शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

 अधिकारी- लोकप्रतिनिधी यांच्यातील दरी कमी व्हावी; विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 18:46 IST

पत्रांना उत्तर न देणे, कार्यक्रम पत्रिकेत राजशिष्टाचार न पाळणे, जनतेच्या समस्या आणि प्रश्नांना बगल देणे आदी बाबींमुळे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात तणाव, दरी वाढत आहे. त्यामुळे ही दरी कमी होऊन जनेतेचे प्रश्न सुटावे, यासाठी विधान परिषदेची विशेषाधिकार समिती प्रामुख्याने काम करीत असल्याची माहिती समितीच्या प्रमुख आमदार नीलम गो-हे यांनी अमरावती येथे दिली.

अमरावती : पत्रांना उत्तर न देणे, कार्यक्रम पत्रिकेत राजशिष्टाचार न पाळणे, जनतेच्या समस्या आणि प्रश्नांना बगल देणे आदी बाबींमुळे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात तणाव, दरी वाढत आहे. त्यामुळे ही दरी कमी होऊन जनेतेचे प्रश्न सुटावे, यासाठी विधान परिषदेची विशेषाधिकार समिती प्रामुख्याने काम करीत असल्याची माहिती समितीच्या प्रमुख आमदार नीलम गो-हे यांनी अमरावती येथे दिली.विधान परिषद विशेषाधिकार समितीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागप्रमुखांची बैठक घेऊन प्रश्न, समस्यांवर लक्ष वेधले. त्यानंतर समिती प्रमुख आ. गो-हे यांनी पत्रपरिषदद्वारा बैठकीत झालेल्या प्रमुख मुद्द्यांबाबतची माहिती दिली. त्यांच्या मते, आमदार-खासदारांना विशेषाधिकार आहेत. लोकप्रतिनिधींना प्राप्त विशेषाधिकार आणि राजशिष्टाचाराचे पालन अधिका-यांनी करणे अपेक्षित आहे. मात्र, बहुतांश जिल्ह्यांमध्ये अधिकारी-लोकप्रतिनिधींमध्ये संघर्षाची ठिणगी उडत असल्याने जनतेच्या विकासकामांकडे दुर्लक्ष होते. लोकप्रतिनिधींंच्या पत्राला अधिका-यांनी नियमानुसार ठरावीक कालावधीत उत्तर दिले, तर दरी येणार नाही, ही बाब बैठकीत ठणकावून सांगितल्याचे त्यांनी सांगितले. ब-याच विभागात मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या विशेषाधिकारावर गदा येणार नाही, ही काळजी विभागप्रमुखांनी घेण्याबाबत सूचना केल्या आहेत. अधिकारी-लोकप्रतिनिधींमध्ये प्रसंगी संघर्ष उद्भवल्यास अधिका-यांची साक्ष, शिस्तभंगाची कारवाई आदी भानगडी वाढतात. त्यामुळे अधिकारी- लोकप्रतिनिधींनी नियम-अधिकाराचे पालन करावे, यावर समितीचा भर असल्याचे त्या म्हणाल्या. ही समिती राज्यभर दौरे करणार आहे. विशेषत: महसूल विभागाने शेतक-यांबाबत सकारात्मक भूमिका वठवावी, याविषयी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. महापौर, जिल्हा परिषद अध्यक्षांचा प्रोटोकॉल प्रशासनाने पाळावा, असे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला समितीचे सदस्य आ. रामराव वडकुते, आ. ख्वाजा बेग, उपसचिव कानेड, अवर सचिव उमेश शिंदे यांच्यासह शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रशांत वानखडे, शहराध्यक्ष सुनील खराटे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Amravatiअमरावती