शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

 अधिकारी- लोकप्रतिनिधी यांच्यातील दरी कमी व्हावी; विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 18:46 IST

पत्रांना उत्तर न देणे, कार्यक्रम पत्रिकेत राजशिष्टाचार न पाळणे, जनतेच्या समस्या आणि प्रश्नांना बगल देणे आदी बाबींमुळे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात तणाव, दरी वाढत आहे. त्यामुळे ही दरी कमी होऊन जनेतेचे प्रश्न सुटावे, यासाठी विधान परिषदेची विशेषाधिकार समिती प्रामुख्याने काम करीत असल्याची माहिती समितीच्या प्रमुख आमदार नीलम गो-हे यांनी अमरावती येथे दिली.

अमरावती : पत्रांना उत्तर न देणे, कार्यक्रम पत्रिकेत राजशिष्टाचार न पाळणे, जनतेच्या समस्या आणि प्रश्नांना बगल देणे आदी बाबींमुळे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात तणाव, दरी वाढत आहे. त्यामुळे ही दरी कमी होऊन जनेतेचे प्रश्न सुटावे, यासाठी विधान परिषदेची विशेषाधिकार समिती प्रामुख्याने काम करीत असल्याची माहिती समितीच्या प्रमुख आमदार नीलम गो-हे यांनी अमरावती येथे दिली.विधान परिषद विशेषाधिकार समितीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागप्रमुखांची बैठक घेऊन प्रश्न, समस्यांवर लक्ष वेधले. त्यानंतर समिती प्रमुख आ. गो-हे यांनी पत्रपरिषदद्वारा बैठकीत झालेल्या प्रमुख मुद्द्यांबाबतची माहिती दिली. त्यांच्या मते, आमदार-खासदारांना विशेषाधिकार आहेत. लोकप्रतिनिधींना प्राप्त विशेषाधिकार आणि राजशिष्टाचाराचे पालन अधिका-यांनी करणे अपेक्षित आहे. मात्र, बहुतांश जिल्ह्यांमध्ये अधिकारी-लोकप्रतिनिधींमध्ये संघर्षाची ठिणगी उडत असल्याने जनतेच्या विकासकामांकडे दुर्लक्ष होते. लोकप्रतिनिधींंच्या पत्राला अधिका-यांनी नियमानुसार ठरावीक कालावधीत उत्तर दिले, तर दरी येणार नाही, ही बाब बैठकीत ठणकावून सांगितल्याचे त्यांनी सांगितले. ब-याच विभागात मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या विशेषाधिकारावर गदा येणार नाही, ही काळजी विभागप्रमुखांनी घेण्याबाबत सूचना केल्या आहेत. अधिकारी-लोकप्रतिनिधींमध्ये प्रसंगी संघर्ष उद्भवल्यास अधिका-यांची साक्ष, शिस्तभंगाची कारवाई आदी भानगडी वाढतात. त्यामुळे अधिकारी- लोकप्रतिनिधींनी नियम-अधिकाराचे पालन करावे, यावर समितीचा भर असल्याचे त्या म्हणाल्या. ही समिती राज्यभर दौरे करणार आहे. विशेषत: महसूल विभागाने शेतक-यांबाबत सकारात्मक भूमिका वठवावी, याविषयी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. महापौर, जिल्हा परिषद अध्यक्षांचा प्रोटोकॉल प्रशासनाने पाळावा, असे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला समितीचे सदस्य आ. रामराव वडकुते, आ. ख्वाजा बेग, उपसचिव कानेड, अवर सचिव उमेश शिंदे यांच्यासह शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रशांत वानखडे, शहराध्यक्ष सुनील खराटे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Amravatiअमरावती