शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

रेशनचे धान्य विक्रीला, तीन रुपये किलोने खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:16 IST

गल्लोगल्ली फिरून ग्रामीण भागातून खरेदी करतात तांदूळ वरूड/अमरावती : शासनाकडून गरिबांना मिळणारे स्वस्त धान्य दुकानदाराकडून खुल्या बाजारात विकले जात ...

गल्लोगल्ली फिरून ग्रामीण भागातून खरेदी करतात तांदूळ

वरूड/अमरावती : शासनाकडून गरिबांना मिळणारे स्वस्त धान्य दुकानदाराकडून खुल्या बाजारात विकले जात असल्याची ओरड असताना आता लाभार्थीच तीन रुपये किलोचा तांदूळ १० ते १५ रुपये प्रतिकिलोने खुल्या बाजारात विकत आहेत. व्यापाऱ्यांचे दलाल गल्लोगल्ली फिरून रेशनचा तांदूळ खरेदी करीत आहेत. जिल्हाभरातून दररोज शेकडो क्विंटल तांदूळ अशाप्रकारे जमा केला जातो. महसूल प्रशासन या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे.

गोरगरिबांनी नेलेला महिनावारी तांदूळ, गहू खुल्या बाजारात खरेदी करणारे रॅकेट सक्रिय असून ग्रामीणसह शहरी भागातूनसुद्धा केवळ १० ते १५ रुपये दराने तांदूळ खरेदी करणारे दलाल गल्लोगल्ली भटकंती करून १५ रुपये भावाने तांदूळ खरेदी करतात. भंगारवाल्यासारखे गावागावात जाऊन शेकडो क्विंटल तांदूळ व्यापाऱ्यांच्या घशात घातला जात असल्याची ओरड वरूड तालुक्यात आहे. एका दिवसाला १० ते १५ क्विंटल तांदूळ खरेदी करून व्यापाऱ्याला विकला जातो. व्यापारी या फिरस्त्या दलालांकडून घेतलेला तांदूळ ट्रकमधून भंडारा गोंदियाकडे रवाना करतो. फिल्टर करून तोच तांदूळ एक तर शासनाला किंवा खुल्या बाजारात ३० ते ३५ रुपये किलो दराने विकून शासनाच्या योजनेला हरताळ फासण्याचा प्रकार सुरू आहे.

बॉक्स

तीन रुपये किलो तांदूळ

कोरोनाकाळात केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरू केली. यामध्ये प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य मोफत देण्यात येते. यात तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ असे सूत्र आहे, तर अन्न सुरक्षा कायदा २०१३ अंतर्गतसुद्धा धान्यवाटप केले जाते.

बॉक्स

हे घ्या पुरावे

भातकुली

सरकारकडून तांदूळ भरपूर मिळत आहे. ते आपले अन्नच नाही. त्यामुळे त्याच्या ऐवजी गहू मिळविण्यासाठी तांदूळ विकत असल्याचे एका व्यक्तीने सांगितले.

बॉक्स

वरूड

तांदळाचा साठा करून तो जिल्ह्याबाहेर विकण्याचा प्रकार वारंवार उघडकीस येतो. अलीकडेच मोठा तांदूळ साठा पकडला गेला आहे.

कोट

केंद्र व राज्य शासनाकङून गरजू लाभार्थींना रेशन दुकानदारांमार्फत धान्य पुरवठा केला जातो. अशा प्रकारच्या धान्यविक्रीबाबत पुरवठा विभागाकडे कुणाचीही तक्रार नाही. तक्रार आल्यास चौकशी व कारवाई करू.

- अनिल टाकसाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी