शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा संपला, आता बरसेल तो ‘अवकाळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:11 IST

प्रचलित पद्धतीनुसार जिल्ह्यात एक जून ते ३० सप्टेंबर याकालावधीत पावसाळा गृहित धरण्यात येतो.

ठळक मुद्देयंदा ३३ टक्क्यांची तूट : गतवर्षीपेक्षा ४१५ मिमी पाऊस कमी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रचलित पद्धतीनुसार जिल्ह्यात एक जून ते ३० सप्टेंबर याकालावधीत पावसाळा गृहित धरण्यात येतो. या कालावधीत जिल्ह्यात पावसाची ८१४ मिमी सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र ५४८ मिमी पाऊस पडला. ही टक्केवारी ६७.३ टक्के तर वार्षिक सरासरीच्या ६७.३ टक्के आहे. आता पावसाळा संपल्यामुळे यापुढे बरसणारा पाऊस हा अवकाळीच राहणार आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात पावसाची ४१४.६ मिमीची तूट आहे. मृग नक्षत्रापासूनच पावसाने दडी दिली आहे. गतवर्षी ४९ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली होती. त्यातुलनेत यंदा फक्त पाच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर गेलेच नाहीत. परिणामी जमिनीतील पाण्याची पातळी वाढलीच नाही तसेच जमिनीत पुरेशा आर्द्रतेचादेखील अभाव आहे. कमी पावसामुळे यंदा मूग व उडीद पीक बाद झाले, तर सोयाबीनच्या उत्पादकतेवर मोठा परिणाम होणार आहे. शेतकºयांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले. प्रतिकूल वातावरणामुळे खरिपाच्या पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळेसुद्धा सरासरी उत्पादनात घट येणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात अमरावती तालुक्यात ४७० मिमी, भातकुली ४३२.८, नांदगाव खंडेश्वर ४६१.४, चांदूररेल्वे ४९४, धामणगाव रेल्वे ४६०.१, तिवसा ५५६.८, मोर्शी ५९७.९, वरूड, ७३३, अचलपूर ४२०.७, चांदूरबाजार ५१७, दर्यापूर ३९९.३, अंजनगाव सुर्जी ३८३.२, धारणी ६८०.३ तर चिखलदरा तालुक्यात ९६६.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.वरूडमध्ये सर्वाधिक, तर धारणीत सर्वात कमी पाऊसयंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात ६७.३ टक्के पावसाची नोंद झाली. म्हणजेच यंदा पावसाची ३३ टक्के तूट आहे. आता पावसाळा संपल्याने येणारा पाऊस हा अवकाळी राहणार आहे. यंदा सर्वाधीक ८५ टक्के पाऊस वरूड तालुक्यात पडला तर सर्वात कमी ५८ टक्के धारणी तालुक्यात पडला. अमरावती ६१.४, भातकुली ५८.६, नांदगाव ६२.५, चांदूररेल्वे ७९.७, धामणगाव रेल्वे ६३.२, तिवसा ७६.५, मोर्शी ७८.८, अचलपूर ६०.३, चांदूरबाजार ७५.१, दर्यापूर ६२.६, अंजनगाव सुर्जी ६२.२ तर चिखलदरा तालुक्यात ६३.३ टक्के पाऊस पडला.