शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

कोरोनाकाळात शेतकरी आत्महत्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:10 IST

गजानन मोहोड अमरावती : कोरोना संकटकाळातही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. अस्मानी व सुल्तानी संकटामुळे पश्चिम विदर्भात यंदा जूनअखेर ...

गजानन मोहोड

अमरावती : कोरोना संकटकाळातही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. अस्मानी व सुल्तानी संकटामुळे पश्चिम विदर्भात यंदा जूनअखेर ४६१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. गतवर्षी याच कालावधीत ५०० शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. दर दोन दिवसात पाच, तर दर नऊ तासात एक शेतकरी आत्महत्या होत आहे.

कर्ज, नापिकी, नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ यात वऱ्हाडातील शेतकरी अडकला आहे. यामध्ये मुला-मुलींचे शिक्षण, लग्न व घरसंसार कसा करावा, या विवंचनेत शेतकऱ्यांच्या संघर्षात नैराश्य मात करीत आहे. नापिकीच्या दृष्टचक्रात खासगी सावकारांचे कर्ज वाढत आहे. शेतीत उत्पादनखर्चही पदरी पडत नसल्याने पोशिंद्याचा धीर खचून तो मृत्यूचा घोट घेत असल्याचे दुर्देवी चित्र आहे. कोरोनाकाळात यात अंशत: कमी आलेली आहे. अशास्थितीत जिल्हा समितीची सहा-सहा महिने बैठक होत नसल्याने प्रशासनाची याविषयी अनास्था दिसून येत आहे.

राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती विभागात होत आहे. शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यांत शासनाद्वारा अनेक योजना प्राधान्याने राबविण्यात येतात. मात्र, खऱ्या व गरजू शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचत नाही. शासन व प्रशासनाद्वारा शेतकरी आत्महत्या हा विषयच मुळात गंभीरतेने घेत नसल्यामुळे शेतकरी उपेक्षित राहत असल्याचा आरोप होत आहे.

बॉक्स

सन २००१ पासून १६,८४८ शेतकरी आत्महत्या

विभागात १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद महसूल विभागाद्वारे घेण्यात येते. त्यानुसार आतापर्यंत १६ हजार ८४८ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये ७,५६५ प्रकरणात वारसांना शासन मदत देण्यात आलेली आहे. ८,९७३ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आलेली आहे. याशिवाय ३९० प्रकरणे अद्यापही चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

बॉक्स

शेतकरी आत्महत्यांची स्थिती (जूनअखेर)

महिना २०१९ २०२० २०२१

जानेवारी ७७ ८३ ७८

फेब्रुवारी ७३ ९७ ७२

मार्च ८२ ५९ ८९

एप्रिल ७१ ५१ ६४

मे ९१ ११६ ७५

जून ८१ ९४ ८२

एकूण ४७५ ५०० ४६०