शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

राजापेठ पोलीस ठाणे चोरट्यांचे केंद्रबिंदू

By admin | Updated: June 10, 2014 23:45 IST

शहरात काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून या घटनांवर अंकुश ठेवण्यात आणि आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये

आणखी तीन घरफोड्या : महावीरनगरात चोरट्यांचा हैदोसअमरावती : शहरात काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून या घटनांवर अंकुश ठेवण्यात आणि आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. एका महिन्यात सर्वाधिक घरफोडीच्या घटना राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. चोरीच्या आणखी तीन घटना सोमवार व मंगळवारच्या रात्री राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महावीरनगरात घडल्या. चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरे फोडून ५३ हजार रूपयाचा ऐवज चोरून नेला. मनोज मधुकर खोडे (४२), संगीता गजानन गचके (३२) व राजेश मनोहर रोंघे सर्व रा. महावीर नगर यांच्या घरी चोरीची घटना घडली. मनोज खोडे यांच्या घरी संगिता गचके या भाडेकरु आहेत. खोडे व गचके कुटुंबातील सदस्य झोपले असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील मागील दरवाजातून प्रवेश केला. चोरट्यांनी खोडे यांच्या घरातील लोखंडी पेटीतून साडेतीन ग्रॅम सोन्याचे कानातले व रोख ४ हजार रूपये आणि गचके यांच्या घरातील लोखंडी कपाटातून ८ ग्रॅम सोन्याची चेन, साडेपाच ग्रॅम सोन्याचे कानातले व २५ हजार रूपये रोख असा एकूण ४९ हजार २५० रूपयाचा ऐवज चोरून नेला. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा खोडे यांच्या शेजारी राहणारे राजेश रोंघे यांच्या घरी वळविला. रोंघे हे त्यांच्या कुटुंबासह बाहेरगावी गेले आहे. चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दाराचा कोंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी तेथील लोखंडी कपाटातून दोन ग्रॅम सोन्याचे रिंग व दीड हजार रूपये रोख असा एकूण ४ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या तिन्ही घटना मंगळवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आल्या. ही माहिती राजापेठ पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक एस. एस. भगत यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तेथे श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला.