शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
3
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
4
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
8
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
9
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
10
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
11
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
12
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
13
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
14
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
15
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
16
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
17
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
18
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
19
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
20
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती

पाच मुद्द्यांवर रवि राणांचे विधान भवनावर फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:16 IST

जनसामान्यांच्या मागण्यांकडे वेधले लक्ष, मुख्यमंत्री अक्षम असल्याचा दावा अमरावती : जनसामान्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या पाच मुद्द्यांवर आ. रवि राणा यांनी ...

जनसामान्यांच्या मागण्यांकडे वेधले लक्ष, मुख्यमंत्री अक्षम असल्याचा दावा

अमरावती : जनसामान्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या पाच मुद्द्यांवर आ. रवि राणा यांनी मुंबईच्या विधान भवनावर फलक झळकवून शासनाचे लक्ष वेधले. विधानसभेच्या दोन दिवसांच्या अत्यल्प कालावधीतील अधिवेशनात जनतेचे प्रश्न मांडण्याची संधीच देण्यात आली नसल्याचे पाहून आ. राणा यांनी हा अभिनव पवित्रा घेतला. मुख्यमंत्री राज्य सरकार चालवण्यासाठी सक्षम नाहीत, असा दावा त्यांनी केला आहे.

कोरोनाकाळात प्रचंड वाताहत झालेल्या राज्यातील शेतकरी, शेतमजूर, सर्वसामन्य जनतेच्या समस्या, विद्यार्थी, बेरोजगारांना दिलासा, मराठा समाज, ओबीसी समाज, धनगर समाजाला आरक्षण या महत्त्वाच्या विषयांवर न्याय मिळवून देण्यासाठी १५ दिवस अधिवेशन चालवून चर्चा करण्याची मागणी आ. रवि राणा यांनी केली होती. मात्र, जनतेचे समस्यांशी देणे-घेणे नसलेल्या सरकारने दोन दिवसांत अधिवेशन गुंडाळले आहे. ६ जुलै रोजी आ. रवि राणा यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र देऊन सभागृहात पत्रातील नमूद विषयावर चर्चा करून, त्या मागण्या सरकार कडून मंजूर करण्याची मागणी केली होती. मात्र, अध्यक्षांपुढील राजदंड उचलला तरीही त्यांना बोलू दिले नाही. यामुळे आ. रवि राणा यांनी विधान भवनावर चढून त्यांच्या पत्रातील पाच मुद्द्यांचे फलक झळकवले.