शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

एनएचएम कर्मचाऱ्यांना मिळणार पुनर्नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2017 00:21 IST

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यभरात आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या अधिकारी

परिपत्रक धडकले : आदेश देण्याची प्रक्रिया सुरूअमरावती : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यभरात आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ११ महिन्यांसाठी पुनर्नियुक्ती मिळणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांना ३ एप्रिलपासून पुढील ११ महिन्यांसाठी कंत्राटी तत्त्वावर पुनर्नियुक्ती देण्यात यावी, अशा आशयाचे परिपत्रक राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक (अतांत्रिक) सुनील पाटील यांच्या स्वाक्षरीने सोमवार २७ मार्च रोजी जारी करण्यात आले आहे. त्यामुळे पुनर्नियुक्तीबाबतच्या उलट सुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या राज्यभरातील जवळपास २२ हजार कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी अभियान व राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विविध राष्ट्रीय संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यासाठी आरोग्य विभगात विविध पदांवर कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल राज्यभरात २२ हजार अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. सन २०१२ मध्ये या अभियानाचा अवधी पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आला होता. ही मुदत ३१ मार्च २०१७ रोजी संपुष्टात आल्यानंतर अभियान गुंडाळण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या अभियानातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती देण्यात यावी, असे कळविण्यात आले होते. यामुळे या अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या हजारो अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनात नोकरीच्या शाश्वतीविषयी संभ्रम निर्माण झाला होता. या अभियानाला आणखी एक वर्षाची मुदतवाढ मिळाल्यामुळे पुनर्नियुक्ती देण्यात येणार आहे. अभियानांतर्गत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना १एप्रिल २०१७ रोजीच्या सेवाखंड देऊन २ एप्रिल रोजीच्या शासकीय सुटी असल्यामुळे ३ एप्रिल १७ पासून पुढील अकरा महिन्यांसाठी पुनर्नियुक्ती देण्यात यावी असे या परिपत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)७९३ जणांना दिलासा जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात जिल्हाभरात ७९३ अधिकारी व कर्मचारी कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक (अतांत्रिक)सुनील पाटील यांच्या स्वाक्षरीने सोमवार २७ मार्च रोजी अभियानातील सर्वानांना पुनर्नियुक्ती देण्याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाभरातील या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.