शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

दहावीतील विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर शेरा ठरला, मुख्याध्यापकांसह विद्यार्थी, पालकांचा संभ्रम दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:10 IST

माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, जून २०२१, प्रथम, द्वितीय, तृतीय श्रेणी असे असणार नमूद अमरावती : माध्यमिक व उच्च माध्यमिक ...

माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, जून २०२१, प्रथम, द्वितीय, तृतीय श्रेणी असे असणार नमूद

अमरावती : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याद्वारे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेच्या १६ जुलै रोजी ऑनलाईन निकाल जाहीर झाला. आता अकरावी व अन्य अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे नियोजन सुरू झाले आहे. मात्र, यंदा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण जून २०२१ असा दाखल्यावर शेरा राहणार असून, प्रथम, द्वितीय व तृतीय श्रेणी अशी नोंद असेल, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. त्यामुळे दहावीतील विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर शेरा काय असेल, याबाबत गत काही दिवसांपासून मुख्याध्यापकांसह विद्यार्थी, पालकांचा संभ्रम कायम होता. परंतु, राज्य शिक्षण मंडळाने दहावीतील विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर ‘कोरोना’, ‘कोविड’ असा कोणताही शेरा असणार नाही, ही बाब स्पष्ट केली आहे. अमरावती जिल्ह्यात ७४७ माध्यमिक शाळा आहेत. दहावीची ४० हजार ६७८ विद्यार्थिसंख्या होती. त्यापैकी ४० हजार ६७७ विद्यार्थी प्रवेशित होते. ४० हजार ५३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आता दहावीतील विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर शेरा ठरल्याने मुख्याध्यापकांसह विद्यार्थी, पालकांचा संभ्रम दूर झाला आहे.

-------------------

जिल्ह्यातील माध्यमिक शाळा : ७४७

दहावीतील एकूण विद्यार्थी : ४०६७७

पास झालेले विद्यार्थी : ४०५३१

मुले : २१४१९

मुली : १९११२

-------------------

मुख्याध्यापक म्हणतात...

‘दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर कोणता शेरा असेल, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निकालाबाबत असलेला संभ्रम दूर झाला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार निकाल जाहीर झाला आहे. आता सीईटी परीक्षेतून विद्यार्थी पुढे प्रवेशित होणार आहेत.

- शरद तिरमारे, मुख्याध्यापक, दाभा

--------------

यंदा दाखल्यावर वेगळा शेरा राहणार नाही. गुणपत्रिका अद्याप यायच्या आहेत. बोर्डाने तसे काही निर्देशही दिले नाही. वरिष्ठांच्या सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येईल. किंबहुना शिक्षणाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेण्यात येईल.

- विलास ढवळे, मुख्याध्यापक, सातरगाव

--------------------

पालक काय म्हणतात..

दहावीचा निकाल जाहीर झाला असला तरी पुन्हा सीईटी परीक्षांच्या सामोरे मुलांना जावे लागणार आहे. वर्षभर ऑनलाईन शिक्षणाचे काहीच साध्य झाले नाही. परीक्षाविना विद्यार्थी उत्तीर्ण झाले खरी, पण पुढील प्रवेशाच्या वेळी कस लागणार आहे.

- प्रीती डोंगरे, पालक

----------

कोरोनामुळे शिक्षणाचे तीनतेरा वाजले. किमान दहावीच्या परीक्षा होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे काही झाले नाही. अभ्यास केला, तो वाया गेला. आता अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा देण्यासाठी पुन्हा विद्यार्थ्यांना तयारी करावी लागणार आहे.

- सचिन पवार, पालक