची खरे तर पोलीस तक्रारही दाखल केली जाऊ शकते.