शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

एनआरएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करा

By admin | Updated: December 23, 2015 00:14 IST

संपूर्ण राज्यात जिल्हास्तरावर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत हजारो कंत्राटी योजनेनिहाय कार्यक्रमाच्या ...

मागण्या प्रलंबित : केंद्रस्तरावरील सूचनांना राज्याची बगलअमरावती : संपूर्ण राज्यात जिल्हास्तरावर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत हजारो कंत्राटी योजनेनिहाय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरावर उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रारावर हे कंत्राटी कर्मचारी अनेक वर्षांपासून सेवारत आहेत. अद्यापही त्यांना नियमित करण्याची मागणी होत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्य्रम १२ एप्रिल २००५ पासून सुरू करण्यात आला. कार्यक्रमाचा पहिला टप्पा ३१ मार्च २०१२ रोजी संपुष्टात येऊन दुसरा टप्पा १ एप्रिल २०१२ रोजी सुरु करण्यात आला. सदर अभियान केंद्र पुरस्कृत असल्यामुळे प्रत्येक राज्यात राबविले जात आहे. सुरुवातीला केंद्र शासनाकडून ८५८ चे अनुदान उपलब्ध करुन देण्यात येत आहे. उर्वरित १५ टक्के राज्य सरकार देत आहे. दुसऱ्या टप्प्यात मात्र केंद्राकडून ७५ टक्के निधी उपलब्ध करुन दिला जात असून उर्वरित २५ टक्के राज्य सरकार देत आहे. दिवसेंदिवस या अभियानाचा व्याप वाढत आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कामाचा अधिक भार पडत आहे. परंतु त्या तुलनेत त्यांना अत्यल्प मानधन दिले जात आहे. समान कामासाठी समान वेतन असा कायदा असतानाही कंत्राटी कर्मचाऱ्यांविषयी अनास्था दाखविली जात आहे. कुठलीही शासकीय सेवा त्यांना दिली जात नाही. बऱ्याच कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शासन सेवेकरिता आवश्यक असलेली विहीत वयोमर्यादा ओलांडली आहे. तरीही याची पिळवणूक केली जात आहे. त्यामुळे सदर अभियान हे कंत्राटी स्तरावर न राबविता ते नियमित स्तरावर राबविण्याबाबतच्या सूचना केंद्रास्तरावरुन प्राप्त झाल्या असताना राज्यस्तरावर त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील अधिकारी कर्मचारी महासंघाचेवतीने करण्यात येत आहे. त्यामुळे सदर योजनेचे महत्त्व लक्षात घेता व कार्यरत कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार करता सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करण्याची मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)