शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

दहावीतील विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर शेरा ठरला, मुख्याध्यापकांसह विद्यार्थी, पालकांचा संभ्रम दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:10 IST

माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, जून २०२१, प्रथम, द्वितीय, तृतीय श्रेणी असे असणार नमूद अमरावती : माध्यमिक व उच्च माध्यमिक ...

माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, जून २०२१, प्रथम, द्वितीय, तृतीय श्रेणी असे असणार नमूद

अमरावती : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याद्वारे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेच्या १६ जुलै रोजी ऑनलाईन निकाल जाहीर झाला. आता अकरावी व अन्य अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे नियोजन सुरू झाले आहे. मात्र, यंदा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण जून २०२१ असा दाखल्यावर शेरा राहणार असून, प्रथम, द्वितीय व तृतीय श्रेणी अशी नोंद असेल, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. त्यामुळे दहावीतील विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर शेरा काय असेल, याबाबत गत काही दिवसांपासून मुख्याध्यापकांसह विद्यार्थी, पालकांचा संभ्रम कायम होता. परंतु, राज्य शिक्षण मंडळाने दहावीतील विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर ‘कोरोना’, ‘कोविड’ असा कोणताही शेरा असणार नाही, ही बाब स्पष्ट केली आहे. अमरावती जिल्ह्यात ७४७ माध्यमिक शाळा आहेत. दहावीची ४० हजार ६७८ विद्यार्थिसंख्या होती. त्यापैकी ४० हजार ६७७ विद्यार्थी प्रवेशित होते. ४० हजार ५३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आता दहावीतील विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर शेरा ठरल्याने मुख्याध्यापकांसह विद्यार्थी, पालकांचा संभ्रम दूर झाला आहे.

-------------------

जिल्ह्यातील माध्यमिक शाळा : ७४७

दहावीतील एकूण विद्यार्थी : ४०६७७

पास झालेले विद्यार्थी : ४०५३१

मुले : २१४१९

मुली : १९११२

-------------------

मुख्याध्यापक म्हणतात...

‘दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर कोणता शेरा असेल, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निकालाबाबत असलेला संभ्रम दूर झाला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार निकाल जाहीर झाला आहे. आता सीईटी परीक्षेतून विद्यार्थी पुढे प्रवेशित होणार आहेत.

- शरद तिरमारे, मुख्याध्यापक, दाभा

--------------

यंदा दाखल्यावर वेगळा शेरा राहणार नाही. गुणपत्रिका अद्याप यायच्या आहेत. बोर्डाने तसे काही निर्देशही दिले नाही. वरिष्ठांच्या सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येईल. किंबहुना शिक्षणाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेण्यात येईल.

- विलास ढवळे, मुख्याध्यापक, सातरगाव

--------------------

पालक काय म्हणतात..

दहावीचा निकाल जाहीर झाला असला तरी पुन्हा सीईटी परीक्षांच्या सामोरे मुलांना जावे लागणार आहे. वर्षभर ऑनलाईन शिक्षणाचे काहीच साध्य झाले नाही. परीक्षाविना विद्यार्थी उत्तीर्ण झाले खरी, पण पुढील प्रवेशाच्या वेळी कस लागणार आहे.

- प्रीती डोंगरे, पालक

----------

कोरोनामुळे शिक्षणाचे तीनतेरा वाजले. किमान दहावीच्या परीक्षा होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे काही झाले नाही. अभ्यास केला, तो वाया गेला. आता अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा देण्यासाठी पुन्हा विद्यार्थ्यांना तयारी करावी लागणार आहे.

- सचिन पवार, पालक