शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची दडी, ६० टक्के पिके बुडण्याची भीती

By admin | Updated: July 16, 2015 00:29 IST

तालुक्यात जून अखेरपर्यंत ७१.७५ टक्के पेरणी पूर्ण झाली. मात्र मृगासह इतरही नक्षत्र कोरडेच गेल्याने अंकुरलेली पिके कोमेजली आहेत.

संत्रा उत्पादकही हादरले : दुबार पेरणीसाठी शेतकरी सावकाराच्या दारात वरुड : तालुक्यात जून अखेरपर्यंत ७१.७५ टक्के पेरणी पूर्ण झाली. मात्र मृगासह इतरही नक्षत्र कोरडेच गेल्याने अंकुरलेली पिके कोमेजली आहेत. तालुक्यात ३४ हजार ४०० हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली. परंतु पावसाने २८ दिवसांपासून पाठ फिरविल्याने ६० टक्के पिके बुडण्याची भीती निर्माण झाली आहे. दुबार पेरणीसाठी पुन्हा शेतकऱ्यांना सावकारांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत तर विदर्भाच्या कॅलिफोर्नियातील संत्रा उत्पादकांनाही दुष्काळाचा जबर फटका बसण्याची शक्यता आहे. वरुड तालुक्यात संत्रा कलमांचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतले जाते. परंतु खरेदीदार शेतकऱ्यांची संख्या पावसामुळे रोडावली आहे. तालुक्यात तब्बल २८ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पेरलेले सोयाबिन, तूर, कपाशीचे पीक पूर्णत: बुडाले. कृत्रिम पध्दतीने ओलीत करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातच कपाशीचे पीक बहरलेले दिसून येत आहे. तालुक्यात ३४ हजार ४०० हेक्टर जमिनीत पेरणी झाली. परिससरात ७१ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. बियाण्यांचे अंकुर जमिनीबाहेर येऊन तापत्या उन्हामुळे कोमेजू लागले आहेत.कपाशीची २६ हजार हेक्टरमध्ये तूर ६ हजार हेक्टर, मिरची २०० हेक्टर, सोयाबिन ८५० हेक्टर, मका २५० हेक्टर, ज्वारी ८२० हेक्टर आणि एरंडी ६७ हेक्टर तर हळदीची २० हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली. कोरडया दुष्काळाचे सावट असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मजुरांच्या हाताला काम नाही. दुबार पेरणीकरीता पुन्हा शेतकऱ्यांची वणवण भटकंती सुरू झाली आहे. पुन्हा बियाण्यांची जुळवाजुळव करण्यात बळीराजा व्यस्त आहे. पावसासाठी कुठे धोंडी तर कुठे धार्मिक कार्यक्रम, देवालयात घंटानाद केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)बँकांचा नकार, पुन्हा सावकाराचाच आधारजुलै महिन्याचा पूर्वार्ध संपला असताना सुध्दा अनेकांवर कृषी कर्जापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे. बँका कर्जाचे पुनर्गठन करण्यात नकार देत आहेत. तर कुठे पुनर्गठन केले जात असेल तर त्या बँकेत गतवर्षीच्या कर्जाच्या व्याजाची कपात केली जात आहे. अशा आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून सावकाराच्या दारात जात आहे. मिळेल ते गहाण ठेऊन कर्ज घेऊन दुबार पेरणीची तयारी शेतकऱ्यांनी चालविली आहे. कोरडया दुष्काळाच्या सावटामुळे पेरणी झालेली बियाणी जमिनीत कोमेजली आहेत. तर थोड्याफार उगवलेल्या बियाण्यांना उन्हाचा फटका बसू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. मात्र, शासनाचे याकडे प्रचंड दुर्लक्ष असल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण असून शासनाने तातडीने शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली जात आहे.