शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

धर्म देशात दंगे घडविणारा कारखाना झालाय, राजेंद्र पाल गौतम यांचा घणाघात

By उज्वल भालेकर | Updated: April 1, 2023 18:42 IST

भारताला विश्वगुरु बनायचे असेल तर बुद्ध धम्माशिवाय पयार्य नाही

अमरावती: देशात धर्माचा आधार घेवून दंगे घडविण्याचे काम सुरु आहे. परंतु दंगे घडविणारा मुख्य सुत्रधाराला अटक हाेत नाही. सध्या धर्म देशामध्ये दंगे घडविणारा कारखाना असून, यातून अनेक लोक हे खरबोपती झाले आहेत. या लोकांचे देशावर, येथील लोकांवर प्रेम नसून त्यांचा फक्त सत्ता व पैश्यावरच प्रेम आहे. भारत देशाला जर खऱ्या अर्थाने विश्वगुरु बनवायचे असेल, तर बुद्धांच्या धम्माशिवाय पर्याय नाही असे मत दिल्लीचे माजी सामाजिक न्यायमंत्री राजेंद्र गौतम पाल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

दिल्लीतील आम आदमी पार्टी सरकारमध्ये सामाजीक न्यायमंत्री राहिलेल्या राजेंद्र गौतम पाल यांना ५ ऑक्टोंबर २०२२ मध्ये बौद्ध धम्म दिक्षा कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञाचे सामूहीक वाचन केले होते. यावेळी या प्रतिज्ञावरुन भाजपने राजेंद्र गौतम पाल आणि आम आदमी पार्टी हिंदू विरोधी असल्याचा आरोप केला होता. तसेच राजेंद्र गौतम पाल यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा मागणी देखील केली होती. यानंतर राजेंद्र गौतम पाल यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. परंतु हा राजीनामा कोणत्याही दबवात दिला नाही, समाजासाठी अधिक काम करण्यासाठी हा राजीनामादिल्याचे त्यांचे म्हणने आहे. सध्या ते भारत बौद्धमय करण्यासाठी देशभरात फिरत आहेत. त्याच अनुषंगाने ३१ मार्च रोजी शहरातील भिमटेकडी परीसरात त्यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन केले होते. शनिवारी त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधीत करतांना देश सध्या वाईट परिस्थितीचा सामना करत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी २००२ मध्ये झालेल्या गोदरा हत्याकांडाचाही उल्लेख करत, या दंग्यामध्ये सर्वाधिक कारवाई ही मागासवर्गीयांवर झाल्याची माहिती दिली. मागासवर्गीयांचा फक्त दंग्यासाठी उपयोग केला जात आहे. त्यामुळे बहुजन समाजाने एकत्र येऊन मनुवादी व्यवस्थेचा विरोध केला पाहीजे. बहुजनांना एकत्रकरुन भारत बौद्धमय करण्याच उद्देश असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी पत्रकार परिषदेला डॉ. गौतम मोरे, किरण गुडधे, राजेश वानखडे, एस.बी. खोबरागडे, रविकांत गवई, हरिश मेश्राम, रविंद्र फुले उपस्थित होते.

अर्थव्यवस्था देवी, देवतांच्या फोटोमुळे सुधारणार नाही

आप नेता अरविंद केजरीवाल यांनी भारतीय अर्थव्यस्था सुधारण्यासाठी देवी, देवतांचे फोटो नोटांवर छापण्याची मागणी केली होती. या संदर्भात राजेंद्र पाल यांना प्रश्न केला असता, त्यांनी केजरीवाल यांना घरचा आहेर दिला आहे. राजेंद्र गौतम पाल म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'प्रॉब्लेम ऑफ द रुपी' या पुस्तकाच आधार घेऊनच देशातील आरबीआय बँकेची स्थापना झाली आहे. बाबाासाहेबांचे हे पुस्तकच देशाची अर्थव्यवथा मजबुत करु शकेल. देवी, देवतांच्या फोटोमुळे अर्थव्यस्था सुधारणार नाही असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :AmravatiअमरावतीHinduहिंदूministerमंत्री