शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

अमरावती जिल्ह्यात दमदार पावसाने दिलासा, थबकलेल्या पेरण्यांना गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2022 21:25 IST

Amravati News तीन आठवड्यांपासून पावसाची ओढ असल्याने थबकलेल्या तीन लाख हेक्टरमधील पेरण्यांना आता गती मिळणार आहे. सार्वत्रिक पावसामुळे कोवळी पिकांना संजीवनी मिळाली आहे.

ठळक मुद्देतीन लाख हेक्टरमधील पेरण्या बाकीकोवळ्या पिकांना संजीवनी

अमरावती : आर्द्राचे अखेरच्या चरणातील दमदार पावसाने खरिपाला संजीवनी मिळाली आहे. तीन आठवड्यांपासून पावसाची ओढ असल्याने थबकलेल्या तीन लाख हेक्टरमधील पेरण्यांना आता गती मिळणार आहे. सार्वत्रिक पावसामुळे कोवळी पिकांना संजीवनी मिळाली आहे.

यंदाच्या खरिपात ८ जूनला मृग नक्षत्रास सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्षात पाऊस १८ जूनला पडला. त्यानंतरच्या आर्द्रा नक्षत्राच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी सार्वत्रिक पावसाची नोंद झालेली आहे. यामध्ये जिल्ह्यात सरासरी २५.७ मिमी पावसाची नोंद झाली व दुसऱ्याही दिवशी काही तालुक्यात पावसाची नोंद झाल्याने पेरणी झालेल्या चार लाख हेक्टरमधील पिके तरारली आहेत.

मंगळवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या जोरदार पावसाने तब्बल २३ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामध्ये दहा मंडळात तर १०० मि.मी.पेक्षा पाऊस झाल्याने ढगफुटीची स्थिती ओढावली होती. या भागात एक ते दोन दिवसांपूर्वी झालेल्या पेरण्या दडपण्याची भीती निर्माण झालेली आहे, तर पिकात खांडण्या पडणार असल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट निर्माण झाले आहे.

आतापर्यंत चार लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी

सोमवारपर्यंत ३ लाख ९९ हजार ६५६ हेक्टर क्षेत्रामध्ये पेरण्या आटोपल्या. यामध्ये धारणी तालुक्यात १५ हजार ३५४ हेक्टर, चिखलदरा १२ हजार ७४२, अमरावती २६ हजार ६१३, भातकुली १९ हजार ८१७, नांदगाव खंडेश्वर २६ हजार ३३९, चांदूर रेल्वे २४ हजार ४२४, तिवसा ३४ हजार ९३५, मोर्शी ४२ हजार ८११, वरूड १७ हजार ९३५, दर्यापूर ५२ हजार ४२५, अंजनगाव सुर्जी ३१ हजार ४४४, अचलपूर २४ हजार ५८५, चांदूर बाजार २९ हजार ९२६, व धामणगाव रेल्वे तालुक्यात ३९ हजार ६३६ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे.

टॅग्स :agricultureशेती