शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात आठ सहायक प्राध्यापकांची भरती प्रक्रिया रद्द

By admin | Updated: March 9, 2017 00:11 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात १० व ११ मार्च रोजी होऊ घातलेल्या ८ सहायक प्राध्यापकांच्या मुलाखती रद्द करण्यात आल्या आहेत.

शासनादेश : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याचा परिणामअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात १० व ११ मार्च रोजी होऊ घातलेल्या ८ सहायक प्राध्यापकांच्या मुलाखती रद्द करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा लागू झाल्यामुळे ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. कालातंराने नवीन कायद्याप्रमाणे ही भरती राबविली जाणार आहे.विद्यापीठांचा कारभार पारदर्शक आणि शिक्षण विद्यार्थी केंद्रितच असावे, यासाठी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने १ मार्चपासून सर्वच विद्यापीठांमध्ये महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ लागू केला आहे. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाला नवीन कायद्याच्या अधीन राहूनच कारभार करावा लागणारा आहे. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विषयांची अंमलबजावणी ही यापुढे नवीन कायद्यानुसार करावी लागणार आहे. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात आठ सहायक प्राध्यापकांची आरक्षणानुसार भरती करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. यात विद्यापीठातील गृहविज्ञान, सांख्यिकी, सूक्ष्मजीवशास्त्र व संगणक विज्ञान विभागात सहायक प्राध्यापक या ४ जागा एसटी प्रर्वगातील राखीव होत्या. विधी, सोशालॉजी व बिझनेस मॅनेजमेंट या विभागात सहायक प्राध्यापकांच्या तीन जागा या खुल्या संवर्गातील भरती केली जाणार होती. शारीरिक शिक्षण विभागात सहायक प्राध्यापकासाठी एक जागा ही अनुसूचित जाती संवर्गासाठी राखीव होती. आठ सहायक प्राध्यापकांसाठी प्राप्त अर्जानुसार १० व ११ मार्च रोजी मुलाखतीचे सत्र राबविले जाणार होते. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली मुलाखत वजा निवड समिती निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने संबंधितांना मुलाखतीसाठी उपस्थितीबाबत पत्रव्यवहार देखील केला. मात्र महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ अन्वये शिक्षण क्षेत्राशी संबंधित कोणत्याही बाबी या नवीन कायद्याप्रमाणे राबविणे नियमावली आहे. परिणामी शासनाने अमरावती विद्यापीठात १० व ११ मार्च रोजी राबविल्या जाणाऱ्या ८ सहायक प्राध्यापकांची भरती रद्द करण्याबाबतच्या विद्यापीठाला सूचना मंगळवारी पाठविल्या आहेत. त्यामुळे सहायक प्राध्यापकांची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय झाल्यामुळे विद्यापीठात ‘कही खुशी, कही गम’ असे चित्र बुधवारी अनुभवता आले.विद्यापीठाचा नवीन कायदा वेगळा आहे. त्यामुळे शिक्षणक्षेत्राशी संबंधित निर्णय हे नवीन कायद्याप्रमाणे घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सहायक प्राध्यापकांची भरती रद्द करण्यात आली आहे.- अजय देशमुख,कुलसचिव, विद्यापीठ