शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
5
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
6
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
7
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
8
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
10
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
11
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
12
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
13
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
18
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
19
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
20
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?

रतन इंडियातील कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन मागे

By admin | Updated: April 8, 2016 00:10 IST

पगारवाढीमध्ये भेदभाव करून प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या रतन इंडिया कपंनीच्या धोरणाविरोधात अडीचशे कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून...

गुरुवारी निघाला तोडगा : १५ दिवसांचा अवधी अमरावती : पगारवाढीमध्ये भेदभाव करून प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या रतन इंडिया कपंनीच्या धोरणाविरोधात अडीचशे कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून पुकारलेला बंद गुरुवारी सायंकाळच्या सुमारास मागे घेण्यात आला. रतन इंडियाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष कर्नल लोकेशसिंग आणि हिमांशू माथूर यांच्यासोबत आंदोलनकर्त्यांची गुरुवारी बैठक पार पडली. त्यात १५ दिवसांच्या आत आंदोलनकर्त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. गुरुवारी रतन इंडियामध्ये कार्यरत असलेल्या स्थानिक कामगारांनी अमरावती येथे पत्रकार परिषद घेतल्यानंतर रतन इंडियाचे व्यवस्थापन हादरले व त्यानंतर घेण्यात आलेल्या बैठकीत मध्यम मार्ग निवडण्यात आला. परप्रांतीयांविरुद्ध प्रकल्पग्रस्त असा सामना सध्या रतन इंडियात रंगला आहे. काम सारखेच मात्र दाम वेगवेगळे असून परप्रांतीयांना पगारवाढ तर प्रकल्पग्रस्तांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. द्वेषभावनेतून वारंवार प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत असून या अन्यायाविरोधात १३० प्रकल्पग्रस्त व इतर स्थानिक कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे.मार्च महिन्यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांची वेतनवाढ करण्यात आली. मात्र प्रकल्पग्रस्त व इतर स्थानिक कर्मचाऱ्यांची वेतनवाढ न केल्याने कर्मचाऱ्यांनी कर्नल लोकेशसिंग यांची भेट घेतली होती. मात्र त्यांनी सकारात्मक उत्तर न दिल्याने नाईलाजाने कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला. कर्मचाऱ्यांनी बंदची घोषणा करताच रतन इंडियाच्या अधिकाऱ्यांनी कामगार अधिकारी जाधव यांनादेखील पाचारण करण्यात आले व मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कामगार अधिकारी यांनी येथे का बोलावले म्हणून कर्मचाऱ्यांशी वाद घातला. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या आदेशाची अवहेलना करण्याचा प्रकार रतन इंडियाने केला, असा आरोपही यावेळी कर्मचाऱ्यांनी केला. नियमाप्रमाणे पगारवाढ व्हावी, प्रकल्पग्रस्तांना मिळणारी सापत्न वागणूक टाळावी, अशी मागणी संबंधित कर्मचाऱ्यांची असून १५ दिवसांच्या आत यावर तोडगा न निघाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रफुल्ल तायडे, सचिन चेंडकापुरे, विनोद पांडे, देवानंद इंगोले, राजेश बारबुद्धे, अमोल इंगळे, राहुल नाकाडे, गोफणे यांच्यासह अडीचशे कर्मचाऱ्यांनी रतन इंडियाला दिला आहे. (प्रतिनिधी)