शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
4
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
5
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
6
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
7
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
8
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
9
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
10
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
11
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
12
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
13
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
14
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
15
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
16
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
17
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
18
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
19
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
20
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 

धर्म देशात दंगे घडविणारा कारखाना झालाय, राजेंद्र पाल गौतम यांचा घणाघात

By उज्वल भालेकर | Updated: April 1, 2023 18:42 IST

भारताला विश्वगुरु बनायचे असेल तर बुद्ध धम्माशिवाय पयार्य नाही

अमरावती: देशात धर्माचा आधार घेवून दंगे घडविण्याचे काम सुरु आहे. परंतु दंगे घडविणारा मुख्य सुत्रधाराला अटक हाेत नाही. सध्या धर्म देशामध्ये दंगे घडविणारा कारखाना असून, यातून अनेक लोक हे खरबोपती झाले आहेत. या लोकांचे देशावर, येथील लोकांवर प्रेम नसून त्यांचा फक्त सत्ता व पैश्यावरच प्रेम आहे. भारत देशाला जर खऱ्या अर्थाने विश्वगुरु बनवायचे असेल, तर बुद्धांच्या धम्माशिवाय पर्याय नाही असे मत दिल्लीचे माजी सामाजिक न्यायमंत्री राजेंद्र गौतम पाल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

दिल्लीतील आम आदमी पार्टी सरकारमध्ये सामाजीक न्यायमंत्री राहिलेल्या राजेंद्र गौतम पाल यांना ५ ऑक्टोंबर २०२२ मध्ये बौद्ध धम्म दिक्षा कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञाचे सामूहीक वाचन केले होते. यावेळी या प्रतिज्ञावरुन भाजपने राजेंद्र गौतम पाल आणि आम आदमी पार्टी हिंदू विरोधी असल्याचा आरोप केला होता. तसेच राजेंद्र गौतम पाल यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा मागणी देखील केली होती. यानंतर राजेंद्र गौतम पाल यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. परंतु हा राजीनामा कोणत्याही दबवात दिला नाही, समाजासाठी अधिक काम करण्यासाठी हा राजीनामादिल्याचे त्यांचे म्हणने आहे. सध्या ते भारत बौद्धमय करण्यासाठी देशभरात फिरत आहेत. त्याच अनुषंगाने ३१ मार्च रोजी शहरातील भिमटेकडी परीसरात त्यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन केले होते. शनिवारी त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधीत करतांना देश सध्या वाईट परिस्थितीचा सामना करत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी २००२ मध्ये झालेल्या गोदरा हत्याकांडाचाही उल्लेख करत, या दंग्यामध्ये सर्वाधिक कारवाई ही मागासवर्गीयांवर झाल्याची माहिती दिली. मागासवर्गीयांचा फक्त दंग्यासाठी उपयोग केला जात आहे. त्यामुळे बहुजन समाजाने एकत्र येऊन मनुवादी व्यवस्थेचा विरोध केला पाहीजे. बहुजनांना एकत्रकरुन भारत बौद्धमय करण्याच उद्देश असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी पत्रकार परिषदेला डॉ. गौतम मोरे, किरण गुडधे, राजेश वानखडे, एस.बी. खोबरागडे, रविकांत गवई, हरिश मेश्राम, रविंद्र फुले उपस्थित होते.

अर्थव्यवस्था देवी, देवतांच्या फोटोमुळे सुधारणार नाही

आप नेता अरविंद केजरीवाल यांनी भारतीय अर्थव्यस्था सुधारण्यासाठी देवी, देवतांचे फोटो नोटांवर छापण्याची मागणी केली होती. या संदर्भात राजेंद्र पाल यांना प्रश्न केला असता, त्यांनी केजरीवाल यांना घरचा आहेर दिला आहे. राजेंद्र गौतम पाल म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'प्रॉब्लेम ऑफ द रुपी' या पुस्तकाच आधार घेऊनच देशातील आरबीआय बँकेची स्थापना झाली आहे. बाबाासाहेबांचे हे पुस्तकच देशाची अर्थव्यवथा मजबुत करु शकेल. देवी, देवतांच्या फोटोमुळे अर्थव्यस्था सुधारणार नाही असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :AmravatiअमरावतीHinduहिंदूministerमंत्री