शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पावती घरपोहोच देताय? विमा कंपनीचे नव्हे, शेतकऱ्यांचे भले करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2022 23:51 IST

या अभियानात शेतकऱ्यांना विम्याची रक्कम विमा उतरविलेल्या पिकाचे प्रकार, विमा संरक्षित पिकाचे क्षेत्र, विमा हप्त्याची रक्कम, आदी तपशिलाचा रेकाॅर्ड प्राप्त होईल. ही माहिती विमा दाव्याच्या प्रकरणी महत्त्वाची ठरणार आहे. पीक विमा योजनेतील उणिवा दूर करण्यासोबतच जागरूकता निर्माण करण्यास मदत होण्यास होणार आहे. याशिवाय योजनेविषयीचे गैरसमज दूर होणार आहे. अभियान १ सप्टेंबरपासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत पीक विमा योजना व पुनर्रचित हवामानवर आधारित फळपीक विमा योजनेमध्ये यंदा ‘मेरे पॉलिसी, मेरे हाथ’ हे अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना त्यांच्या विम्याची मूळ पावती घरपोहोच देण्यात येणार आहे. संकल्पना चांगली असली, तरी योजनेत कंपन्यांचे नव्हे तर शेतकऱ्यांचे हित जोपासा, अशी मागणी होत आहे.या अभियानात शेतकऱ्यांना विम्याची रक्कम विमा उतरविलेल्या पिकाचे प्रकार, विमा संरक्षित पिकाचे क्षेत्र, विमा हप्त्याची रक्कम, आदी तपशिलाचा रेकाॅर्ड प्राप्त होईल. ही माहिती विमा दाव्याच्या प्रकरणी महत्त्वाची ठरणार आहे. पीक विमा योजनेतील उणिवा दूर करण्यासोबतच जागरूकता निर्माण करण्यास मदत होण्यास होणार आहे. याशिवाय योजनेविषयीचे गैरसमज दूर होणार आहे. अभियान १ सप्टेंबरपासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. 

२०२१ मध्ये १.८१ लाख अर्जसन २०२१मध्ये १,८१,०२७ अर्ज प्राप्त झाले होते. यामध्ये ५५,६६१ शेतकऱ्यांना ३१.१० कोटींचा विमा देण्यात आला. फळपीक विमा योजनेत ५,५२१ व आंबिया बहरासाठी २,५६४ शेतकऱ्यांनी सहभाग होता.

यंदा २,१९,१०१ शेतकऱ्यांचा सहभागप्रधानमंत्री पीक विमा योजनेत यंदा २,१९,१०१ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. सोयाबीन पिकासाठी सर्वाधिक १,१७,००३ शेतकरी सहभाग आहे.

५६ हजार शेतकऱ्यांना मिळाले ३४ कोटीगतवर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ५६,१६२ शेतकऱ्यांना ३५.२६ कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे. यामध्ये एक हजार रुपयांपेक्षा कमी भरपाई ३,१३३ शेतकऱ्यांना मिळाल्याचे वास्तव आहे.

सर्वाधिक विमा सोयाबीनचायंदा पीक विमा योजनेमध्ये सर्वाधिक १,१७,००३ शेतकऱ्यांचा सहभाग सोयाबीन पिकासाठी आहे. याशिवाय तुरीसाठी ४१,९६८ व कपाशीसाठी १९,९९३ शेतकऱ्यांनी सहभागी आहे.

गतवर्षी पीक विमा न मिळाल्याच्या तक्रारीगतवर्षी सोयाबीन, मूग व उडीद पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातुलनेत कंपन्यांनी विमा भरपाई न दिल्याने शेकडो तक्रारी दाखल झाल्या होत्या. 

विमा कंपन्यांचेच भले नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना कंपनीद्वारा ४० टक्क्यांपेक्षा कमी शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येते. केवळ कंपन्यांचे चांगभल करण्यासाठी पीकविमा असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेतल्या जात नसल्याचा आरोप आहे.

काय आहे ‘माझी पॉलिसी, माझ्या हातात’?‘माझी पॉलिसी माझ्या हातात’ हे विमा कंपन्यांद्वारा अभियान आहे. यामध्ये शेतकऱ्यांना त्यांनी सहभाग घेतलेली मूळ पॉलिसी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

पीकविमा कंपनीद्वारा खरीप पीक व फळपीक विम्यामध्ये सहभागी शेतकऱ्यांना पीक विम्याची मूळ पॉलिसी देण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये जिल्हाभरात हे अभियान राबविले जाणार आहे.- अनिल खर्चान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा