शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

धर्म देशात दंगे घडविणारा कारखाना झालाय, राजेंद्र पाल गौतम यांचा घणाघात

By उज्वल भालेकर | Updated: April 1, 2023 18:42 IST

भारताला विश्वगुरु बनायचे असेल तर बुद्ध धम्माशिवाय पयार्य नाही

अमरावती: देशात धर्माचा आधार घेवून दंगे घडविण्याचे काम सुरु आहे. परंतु दंगे घडविणारा मुख्य सुत्रधाराला अटक हाेत नाही. सध्या धर्म देशामध्ये दंगे घडविणारा कारखाना असून, यातून अनेक लोक हे खरबोपती झाले आहेत. या लोकांचे देशावर, येथील लोकांवर प्रेम नसून त्यांचा फक्त सत्ता व पैश्यावरच प्रेम आहे. भारत देशाला जर खऱ्या अर्थाने विश्वगुरु बनवायचे असेल, तर बुद्धांच्या धम्माशिवाय पर्याय नाही असे मत दिल्लीचे माजी सामाजिक न्यायमंत्री राजेंद्र गौतम पाल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

दिल्लीतील आम आदमी पार्टी सरकारमध्ये सामाजीक न्यायमंत्री राहिलेल्या राजेंद्र गौतम पाल यांना ५ ऑक्टोंबर २०२२ मध्ये बौद्ध धम्म दिक्षा कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञाचे सामूहीक वाचन केले होते. यावेळी या प्रतिज्ञावरुन भाजपने राजेंद्र गौतम पाल आणि आम आदमी पार्टी हिंदू विरोधी असल्याचा आरोप केला होता. तसेच राजेंद्र गौतम पाल यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा मागणी देखील केली होती. यानंतर राजेंद्र गौतम पाल यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. परंतु हा राजीनामा कोणत्याही दबवात दिला नाही, समाजासाठी अधिक काम करण्यासाठी हा राजीनामादिल्याचे त्यांचे म्हणने आहे. सध्या ते भारत बौद्धमय करण्यासाठी देशभरात फिरत आहेत. त्याच अनुषंगाने ३१ मार्च रोजी शहरातील भिमटेकडी परीसरात त्यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन केले होते. शनिवारी त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधीत करतांना देश सध्या वाईट परिस्थितीचा सामना करत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी २००२ मध्ये झालेल्या गोदरा हत्याकांडाचाही उल्लेख करत, या दंग्यामध्ये सर्वाधिक कारवाई ही मागासवर्गीयांवर झाल्याची माहिती दिली. मागासवर्गीयांचा फक्त दंग्यासाठी उपयोग केला जात आहे. त्यामुळे बहुजन समाजाने एकत्र येऊन मनुवादी व्यवस्थेचा विरोध केला पाहीजे. बहुजनांना एकत्रकरुन भारत बौद्धमय करण्याच उद्देश असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी पत्रकार परिषदेला डॉ. गौतम मोरे, किरण गुडधे, राजेश वानखडे, एस.बी. खोबरागडे, रविकांत गवई, हरिश मेश्राम, रविंद्र फुले उपस्थित होते.

अर्थव्यवस्था देवी, देवतांच्या फोटोमुळे सुधारणार नाही

आप नेता अरविंद केजरीवाल यांनी भारतीय अर्थव्यस्था सुधारण्यासाठी देवी, देवतांचे फोटो नोटांवर छापण्याची मागणी केली होती. या संदर्भात राजेंद्र पाल यांना प्रश्न केला असता, त्यांनी केजरीवाल यांना घरचा आहेर दिला आहे. राजेंद्र गौतम पाल म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'प्रॉब्लेम ऑफ द रुपी' या पुस्तकाच आधार घेऊनच देशातील आरबीआय बँकेची स्थापना झाली आहे. बाबाासाहेबांचे हे पुस्तकच देशाची अर्थव्यवथा मजबुत करु शकेल. देवी, देवतांच्या फोटोमुळे अर्थव्यस्था सुधारणार नाही असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :AmravatiअमरावतीHinduहिंदूministerमंत्री