शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

पावसाची दडी, ६० टक्के पिके बुडण्याची भीती

By admin | Updated: July 16, 2015 00:29 IST

तालुक्यात जून अखेरपर्यंत ७१.७५ टक्के पेरणी पूर्ण झाली. मात्र मृगासह इतरही नक्षत्र कोरडेच गेल्याने अंकुरलेली पिके कोमेजली आहेत.

संत्रा उत्पादकही हादरले : दुबार पेरणीसाठी शेतकरी सावकाराच्या दारात वरुड : तालुक्यात जून अखेरपर्यंत ७१.७५ टक्के पेरणी पूर्ण झाली. मात्र मृगासह इतरही नक्षत्र कोरडेच गेल्याने अंकुरलेली पिके कोमेजली आहेत. तालुक्यात ३४ हजार ४०० हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली. परंतु पावसाने २८ दिवसांपासून पाठ फिरविल्याने ६० टक्के पिके बुडण्याची भीती निर्माण झाली आहे. दुबार पेरणीसाठी पुन्हा शेतकऱ्यांना सावकारांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत तर विदर्भाच्या कॅलिफोर्नियातील संत्रा उत्पादकांनाही दुष्काळाचा जबर फटका बसण्याची शक्यता आहे. वरुड तालुक्यात संत्रा कलमांचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतले जाते. परंतु खरेदीदार शेतकऱ्यांची संख्या पावसामुळे रोडावली आहे. तालुक्यात तब्बल २८ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पेरलेले सोयाबिन, तूर, कपाशीचे पीक पूर्णत: बुडाले. कृत्रिम पध्दतीने ओलीत करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातच कपाशीचे पीक बहरलेले दिसून येत आहे. तालुक्यात ३४ हजार ४०० हेक्टर जमिनीत पेरणी झाली. परिससरात ७१ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. बियाण्यांचे अंकुर जमिनीबाहेर येऊन तापत्या उन्हामुळे कोमेजू लागले आहेत.कपाशीची २६ हजार हेक्टरमध्ये तूर ६ हजार हेक्टर, मिरची २०० हेक्टर, सोयाबिन ८५० हेक्टर, मका २५० हेक्टर, ज्वारी ८२० हेक्टर आणि एरंडी ६७ हेक्टर तर हळदीची २० हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली. कोरडया दुष्काळाचे सावट असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मजुरांच्या हाताला काम नाही. दुबार पेरणीकरीता पुन्हा शेतकऱ्यांची वणवण भटकंती सुरू झाली आहे. पुन्हा बियाण्यांची जुळवाजुळव करण्यात बळीराजा व्यस्त आहे. पावसासाठी कुठे धोंडी तर कुठे धार्मिक कार्यक्रम, देवालयात घंटानाद केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)बँकांचा नकार, पुन्हा सावकाराचाच आधारजुलै महिन्याचा पूर्वार्ध संपला असताना सुध्दा अनेकांवर कृषी कर्जापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे. बँका कर्जाचे पुनर्गठन करण्यात नकार देत आहेत. तर कुठे पुनर्गठन केले जात असेल तर त्या बँकेत गतवर्षीच्या कर्जाच्या व्याजाची कपात केली जात आहे. अशा आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून सावकाराच्या दारात जात आहे. मिळेल ते गहाण ठेऊन कर्ज घेऊन दुबार पेरणीची तयारी शेतकऱ्यांनी चालविली आहे. कोरडया दुष्काळाच्या सावटामुळे पेरणी झालेली बियाणी जमिनीत कोमेजली आहेत. तर थोड्याफार उगवलेल्या बियाण्यांना उन्हाचा फटका बसू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. मात्र, शासनाचे याकडे प्रचंड दुर्लक्ष असल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण असून शासनाने तातडीने शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली जात आहे.