शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

विद्यापीठात आठ सहायक प्राध्यापकांची भरती प्रक्रिया रद्द

By admin | Updated: March 9, 2017 00:11 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात १० व ११ मार्च रोजी होऊ घातलेल्या ८ सहायक प्राध्यापकांच्या मुलाखती रद्द करण्यात आल्या आहेत.

शासनादेश : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याचा परिणामअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात १० व ११ मार्च रोजी होऊ घातलेल्या ८ सहायक प्राध्यापकांच्या मुलाखती रद्द करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा लागू झाल्यामुळे ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. कालातंराने नवीन कायद्याप्रमाणे ही भरती राबविली जाणार आहे.विद्यापीठांचा कारभार पारदर्शक आणि शिक्षण विद्यार्थी केंद्रितच असावे, यासाठी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने १ मार्चपासून सर्वच विद्यापीठांमध्ये महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ लागू केला आहे. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाला नवीन कायद्याच्या अधीन राहूनच कारभार करावा लागणारा आहे. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विषयांची अंमलबजावणी ही यापुढे नवीन कायद्यानुसार करावी लागणार आहे. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात आठ सहायक प्राध्यापकांची आरक्षणानुसार भरती करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. यात विद्यापीठातील गृहविज्ञान, सांख्यिकी, सूक्ष्मजीवशास्त्र व संगणक विज्ञान विभागात सहायक प्राध्यापक या ४ जागा एसटी प्रर्वगातील राखीव होत्या. विधी, सोशालॉजी व बिझनेस मॅनेजमेंट या विभागात सहायक प्राध्यापकांच्या तीन जागा या खुल्या संवर्गातील भरती केली जाणार होती. शारीरिक शिक्षण विभागात सहायक प्राध्यापकासाठी एक जागा ही अनुसूचित जाती संवर्गासाठी राखीव होती. आठ सहायक प्राध्यापकांसाठी प्राप्त अर्जानुसार १० व ११ मार्च रोजी मुलाखतीचे सत्र राबविले जाणार होते. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली मुलाखत वजा निवड समिती निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने संबंधितांना मुलाखतीसाठी उपस्थितीबाबत पत्रव्यवहार देखील केला. मात्र महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ अन्वये शिक्षण क्षेत्राशी संबंधित कोणत्याही बाबी या नवीन कायद्याप्रमाणे राबविणे नियमावली आहे. परिणामी शासनाने अमरावती विद्यापीठात १० व ११ मार्च रोजी राबविल्या जाणाऱ्या ८ सहायक प्राध्यापकांची भरती रद्द करण्याबाबतच्या विद्यापीठाला सूचना मंगळवारी पाठविल्या आहेत. त्यामुळे सहायक प्राध्यापकांची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय झाल्यामुळे विद्यापीठात ‘कही खुशी, कही गम’ असे चित्र बुधवारी अनुभवता आले.विद्यापीठाचा नवीन कायदा वेगळा आहे. त्यामुळे शिक्षणक्षेत्राशी संबंधित निर्णय हे नवीन कायद्याप्रमाणे घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सहायक प्राध्यापकांची भरती रद्द करण्यात आली आहे.- अजय देशमुख,कुलसचिव, विद्यापीठ