शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

रतन इंडियातील कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन मागे

By admin | Updated: April 8, 2016 00:10 IST

पगारवाढीमध्ये भेदभाव करून प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या रतन इंडिया कपंनीच्या धोरणाविरोधात अडीचशे कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून...

गुरुवारी निघाला तोडगा : १५ दिवसांचा अवधी अमरावती : पगारवाढीमध्ये भेदभाव करून प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या रतन इंडिया कपंनीच्या धोरणाविरोधात अडीचशे कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून पुकारलेला बंद गुरुवारी सायंकाळच्या सुमारास मागे घेण्यात आला. रतन इंडियाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष कर्नल लोकेशसिंग आणि हिमांशू माथूर यांच्यासोबत आंदोलनकर्त्यांची गुरुवारी बैठक पार पडली. त्यात १५ दिवसांच्या आत आंदोलनकर्त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. गुरुवारी रतन इंडियामध्ये कार्यरत असलेल्या स्थानिक कामगारांनी अमरावती येथे पत्रकार परिषद घेतल्यानंतर रतन इंडियाचे व्यवस्थापन हादरले व त्यानंतर घेण्यात आलेल्या बैठकीत मध्यम मार्ग निवडण्यात आला. परप्रांतीयांविरुद्ध प्रकल्पग्रस्त असा सामना सध्या रतन इंडियात रंगला आहे. काम सारखेच मात्र दाम वेगवेगळे असून परप्रांतीयांना पगारवाढ तर प्रकल्पग्रस्तांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. द्वेषभावनेतून वारंवार प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत असून या अन्यायाविरोधात १३० प्रकल्पग्रस्त व इतर स्थानिक कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे.मार्च महिन्यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांची वेतनवाढ करण्यात आली. मात्र प्रकल्पग्रस्त व इतर स्थानिक कर्मचाऱ्यांची वेतनवाढ न केल्याने कर्मचाऱ्यांनी कर्नल लोकेशसिंग यांची भेट घेतली होती. मात्र त्यांनी सकारात्मक उत्तर न दिल्याने नाईलाजाने कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला. कर्मचाऱ्यांनी बंदची घोषणा करताच रतन इंडियाच्या अधिकाऱ्यांनी कामगार अधिकारी जाधव यांनादेखील पाचारण करण्यात आले व मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कामगार अधिकारी यांनी येथे का बोलावले म्हणून कर्मचाऱ्यांशी वाद घातला. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या आदेशाची अवहेलना करण्याचा प्रकार रतन इंडियाने केला, असा आरोपही यावेळी कर्मचाऱ्यांनी केला. नियमाप्रमाणे पगारवाढ व्हावी, प्रकल्पग्रस्तांना मिळणारी सापत्न वागणूक टाळावी, अशी मागणी संबंधित कर्मचाऱ्यांची असून १५ दिवसांच्या आत यावर तोडगा न निघाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रफुल्ल तायडे, सचिन चेंडकापुरे, विनोद पांडे, देवानंद इंगोले, राजेश बारबुद्धे, अमोल इंगळे, राहुल नाकाडे, गोफणे यांच्यासह अडीचशे कर्मचाऱ्यांनी रतन इंडियाला दिला आहे. (प्रतिनिधी)