शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्नियोजनाचा मुद्दा विभागीय आयुक्तांच्या कोर्टात ?

By admin | Updated: December 22, 2016 00:33 IST

जिल्हा परिषदेच्या विविध लेखाशिर्षातील मार्च २०१७ अखेर पर्यंतच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत अपेक्षित बचत किंवा ...

विरोधक सरसावले : नियमबाह्य ठराव घेतल्याचा आक्षेप जितेंद्र दखने अमरावती जिल्हा परिषदेच्या विविध लेखाशिर्षातील मार्च २०१७ अखेर पर्यंतच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत अपेक्षित बचत किंवा वाढीच्या सुमारे ८ कोटी ७९ लाखांच्या पुनर्नियोजनास सोमवारी विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. मात्र, सत्ताधाऱ्यांनी घेतलेला ठराव नियमबाह्य असल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला आहे. आता याविषयावर विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्याची तयारी विरोधकांनी चालविली आहे. त्यामुळे पुनर्नियोजन कायम राहणार की कसे, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या जि.प.च्या सर्वसाधारण सभेतील वादावर पडदा पडत नाही तोच पुन्हा १९ डिसेंबरला जि.प.ची सभा पार पडली. यासभेत सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या बळावर जिल्हा निधी सन २०१६-१७ अंतर्गत निधीच्या पुनर्नियोजनाचा ठराव एकमताने पारित केला. विशेष सर्वसाधारण सभेच्या अजेंडयावर पुनर्नियोजनाचा समावेश होता. मात्र, याबाबतची नोट सभागृहातील सदस्यांना देण्यात आली नाही. त्यामुळे नेमके नियोजन कशाचे, हे सदस्यांना कसे कळणार, असा सवाल विरोधी सदस्यांनी प्रशासनाकडे केला. मात्र,यावर प्रशासनाने मौन बाळगल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे नियमबाह्य पद्धतीने केलेल्या पुनर्नियोजनाविरोधात विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्यासाठी विरोधी सदस्यांनी १९ डिसेंबरच्या सभेतील कामकाज व पुनर्नियोजन मंजूर केल्याच्या ठरावाची प्रत लेखी स्वरूपात मागितली आहे. मात्र, अद्याप विरोधीपक्षाला ती प्रत मिळाली नसल्याची माहिती आहे. परिणामी सत्ताधारी व विरोधकांमधील कलह वाढण्याची शक्यता आहे . जि.प.च्या अर्थसंकल्पात जिल्हा निधीत मिळणाऱ्या स्वउत्पन्नातून विकासकामे तसेच विभागनिहाय महत्त्वाच्या कामाकरिता आर्थिक तरतूद होते. मात्र यातील काही निधी मार्च अखेरपर्यंत अखर्चित राहणाऱ्या निधीचे पुनर्नियोजन करण्यात आले आहे. विशेष सर्वसाधारण सभेत याबाबतचा ठराव पारीत करण्यात आला आहे. मात्र, विरोधकांनी चालविलेल्या हालचाली लक्षात घेता यात अडचणी येण्याची शक्यता आहे. जि.प.ची विशेष सर्वसाधारण सभा नियमबाह्य असून सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या ठरावाची प्रत प्रशासनाला मागितली आहे. मात्र ती अद्याप मिळाली नाही. चुकीच्या निर्णयाविरोधात विभागीय आयुक्तांकडे दाद मागू -अभिजित ढेपे, जि. प. सदस्य पुनर्नियोजनाचा ठरावात नियमबाह्य काहीच नाही. अखर्चित निधीचा विनियोग हा विकासकामांवर केला जाईल. विरोधकांचा खटाटोप केवळ राजकीय हेतुने प्रेरीत आहे. त्यामुळे त्यांच्या आक्षेपाला महत्त्व नाही - बबलू देशमुख, गटनेता काँग्रेस