शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

रखडलेल्या २४ प्रकल्पांना ‘बळीराजा जलसंजीवनी’चे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:22 IST

जिल्ह्यात रखडलेले २४ प्रकल्प शासनाच्या ‘बळीराजा जलसंजीवनी’ प्रकल्प अंतर्गत पूर्ण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपालकमंत्री : १,६०१ कोटींचा निधी आवश्यक, २५ टक्के केंद्राचा हिस्सा

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्ह्यात रखडलेले २४ प्रकल्प शासनाच्या ‘बळीराजा जलसंजीवनी’ प्रकल्प अंतर्गत पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक १,६०१ कोटींचा निधी केंद्र शासन नाबार्डच्या माध्यमातून कर्जस्वरूपात, तर उर्वरित २५ टक्के निधी केंद्र शासन उपलब्ध करणार आहे. या योजनेच्या माध्यमातून २९ हजार ६१५ हेक्टर सिंचनक्षेत्रात वाढ होईल, अशी ग्वाही पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.राज्यात अर्धवट रखडलेले १०४ प्रकल्प बळीराजा जलसंजीवनी योजनेद्वारे पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी ६,५९१ कोटी १८ लाखांच्या निधीची आवश्यकता आहे. यामध्ये २५ टक्के निधी केंद्र शासन देणार आहे. या योजनेत विदर्भातील ८१ प्रकल्पांचा समावेश आहे. यासाठी २,८१३ कोटी १२ लाखांचा निधी आवश्यक आहे. या योजनेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला. केंद्रीय जल आयोग व नीती आयोगाची मान्यता मोठ्या व मध्यम प्रकल्पांना आवश्यक आहे आणि ती लवकरच मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. योजनेमध्ये पर्यावरण व अन्य वैज्ञानिक मान्यता असलेल्या प्रकल्पांचा समावेश करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून हे सर्व प्रकल्प मार्गी लागतील व शेतकरी सुजलाम्, सुफलाम् होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.विदर्भात अर्धवट स्थितीतील ८१ प्रकल्पांसाठी ३,८३६ कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. या निधीच्या २५ टक्के म्हणजेच ९५९ कोटींचा निधी केंद्र शासन उपलब्ध करणार आहे, तर उर्वरित ७५ टक्के निधी केंद्र शासन नाबार्डच्या माध्यमातून कर्जाऊ देणार असल्याचे त्यांनी सांगितले.पत्रपरिषदेला आ. सुनील देशमुख, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जयंत डेहणकर आदी उपस्थित होते.योजना शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठीशेतकरी आत्महत्याग्रस्त व दुष्काळी जिल्ह्यांसाठीच प्रामुख्याने बळीराजा नवसंजीवनी योजना आहे. जिल्ह्यातील २४ प्रकल्पाची रखडलेली कामे या योजनेच्या माध्यमातून पूर्णत्वास जाऊन सिंचनाचा अनुशेष दूर होणार आहे. गेल्या १० वर्षांमध्ये जिल्ह्यात एकाही प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही. यामुळेच सिंचनाचा अनुशेष व शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली, ही बाब निश्चीतच भूषणावह नाही, असे आ. सुनील देशमुख यांनी सांगितले.या प्रकल्पांचा समावेशजिल्ह्यात निधीअभावी अर्धवट स्थितीत बोर्डी नाला, गडगा, पंढरी, पेढी बॅरेज, वासनी अशी पाच मुख्य, तर आमपाटी, बागलिंगा, भेमडी, बोेर नदी, चांदी नदी, चंद्रभागा बॅरेज, करजगाव, लोअर चारघड, लोअर साखळी, पाक नदी, पाटिया, रायगड, सामदा, सोनगाव साखळी, टिमटाला, टाकळी कलान, वाघाडी व झटामझिरी या लघुप्रकल्पांचा समावेश आहे.