शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
2
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
3
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
6
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
7
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
8
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
9
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
10
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
11
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
12
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
13
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
14
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
15
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
16
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
17
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
18
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
19
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
20
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत

दहावीतील विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर शेरा ठरला, मुख्याध्यापकांसह विद्यार्थी, पालकांचा संभ्रम दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:10 IST

माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, जून २०२१, प्रथम, द्वितीय, तृतीय श्रेणी असे असणार नमूद अमरावती : माध्यमिक व उच्च माध्यमिक ...

माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, जून २०२१, प्रथम, द्वितीय, तृतीय श्रेणी असे असणार नमूद

अमरावती : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याद्वारे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेच्या १६ जुलै रोजी ऑनलाईन निकाल जाहीर झाला. आता अकरावी व अन्य अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे नियोजन सुरू झाले आहे. मात्र, यंदा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण जून २०२१ असा दाखल्यावर शेरा राहणार असून, प्रथम, द्वितीय व तृतीय श्रेणी अशी नोंद असेल, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. त्यामुळे दहावीतील विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर शेरा काय असेल, याबाबत गत काही दिवसांपासून मुख्याध्यापकांसह विद्यार्थी, पालकांचा संभ्रम कायम होता. परंतु, राज्य शिक्षण मंडळाने दहावीतील विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर ‘कोरोना’, ‘कोविड’ असा कोणताही शेरा असणार नाही, ही बाब स्पष्ट केली आहे. अमरावती जिल्ह्यात ७४७ माध्यमिक शाळा आहेत. दहावीची ४० हजार ६७८ विद्यार्थिसंख्या होती. त्यापैकी ४० हजार ६७७ विद्यार्थी प्रवेशित होते. ४० हजार ५३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आता दहावीतील विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर शेरा ठरल्याने मुख्याध्यापकांसह विद्यार्थी, पालकांचा संभ्रम दूर झाला आहे.

-------------------

जिल्ह्यातील माध्यमिक शाळा : ७४७

दहावीतील एकूण विद्यार्थी : ४०६७७

पास झालेले विद्यार्थी : ४०५३१

मुले : २१४१९

मुली : १९११२

-------------------

मुख्याध्यापक म्हणतात...

‘दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर कोणता शेरा असेल, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निकालाबाबत असलेला संभ्रम दूर झाला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार निकाल जाहीर झाला आहे. आता सीईटी परीक्षेतून विद्यार्थी पुढे प्रवेशित होणार आहेत.

- शरद तिरमारे, मुख्याध्यापक, दाभा

--------------

यंदा दाखल्यावर वेगळा शेरा राहणार नाही. गुणपत्रिका अद्याप यायच्या आहेत. बोर्डाने तसे काही निर्देशही दिले नाही. वरिष्ठांच्या सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येईल. किंबहुना शिक्षणाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेण्यात येईल.

- विलास ढवळे, मुख्याध्यापक, सातरगाव

--------------------

पालक काय म्हणतात..

दहावीचा निकाल जाहीर झाला असला तरी पुन्हा सीईटी परीक्षांच्या सामोरे मुलांना जावे लागणार आहे. वर्षभर ऑनलाईन शिक्षणाचे काहीच साध्य झाले नाही. परीक्षाविना विद्यार्थी उत्तीर्ण झाले खरी, पण पुढील प्रवेशाच्या वेळी कस लागणार आहे.

- प्रीती डोंगरे, पालक

----------

कोरोनामुळे शिक्षणाचे तीनतेरा वाजले. किमान दहावीच्या परीक्षा होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे काही झाले नाही. अभ्यास केला, तो वाया गेला. आता अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा देण्यासाठी पुन्हा विद्यार्थ्यांना तयारी करावी लागणार आहे.

- सचिन पवार, पालक