शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अमरावती जिल्ह्यात दमदार पावसाने दिलासा, थबकलेल्या पेरण्यांना गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2022 21:25 IST

Amravati News तीन आठवड्यांपासून पावसाची ओढ असल्याने थबकलेल्या तीन लाख हेक्टरमधील पेरण्यांना आता गती मिळणार आहे. सार्वत्रिक पावसामुळे कोवळी पिकांना संजीवनी मिळाली आहे.

ठळक मुद्देतीन लाख हेक्टरमधील पेरण्या बाकीकोवळ्या पिकांना संजीवनी

अमरावती : आर्द्राचे अखेरच्या चरणातील दमदार पावसाने खरिपाला संजीवनी मिळाली आहे. तीन आठवड्यांपासून पावसाची ओढ असल्याने थबकलेल्या तीन लाख हेक्टरमधील पेरण्यांना आता गती मिळणार आहे. सार्वत्रिक पावसामुळे कोवळी पिकांना संजीवनी मिळाली आहे.

यंदाच्या खरिपात ८ जूनला मृग नक्षत्रास सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्षात पाऊस १८ जूनला पडला. त्यानंतरच्या आर्द्रा नक्षत्राच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी सार्वत्रिक पावसाची नोंद झालेली आहे. यामध्ये जिल्ह्यात सरासरी २५.७ मिमी पावसाची नोंद झाली व दुसऱ्याही दिवशी काही तालुक्यात पावसाची नोंद झाल्याने पेरणी झालेल्या चार लाख हेक्टरमधील पिके तरारली आहेत.

मंगळवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या जोरदार पावसाने तब्बल २३ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामध्ये दहा मंडळात तर १०० मि.मी.पेक्षा पाऊस झाल्याने ढगफुटीची स्थिती ओढावली होती. या भागात एक ते दोन दिवसांपूर्वी झालेल्या पेरण्या दडपण्याची भीती निर्माण झालेली आहे, तर पिकात खांडण्या पडणार असल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट निर्माण झाले आहे.

आतापर्यंत चार लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी

सोमवारपर्यंत ३ लाख ९९ हजार ६५६ हेक्टर क्षेत्रामध्ये पेरण्या आटोपल्या. यामध्ये धारणी तालुक्यात १५ हजार ३५४ हेक्टर, चिखलदरा १२ हजार ७४२, अमरावती २६ हजार ६१३, भातकुली १९ हजार ८१७, नांदगाव खंडेश्वर २६ हजार ३३९, चांदूर रेल्वे २४ हजार ४२४, तिवसा ३४ हजार ९३५, मोर्शी ४२ हजार ८११, वरूड १७ हजार ९३५, दर्यापूर ५२ हजार ४२५, अंजनगाव सुर्जी ३१ हजार ४४४, अचलपूर २४ हजार ५८५, चांदूर बाजार २९ हजार ९२६, व धामणगाव रेल्वे तालुक्यात ३९ हजार ६३६ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे.

टॅग्स :agricultureशेती