शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची दडी, ६० टक्के पिके बुडण्याची भीती

By admin | Updated: July 16, 2015 00:29 IST

तालुक्यात जून अखेरपर्यंत ७१.७५ टक्के पेरणी पूर्ण झाली. मात्र मृगासह इतरही नक्षत्र कोरडेच गेल्याने अंकुरलेली पिके कोमेजली आहेत.

संत्रा उत्पादकही हादरले : दुबार पेरणीसाठी शेतकरी सावकाराच्या दारात वरुड : तालुक्यात जून अखेरपर्यंत ७१.७५ टक्के पेरणी पूर्ण झाली. मात्र मृगासह इतरही नक्षत्र कोरडेच गेल्याने अंकुरलेली पिके कोमेजली आहेत. तालुक्यात ३४ हजार ४०० हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली. परंतु पावसाने २८ दिवसांपासून पाठ फिरविल्याने ६० टक्के पिके बुडण्याची भीती निर्माण झाली आहे. दुबार पेरणीसाठी पुन्हा शेतकऱ्यांना सावकारांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत तर विदर्भाच्या कॅलिफोर्नियातील संत्रा उत्पादकांनाही दुष्काळाचा जबर फटका बसण्याची शक्यता आहे. वरुड तालुक्यात संत्रा कलमांचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतले जाते. परंतु खरेदीदार शेतकऱ्यांची संख्या पावसामुळे रोडावली आहे. तालुक्यात तब्बल २८ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पेरलेले सोयाबिन, तूर, कपाशीचे पीक पूर्णत: बुडाले. कृत्रिम पध्दतीने ओलीत करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातच कपाशीचे पीक बहरलेले दिसून येत आहे. तालुक्यात ३४ हजार ४०० हेक्टर जमिनीत पेरणी झाली. परिससरात ७१ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. बियाण्यांचे अंकुर जमिनीबाहेर येऊन तापत्या उन्हामुळे कोमेजू लागले आहेत.कपाशीची २६ हजार हेक्टरमध्ये तूर ६ हजार हेक्टर, मिरची २०० हेक्टर, सोयाबिन ८५० हेक्टर, मका २५० हेक्टर, ज्वारी ८२० हेक्टर आणि एरंडी ६७ हेक्टर तर हळदीची २० हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली. कोरडया दुष्काळाचे सावट असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मजुरांच्या हाताला काम नाही. दुबार पेरणीकरीता पुन्हा शेतकऱ्यांची वणवण भटकंती सुरू झाली आहे. पुन्हा बियाण्यांची जुळवाजुळव करण्यात बळीराजा व्यस्त आहे. पावसासाठी कुठे धोंडी तर कुठे धार्मिक कार्यक्रम, देवालयात घंटानाद केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)बँकांचा नकार, पुन्हा सावकाराचाच आधारजुलै महिन्याचा पूर्वार्ध संपला असताना सुध्दा अनेकांवर कृषी कर्जापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे. बँका कर्जाचे पुनर्गठन करण्यात नकार देत आहेत. तर कुठे पुनर्गठन केले जात असेल तर त्या बँकेत गतवर्षीच्या कर्जाच्या व्याजाची कपात केली जात आहे. अशा आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून सावकाराच्या दारात जात आहे. मिळेल ते गहाण ठेऊन कर्ज घेऊन दुबार पेरणीची तयारी शेतकऱ्यांनी चालविली आहे. कोरडया दुष्काळाच्या सावटामुळे पेरणी झालेली बियाणी जमिनीत कोमेजली आहेत. तर थोड्याफार उगवलेल्या बियाण्यांना उन्हाचा फटका बसू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. मात्र, शासनाचे याकडे प्रचंड दुर्लक्ष असल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण असून शासनाने तातडीने शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली जात आहे.