शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

धर्म देशात दंगे घडविणारा कारखाना झालाय, राजेंद्र पाल गौतम यांचा घणाघात

By उज्वल भालेकर | Updated: April 1, 2023 18:42 IST

भारताला विश्वगुरु बनायचे असेल तर बुद्ध धम्माशिवाय पयार्य नाही

अमरावती: देशात धर्माचा आधार घेवून दंगे घडविण्याचे काम सुरु आहे. परंतु दंगे घडविणारा मुख्य सुत्रधाराला अटक हाेत नाही. सध्या धर्म देशामध्ये दंगे घडविणारा कारखाना असून, यातून अनेक लोक हे खरबोपती झाले आहेत. या लोकांचे देशावर, येथील लोकांवर प्रेम नसून त्यांचा फक्त सत्ता व पैश्यावरच प्रेम आहे. भारत देशाला जर खऱ्या अर्थाने विश्वगुरु बनवायचे असेल, तर बुद्धांच्या धम्माशिवाय पर्याय नाही असे मत दिल्लीचे माजी सामाजिक न्यायमंत्री राजेंद्र गौतम पाल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

दिल्लीतील आम आदमी पार्टी सरकारमध्ये सामाजीक न्यायमंत्री राहिलेल्या राजेंद्र गौतम पाल यांना ५ ऑक्टोंबर २०२२ मध्ये बौद्ध धम्म दिक्षा कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञाचे सामूहीक वाचन केले होते. यावेळी या प्रतिज्ञावरुन भाजपने राजेंद्र गौतम पाल आणि आम आदमी पार्टी हिंदू विरोधी असल्याचा आरोप केला होता. तसेच राजेंद्र गौतम पाल यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा मागणी देखील केली होती. यानंतर राजेंद्र गौतम पाल यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. परंतु हा राजीनामा कोणत्याही दबवात दिला नाही, समाजासाठी अधिक काम करण्यासाठी हा राजीनामादिल्याचे त्यांचे म्हणने आहे. सध्या ते भारत बौद्धमय करण्यासाठी देशभरात फिरत आहेत. त्याच अनुषंगाने ३१ मार्च रोजी शहरातील भिमटेकडी परीसरात त्यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन केले होते. शनिवारी त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधीत करतांना देश सध्या वाईट परिस्थितीचा सामना करत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी २००२ मध्ये झालेल्या गोदरा हत्याकांडाचाही उल्लेख करत, या दंग्यामध्ये सर्वाधिक कारवाई ही मागासवर्गीयांवर झाल्याची माहिती दिली. मागासवर्गीयांचा फक्त दंग्यासाठी उपयोग केला जात आहे. त्यामुळे बहुजन समाजाने एकत्र येऊन मनुवादी व्यवस्थेचा विरोध केला पाहीजे. बहुजनांना एकत्रकरुन भारत बौद्धमय करण्याच उद्देश असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी पत्रकार परिषदेला डॉ. गौतम मोरे, किरण गुडधे, राजेश वानखडे, एस.बी. खोबरागडे, रविकांत गवई, हरिश मेश्राम, रविंद्र फुले उपस्थित होते.

अर्थव्यवस्था देवी, देवतांच्या फोटोमुळे सुधारणार नाही

आप नेता अरविंद केजरीवाल यांनी भारतीय अर्थव्यस्था सुधारण्यासाठी देवी, देवतांचे फोटो नोटांवर छापण्याची मागणी केली होती. या संदर्भात राजेंद्र पाल यांना प्रश्न केला असता, त्यांनी केजरीवाल यांना घरचा आहेर दिला आहे. राजेंद्र गौतम पाल म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'प्रॉब्लेम ऑफ द रुपी' या पुस्तकाच आधार घेऊनच देशातील आरबीआय बँकेची स्थापना झाली आहे. बाबाासाहेबांचे हे पुस्तकच देशाची अर्थव्यवथा मजबुत करु शकेल. देवी, देवतांच्या फोटोमुळे अर्थव्यस्था सुधारणार नाही असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :AmravatiअमरावतीHinduहिंदूministerमंत्री