शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्नियोजनाचा मुद्दा विभागीय आयुक्तांच्या कोर्टात ?

By admin | Updated: December 22, 2016 00:33 IST

जिल्हा परिषदेच्या विविध लेखाशिर्षातील मार्च २०१७ अखेर पर्यंतच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत अपेक्षित बचत किंवा ...

विरोधक सरसावले : नियमबाह्य ठराव घेतल्याचा आक्षेप जितेंद्र दखने अमरावती जिल्हा परिषदेच्या विविध लेखाशिर्षातील मार्च २०१७ अखेर पर्यंतच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत अपेक्षित बचत किंवा वाढीच्या सुमारे ८ कोटी ७९ लाखांच्या पुनर्नियोजनास सोमवारी विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. मात्र, सत्ताधाऱ्यांनी घेतलेला ठराव नियमबाह्य असल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला आहे. आता याविषयावर विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्याची तयारी विरोधकांनी चालविली आहे. त्यामुळे पुनर्नियोजन कायम राहणार की कसे, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या जि.प.च्या सर्वसाधारण सभेतील वादावर पडदा पडत नाही तोच पुन्हा १९ डिसेंबरला जि.प.ची सभा पार पडली. यासभेत सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या बळावर जिल्हा निधी सन २०१६-१७ अंतर्गत निधीच्या पुनर्नियोजनाचा ठराव एकमताने पारित केला. विशेष सर्वसाधारण सभेच्या अजेंडयावर पुनर्नियोजनाचा समावेश होता. मात्र, याबाबतची नोट सभागृहातील सदस्यांना देण्यात आली नाही. त्यामुळे नेमके नियोजन कशाचे, हे सदस्यांना कसे कळणार, असा सवाल विरोधी सदस्यांनी प्रशासनाकडे केला. मात्र,यावर प्रशासनाने मौन बाळगल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे नियमबाह्य पद्धतीने केलेल्या पुनर्नियोजनाविरोधात विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्यासाठी विरोधी सदस्यांनी १९ डिसेंबरच्या सभेतील कामकाज व पुनर्नियोजन मंजूर केल्याच्या ठरावाची प्रत लेखी स्वरूपात मागितली आहे. मात्र, अद्याप विरोधीपक्षाला ती प्रत मिळाली नसल्याची माहिती आहे. परिणामी सत्ताधारी व विरोधकांमधील कलह वाढण्याची शक्यता आहे . जि.प.च्या अर्थसंकल्पात जिल्हा निधीत मिळणाऱ्या स्वउत्पन्नातून विकासकामे तसेच विभागनिहाय महत्त्वाच्या कामाकरिता आर्थिक तरतूद होते. मात्र यातील काही निधी मार्च अखेरपर्यंत अखर्चित राहणाऱ्या निधीचे पुनर्नियोजन करण्यात आले आहे. विशेष सर्वसाधारण सभेत याबाबतचा ठराव पारीत करण्यात आला आहे. मात्र, विरोधकांनी चालविलेल्या हालचाली लक्षात घेता यात अडचणी येण्याची शक्यता आहे. जि.प.ची विशेष सर्वसाधारण सभा नियमबाह्य असून सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या ठरावाची प्रत प्रशासनाला मागितली आहे. मात्र ती अद्याप मिळाली नाही. चुकीच्या निर्णयाविरोधात विभागीय आयुक्तांकडे दाद मागू -अभिजित ढेपे, जि. प. सदस्य पुनर्नियोजनाचा ठरावात नियमबाह्य काहीच नाही. अखर्चित निधीचा विनियोग हा विकासकामांवर केला जाईल. विरोधकांचा खटाटोप केवळ राजकीय हेतुने प्रेरीत आहे. त्यामुळे त्यांच्या आक्षेपाला महत्त्व नाही - बबलू देशमुख, गटनेता काँग्रेस