शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

नातेवाइकांनी दिला नकार महापालिकेकडून अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 05:00 IST

अमरावतीच्या हाथीपुरा येथील ४ एप्रिल २०२० रोजी मुमताज नामक व्यक्ती कोरोनाने दगावली होती. कोरोनाने मृत्यू झाल्याची ही पहिलीच नोंद करण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत कोरोनाने १,३०३ जणांचा बळी घेतला. कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याची गाईड लाईन निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

ठळक मुद्देसात कोरोना मृतदेहांची जबाबदारी, खर्चाचा भारदेखील उचलला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना संसर्गाने गत १४ महिन्यांच्या कोरोनाकाळात अनेकांना चांगले-वाईट अनुभव दाखविले. मात्र, कोरोनाने दगावलेल्या व्यक्तींचे मृतदेह आप्तेष्टांनी स्वीकारले नसल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. नातेवाइकांनी नाकारलेल्या अशा कोरोनाच्या सात मृतदेहांवर महापालिकेने अंत्यसंस्कार करून कर्तव्यपरायणतेचा परिचय दिला आहे. अमरावतीच्या हाथीपुरा येथील ४ एप्रिल २०२० रोजी मुमताज नामक व्यक्ती कोरोनाने दगावली होती. कोरोनाने मृत्यू झाल्याची ही पहिलीच नोंद करण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत कोरोनाने १,३०३ जणांचा बळी घेतला. कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याची गाईड लाईन निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. रुग्णालय ते स्मशानभूमी दरम्यान ॲम्ब्युलन्समधून कोरोना मृतदेह नेण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र कर्मचारी नियुक्त केले आहेत. महापालिकेच्या नियंत्रणात विलासनगर, एसआरपीएफ कॅम्प व शंकरनगर येथील स्मशानभूमीत कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. हिंदू स्मशानभूमीत कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारांसाठी गॅस दाहिनी, सरणाची  व्यवस्था आहे. पीडीएमसी, सुपर स्पेशालिटी व जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनावर उपचार घेताना दगावलेल्या सात जणांच्या नातेवाइकांनी  परत रुग्णालय प्रशासनाशी संपर्क केला नाही. पोलिसांकडून त्यांच्याशी संपर्क, संवाद साधण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यांनी दाद दिली नाही. अखेरीस महापालिकेने स्वत:ची यंत्रणा वापरून अशा सात मृतदेहांवर विधिवत अंत्यसंस्कार व दहन केल्याची माहिती प्रशासनाने दिली. 

स्मशानभूमीत १५० अस्थींना आप्तांची प्रतीक्षाशहरातील हिंदू स्मशानभूमीत कोरोना वा नैसर्गिक मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले जातात. येथे अंत्यसंस्कारानंतर अस्थी सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत १५० अस्थी लॉकर्समध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. अद्यापही नातेवाइकांनी त्या अस्थी नेल्या नाहीत, अशी माहिती हिंदू स्मशानभूमीचे प्रबंधक एकनाथ इंगळे यांनी ‘लोकमत’ला दिली. महापालिका प्रशासनाकडून प्राप्त पत्रानुसार बेवारस अथवा नातेवाइकांनी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला, अशा सात कोरोना मृतदेहांवर अंत्यविधी केल्याचे इंगळे यांनी सांगितले.

बेवारस मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी निधीबेवारस मृत्यू, अंत्यसंस्कारासाठी पैसे नाही अथवा नातेवाइकांनी मृतदेह नाकारल्यास महापालिका अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारते. त्याकरिता महापालिकेने अग्रीम निधी मंजूर केला आहे. बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे दायित्व महापालिकेने स्वीकारले आहे.

कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी नव्हे, तर हे कर्तव्य म्हणून महापालिका पार पाडत आहे. मृतदेहांसाठी ॲम्ब्युलन्स, वाहने उपलब्ध आहेत. दोन चालक, आठ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. आतापर्यत नातेवाइकांनी नाकारलेल्या सात कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. - प्रशांत रोडे, आयु्क्त, महापालिका 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू