शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पेसा क्षेत्रातील भरती करा; मंत्रालयात आदिवासी उमेदवारांचा ठिय्या

By गणेश वासनिक | Updated: October 2, 2024 18:32 IST

Amravati : यवतमाळात साखळी उपोषण, १३ जिल्ह्यांत १७ संवर्गांतील भरती रखडली

अमरावती : राज्यातील पेसा क्षेत्रातील १३ जिल्ह्यांत १७ संवर्गांमधील अंतिम शिफारस प्राप्त आदिवासी उमेदवारांना अद्यापर्यंत नियुक्ती आदेश मिळालेले नसल्यामुळे ३० सप्टेंबरपासून बेरोजगार आदिवासी उमेदवारांनी मंत्रालयाच्या बाहेरच ठिय्या मांडला आहे. मुलांजवळ पैसे नसल्यामुळे ते उपाशीपोटीच उघड्यावर मंत्रालयाबाहेर झोपले आहेत. तर यवतमाळात गत आठ दिवसांपासून आदिवासी उमेदवार साखळी उपोषणाला बसले आहेत.

पेसा भरतीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. पेसा क्षेत्रातील बेरोजगार आदिवासी उमेदवारांना १५ सप्टेंबरपर्यंत नियुक्ती आदेश देण्यात येईल, अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २९ ऑगस्ट रोजी सह्याद्री अतिथी गृहावर पार पडलेल्या बैठकीत आदिवासी शिष्टमंडळाला दिली होती. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून अंतिम शिफारस प्राप्त आदिवासी उमेदवारांना १५ सप्टेंबरपर्यंत नियुक्ती आदेश मिळेल, या आशेने आदिवासींच्या शिष्टमंडळाने सरकारला सकारात्मक प्रतिसाद देत १ ऑगस्टपासून नाशिक व इतरही आदिवासीबहुल जिल्ह्यात सुरू असलेले उपोषण मागे घेतले होते. मात्र, अद्यापही अंतिम शिफारस झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळालेले नाहीत. त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील बेरोजगार आदिवासी उमेदवारांनी ३० सप्टेंबरला मंत्रालय गाठले. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने १३ ऑक्टोबर २०२३ रोजी आणि महसूल व वन विभागाने १७ ऑक्टोबर रोजी पत्र काढून अनुसूचित क्षेत्रातील संपूर्ण भरती प्रक्रिया थांबविली आहे. त्यामुळे आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात १०० टक्के, ५० टक्के आणि २५ टक्के आरक्षित असलेली पदे अद्यापही रिक्त आहे. बिगर आदिवासी उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिनस्त राहून नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. मात्र, यातून केवळ आदिवासी उमेदवारांना वगळण्यात येऊन भेदभाव करण्यात आला आहे. पेसा क्षेत्रातील १७ संवर्गाची कायमस्वरूपी पदभरती तत्काळ करण्यात यावी. शिफारस पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात यावेत, यासाठी आदिवासी उमेदवार मंत्रालयात ठाण मांडून बसले आहे.

यवतमाळातही साखळी उपोषणपेसा क्षेत्रातील शिफारस पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळण्यात यावे, यासाठी यवतमाळ येथील जिल्हा परिषदेसमोर २५ सप्टेंबरपासून आदिवासी उमेदवारांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला आठ दिवस झाले आहेत. गौरव गेडाम, अशोक आत्राम, आकाश मेश्राम, सूर्यकांत पेंदोर, वैभव कुडमथे, पंकज पेंदोर, रोहित मरसकोल्हे, बादल मडावी, मनोज गेडाम, रोशन चांदेकर, गोपाळ बोरीकर, अतुल कुळसंगे, शुभांगी पेंदोर, स्नेहा आडे, काजल किनाके, कल्याणी चांदेकर, पूजा मडावी, भाग्यश्री आत्राम, प्रांजली आत्राम, शीला अर्के आदी बेरोजगार आदिवासी उमेदवार उपोषणाला बसले आहेत.

टॅग्स :GovernmentसरकारjobनोकरीTrible Development Schemeआदिवासी विकास योजनाAmravatiअमरावतीYavatmalयवतमाळ