शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:53 IST

मागील २४ तासांत पावसाची रिपरीप सुरू आहे. जिल्ह्यात सार्वत्रिक २७.५ मिमी पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक ५३ मिमी पाऊस वरूड तालुक्यात पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मागील २४ तासांत पावसाची रिपरीप सुरू आहे. जिल्ह्यात सार्वत्रिक २७.५ मिमी पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक ५३ मिमी पाऊस वरूड तालुक्यात पडला. या रिमझीम पावसाने शेतीपिकांना दिलासा मिळाला आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने जिल्ह्यासह विभागात पुढील दोन दिवस काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.जिल्ह्यात १ जून ते ३० आॅगस्ट या कालावधीत ८१४ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४३७.४ मिमी पाऊस पडला आहे. ही ६८.९ टक्केवारी आहे. मागील वर्षी याच तारखेत ७५४.७ मिमी पावसाची नोंद झाली होती. आतापर्यंत अमरावती तालुक्यात ३७६.२ मिमी, भातकुली ३५९.६, नांदगाव ४०४.४, चांदूररेल्वे ४७६.५, धामणगाव ३९१.८, तिवसा ४५९.८, मोर्शी ४६३.६, वरूड ५४४, अचलपूर ३१५.१, चांदूरबाजार ३८८.६, दर्यापूर ३३५.५, अंजनगाव सुर्जी २५४.१, धारणी ५५८७.९ व चिखलदरा तालुक्यात ७६६ मिमी पाऊस पडला आहे. पावसाच्या सरासरीत सर्वाधिक ८०.७ टक्के पाऊस चांदूररेल्वे तालुक्यात, तर कमी ५२.९ टक्के पाऊस अंजनगाव सुर्जी तालुक्यात पडला आहे.जिल्ह्यात अद्याप एकाही तालुक्याने पावसाची सरासरी गाठलेली नाही. धरणक्षेत्रातदेखील पाऊस नसल्याने प्रकल्पांच्या पातळीत वाढ झालेली नाही.मागील तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. विशेषत: अचलपूर उपविभागातील तीन तालुक्यांतील पिकांना संजीवनी मिळाली आहे. अचलपूर, दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यांना पावसामुळे सर्वाधिक फायदा होणार आहे. चांदूर बाजार व मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादकांना याचा फायदा होईल. वरूड तालुक्यातील संत्राबागांना मृग बहरासाठी हा पाऊस फायद्याचा ठरणार आहे. यंदा सोयाबीनचा पेरा सर्वाधिक आहे. सोयाबीन फुलावर असल्यामुळे हा पाऊस या पिकासाठी अतिशय महत्त्वाचा ठरला आहे. येत्या काही दिवसांत आणखी पाऊस आल्यास सोयाबीनचे भरगोस उत्पादन होईल. कपाशीसाठीदेखील आलेला पाऊस महत्त्वाचा ठरला आहे.