शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेल्या २४ प्रकल्पांना ‘बळीराजा जलसंजीवनी’चे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:22 IST

जिल्ह्यात रखडलेले २४ प्रकल्प शासनाच्या ‘बळीराजा जलसंजीवनी’ प्रकल्प अंतर्गत पूर्ण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपालकमंत्री : १,६०१ कोटींचा निधी आवश्यक, २५ टक्के केंद्राचा हिस्सा

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्ह्यात रखडलेले २४ प्रकल्प शासनाच्या ‘बळीराजा जलसंजीवनी’ प्रकल्प अंतर्गत पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक १,६०१ कोटींचा निधी केंद्र शासन नाबार्डच्या माध्यमातून कर्जस्वरूपात, तर उर्वरित २५ टक्के निधी केंद्र शासन उपलब्ध करणार आहे. या योजनेच्या माध्यमातून २९ हजार ६१५ हेक्टर सिंचनक्षेत्रात वाढ होईल, अशी ग्वाही पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.राज्यात अर्धवट रखडलेले १०४ प्रकल्प बळीराजा जलसंजीवनी योजनेद्वारे पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी ६,५९१ कोटी १८ लाखांच्या निधीची आवश्यकता आहे. यामध्ये २५ टक्के निधी केंद्र शासन देणार आहे. या योजनेत विदर्भातील ८१ प्रकल्पांचा समावेश आहे. यासाठी २,८१३ कोटी १२ लाखांचा निधी आवश्यक आहे. या योजनेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला. केंद्रीय जल आयोग व नीती आयोगाची मान्यता मोठ्या व मध्यम प्रकल्पांना आवश्यक आहे आणि ती लवकरच मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. योजनेमध्ये पर्यावरण व अन्य वैज्ञानिक मान्यता असलेल्या प्रकल्पांचा समावेश करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून हे सर्व प्रकल्प मार्गी लागतील व शेतकरी सुजलाम्, सुफलाम् होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.विदर्भात अर्धवट स्थितीतील ८१ प्रकल्पांसाठी ३,८३६ कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. या निधीच्या २५ टक्के म्हणजेच ९५९ कोटींचा निधी केंद्र शासन उपलब्ध करणार आहे, तर उर्वरित ७५ टक्के निधी केंद्र शासन नाबार्डच्या माध्यमातून कर्जाऊ देणार असल्याचे त्यांनी सांगितले.पत्रपरिषदेला आ. सुनील देशमुख, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जयंत डेहणकर आदी उपस्थित होते.योजना शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठीशेतकरी आत्महत्याग्रस्त व दुष्काळी जिल्ह्यांसाठीच प्रामुख्याने बळीराजा नवसंजीवनी योजना आहे. जिल्ह्यातील २४ प्रकल्पाची रखडलेली कामे या योजनेच्या माध्यमातून पूर्णत्वास जाऊन सिंचनाचा अनुशेष दूर होणार आहे. गेल्या १० वर्षांमध्ये जिल्ह्यात एकाही प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही. यामुळेच सिंचनाचा अनुशेष व शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली, ही बाब निश्चीतच भूषणावह नाही, असे आ. सुनील देशमुख यांनी सांगितले.या प्रकल्पांचा समावेशजिल्ह्यात निधीअभावी अर्धवट स्थितीत बोर्डी नाला, गडगा, पंढरी, पेढी बॅरेज, वासनी अशी पाच मुख्य, तर आमपाटी, बागलिंगा, भेमडी, बोेर नदी, चांदी नदी, चंद्रभागा बॅरेज, करजगाव, लोअर चारघड, लोअर साखळी, पाक नदी, पाटिया, रायगड, सामदा, सोनगाव साखळी, टिमटाला, टाकळी कलान, वाघाडी व झटामझिरी या लघुप्रकल्पांचा समावेश आहे.