शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

कठोर संचारबंदीत आजपासून शिथिलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:10 IST

अमरावती : आठ दिवसांपासून संसर्गामध्ये घट झाल्याने आता कठोर संचारबंदीत शिथिलता देण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ११ ...

अमरावती : आठ दिवसांपासून संसर्गामध्ये घट झाल्याने आता कठोर संचारबंदीत शिथिलता देण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ११ पर्यंत सुरू राहत होती, त्यांना आता दुपारी २ पर्यंत मुभा मिळाली आहे. सर्व प्रकारची बिगर जीवनावश्यक दुकाने याच कालावधीत सुरू राहतील. मात्र, शनिवार आणि रविवारी बंद राहतील. दुपारी ३ नंतर संचारबंदी लागू करण्यात आल्याने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर जाता येणार नाही. तसे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी सायंकाळी जारी केले.

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारी महिन्यांपासून सुरू झालेली आहे. या काळात २१ फेब्रुवारीपासून लावण्यात आलेले कमी-अधिक प्रमाणातील संचारबंदीचे निर्बंध आतादेखील सुरू आहेत. विशेष म्हणजे, सध्या कोरोनाचा संसर्ग घटला आहे. याशिवाय सहा दिवसांत पाच ते सात टक्क्यांदरम्यान पॉझिटिव्हिटी असल्याने संचारबंदीचे सर्व निर्बंध हटणार, असे वाटत असताना, जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त शिथिलता दिल्याने नागरिकांसह व्यापारी वर्गाची घोर निराशा झाली आहे.

अत्यावश्यक सेवेतील सध्या सुरू असलेली सर्व प्रकारची शासकीय कार्यालये वगळता इतर कार्यालये, निमशासकीय कार्यालये व महामंडळांमध्ये २५ टक्के कर्मचारी ठेवून कामकाज करता येईल. याशिवाय अभ्यागतांचा प्रवेश मर्यादित ठेवावा लागणार आहे.

संचारबंदीच्या काळात नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नये. ग्राहकांनी दुकानात खरेदीसाठी जातेवेळी पायी जावे अथवा सायकलचा वापर करावा. अत्यावश्यक कारणांशिवाय व रॅपिड अँटिजेनचा रिपोर्ट सोबत असल्याशिवाय प्रवास करू नये. खरेदी करण्याकरिता घरपोच सेवा, ई-काॅमर्स, ऑनलाईन सिस्टीमचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

बॉक्स

जीवनावश्यक दुकानांची वेळ वाढवली

किराना दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्री, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्यपेय विक्री, पिठाची गिरणी, दुग्धजन्य पदार्थ विक्री, दूध वितरण केंद्रे या सर्व सुविधा सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू राहणार आहेत. याशिवाय शनिवार ते रविवार या कालावधीत बंद राहतील. याशिवाय सर्व प्रकारची मद्यालये, मद्य दुकाने व बार दररोज सकाळी ७ ते २ पर्यंत घरपोच सेवेकरिता सुरू राहणार आहेत.

बॉक्स

हॉटेल, रेस्टाॅरेंटद्वारे घरपोच सेवा

हॉटेल, रेस्टाॅरेंट, खानावळ व शिवभोजन थाळी यांची घरपोच सेवा सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास स्वत: जाऊन पार्सल घेता येणार नाही. या ठिकाणी ग्राहक आढळून आल्यास संबंधित आस्थापनेविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे.

बॉक्स

रेशन दुकान सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत

सर्व प्रकारची शासकीय रास्त दुकाने ही सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत वितरणाकरिता सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. संबंधित तहसीलदार तसेच शासकीय रास्त दुकानदार यांनी संलग्न लाभार्थींचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करावा व धान्य वितरणाकरिता टोकन सिस्टीमचा वापर करण्याचे निर्देश आहेत.

बॉक्स

नागरिकांना दुपारी ३ नंतर बाहेर निघण्यास मनाई

नागरिकांना दुपारी ३ नंतर अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. नियमांचा भंग केल्याचे निदर्शनात आल्यास सदर वाहन जप्त करण्यात येणार आहे. याशिवाय बाजार समित्या, फळबाजार, कृषिसेवा केंद्रे यापूर्वीच्या आदेशानुसार सुरू राहतील. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना कोणत्याही प्रकारे निर्बंध राहणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

बॉक्स

या आस्थापना राहतील बंद

सार्वजनिक, खासगी क्रीडांगणे, मंगल कार्यालये, बगीचे, सर्व चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक व्यवसाय नाट्यगृह, प्रेक्षागृह या कालावधीत बंद राहतील. मंगल कार्यालयांमध्ये लग्न समारंभ आयोजित केल्याचे प्रथम आढळल्यास ५० हजारांचा दंड व दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी व चार महिन्यांकरिता ते सील करण्यात येणार आहे.

बॉक्स

मास्क नसल्यास आता ७५० रुपये दंड

चेहऱ्याला मास्क नसल्यास आता ७५० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल. याशिवाय दुकाने व प्रतिष्ठानांमध्ये फिजिकल डिस्टन्स न पाळल्यास प्रथम ३५ हजार रुपये दंड व दुसऱ्यांदा फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ही कारवाई करणार आहे.

बॉक्स

कोरोना चाचणी निगेटिव्हशिवाय जिल्ह्यात प्रवेश नाही

जिल्ह्याच्या सर्व सीमावर्ती भागांत पोलिसांद्वारे नाकेबंदी करण्यात येणार आहे, संबंधितांचा रॅपिड अँटिजेन चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याशिवाय त्या व्यक्तीला जिल्ह्यात प्रवेश राहणार नाही. जिल्ह्याच्या सीमेवर वाहने रोखण्यात येतील. यात अंत्यसंस्कारासाठी जाणारी वाहने, वैद्यकीय, जीवनावश्यक व आपत्कालीन परिस्थिती आदी कारणांसाठी मनाई नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.