शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:53 IST

मागील २४ तासांत पावसाची रिपरीप सुरू आहे. जिल्ह्यात सार्वत्रिक २७.५ मिमी पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक ५३ मिमी पाऊस वरूड तालुक्यात पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मागील २४ तासांत पावसाची रिपरीप सुरू आहे. जिल्ह्यात सार्वत्रिक २७.५ मिमी पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक ५३ मिमी पाऊस वरूड तालुक्यात पडला. या रिमझीम पावसाने शेतीपिकांना दिलासा मिळाला आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने जिल्ह्यासह विभागात पुढील दोन दिवस काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.जिल्ह्यात १ जून ते ३० आॅगस्ट या कालावधीत ८१४ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४३७.४ मिमी पाऊस पडला आहे. ही ६८.९ टक्केवारी आहे. मागील वर्षी याच तारखेत ७५४.७ मिमी पावसाची नोंद झाली होती. आतापर्यंत अमरावती तालुक्यात ३७६.२ मिमी, भातकुली ३५९.६, नांदगाव ४०४.४, चांदूररेल्वे ४७६.५, धामणगाव ३९१.८, तिवसा ४५९.८, मोर्शी ४६३.६, वरूड ५४४, अचलपूर ३१५.१, चांदूरबाजार ३८८.६, दर्यापूर ३३५.५, अंजनगाव सुर्जी २५४.१, धारणी ५५८७.९ व चिखलदरा तालुक्यात ७६६ मिमी पाऊस पडला आहे. पावसाच्या सरासरीत सर्वाधिक ८०.७ टक्के पाऊस चांदूररेल्वे तालुक्यात, तर कमी ५२.९ टक्के पाऊस अंजनगाव सुर्जी तालुक्यात पडला आहे.जिल्ह्यात अद्याप एकाही तालुक्याने पावसाची सरासरी गाठलेली नाही. धरणक्षेत्रातदेखील पाऊस नसल्याने प्रकल्पांच्या पातळीत वाढ झालेली नाही.मागील तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. विशेषत: अचलपूर उपविभागातील तीन तालुक्यांतील पिकांना संजीवनी मिळाली आहे. अचलपूर, दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यांना पावसामुळे सर्वाधिक फायदा होणार आहे. चांदूर बाजार व मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादकांना याचा फायदा होईल. वरूड तालुक्यातील संत्राबागांना मृग बहरासाठी हा पाऊस फायद्याचा ठरणार आहे. यंदा सोयाबीनचा पेरा सर्वाधिक आहे. सोयाबीन फुलावर असल्यामुळे हा पाऊस या पिकासाठी अतिशय महत्त्वाचा ठरला आहे. येत्या काही दिवसांत आणखी पाऊस आल्यास सोयाबीनचे भरगोस उत्पादन होईल. कपाशीसाठीदेखील आलेला पाऊस महत्त्वाचा ठरला आहे.