शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

एनएचएम कर्मचाऱ्यांना मिळणार पुनर्नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2017 00:21 IST

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यभरात आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या अधिकारी

परिपत्रक धडकले : आदेश देण्याची प्रक्रिया सुरूअमरावती : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यभरात आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ११ महिन्यांसाठी पुनर्नियुक्ती मिळणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांना ३ एप्रिलपासून पुढील ११ महिन्यांसाठी कंत्राटी तत्त्वावर पुनर्नियुक्ती देण्यात यावी, अशा आशयाचे परिपत्रक राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक (अतांत्रिक) सुनील पाटील यांच्या स्वाक्षरीने सोमवार २७ मार्च रोजी जारी करण्यात आले आहे. त्यामुळे पुनर्नियुक्तीबाबतच्या उलट सुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या राज्यभरातील जवळपास २२ हजार कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी अभियान व राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विविध राष्ट्रीय संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यासाठी आरोग्य विभगात विविध पदांवर कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल राज्यभरात २२ हजार अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. सन २०१२ मध्ये या अभियानाचा अवधी पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आला होता. ही मुदत ३१ मार्च २०१७ रोजी संपुष्टात आल्यानंतर अभियान गुंडाळण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या अभियानातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती देण्यात यावी, असे कळविण्यात आले होते. यामुळे या अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या हजारो अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनात नोकरीच्या शाश्वतीविषयी संभ्रम निर्माण झाला होता. या अभियानाला आणखी एक वर्षाची मुदतवाढ मिळाल्यामुळे पुनर्नियुक्ती देण्यात येणार आहे. अभियानांतर्गत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना १एप्रिल २०१७ रोजीच्या सेवाखंड देऊन २ एप्रिल रोजीच्या शासकीय सुटी असल्यामुळे ३ एप्रिल १७ पासून पुढील अकरा महिन्यांसाठी पुनर्नियुक्ती देण्यात यावी असे या परिपत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)७९३ जणांना दिलासा जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात जिल्हाभरात ७९३ अधिकारी व कर्मचारी कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक (अतांत्रिक)सुनील पाटील यांच्या स्वाक्षरीने सोमवार २७ मार्च रोजी अभियानातील सर्वानांना पुनर्नियुक्ती देण्याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाभरातील या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.