सीबीएसई : अमरावती टॉपर प्रसाद केदारचे मनोगतअमरावती : विभागात प्रथम येईल असा विश्वास नव्हता. परंतु आशा होती. बारावीच्या सुरुवातीपासून नियमित अभ्यास केला, वर्गात शिक्षकांद्वारा शिकविले जाणारे विषयांकडे पूर्ण लक्ष दिले. दुपारी व सायंकाळी अभ्यास, नंतर मित्रासमवेत दिवसभऱ्यातील अभ्यासावर चर्चा हा दिनक्रम होता. नियमित अभ्यास हेच माझ्या यशाचे गमक असल्याचे सीबीएसई पॅटर्नमध्ये विभागात प्रथम आलेल्या प्रसाद याने सांगितले. प्राचार्यांनी अभ्यासाचे, परीक्षेचे टेन्शन कधी येऊ दिले नाही. ते रोज आमच्यासोबत सायंकाळी खेळ खेळायचे. शासकीय नवोदय विद्यालय येथील ही निवासी शाळा, होस्टेलमध्ये राहणे यामुळे शिक्षकांशी जवळचे नाते तयार होते. असे वातावरण अभ्यासातील आवश्यक असल्याचे प्रसादने सांगितले. आई, वडिल प्रोत्साहनामुळे आत्मविश्वास वाढला. खासगी कोचिंग क्लास विषयी तो म्हणाला, तिथे शिकविले जाते. अभ्यास मात्र विद्यार्थ्यांनाच करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या यशात त्यांचा पूर्णत: वाटा नसतो, असे तो म्हणाला. बारावीनंतर इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करणार असल्याचे त्याचे सांगितले. (प्रतिनिधी)सर्व विद्यार्थ्यांप्रमाणे प्रसादलाही तीच वागणूकआपण नवोदय विद्यालयात शिक्षक असलो तरी प्रसादला सर्व विद्यार्थ्यांप्रमाणेच वागणूक मिळालेली आहे. कुठलीही विशेष 'ट्रीट' नाही. सर्व शिक्षकांनी याविषयी आपण सांगितले होते. मुळात प्रसाद पहिल्या वर्गापासूनच ९० टक्क्यांवर गुण घेऊन उत्तीर्ण होत आलेला आहे. गुणी विद्यार्थी म्हणून त्याची शाळेत नोंद आहे. शाळेचे अभ्यासपूर्ण वातावरण व शिक्षकांची कठोर मेहनतीमुळे प्रसादला हे यश संपादन करता आले, याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे त्याचे वडील गुणवंत केदार, आई दीपाली यांनी सांगितले.
नियमित अभ्यास हेच यशाचे गमक
By admin | Updated: May 26, 2015 00:26 IST