शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
4
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
5
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
6
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
7
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
8
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
9
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
10
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
11
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
12
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
13
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
14
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
15
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
16
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
17
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
18
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
19
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
20
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?

पावसाची दडी; मृग बहर अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:00 IST

संत्र्याचा मृग बहर हा १०० टक्के पावसाच्या भरवशावर अवलंबून असतो. त्यात यंदा मे महिन्यात वाढलेल्या तापमानामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा मेअखेरपर्यंत बागांचे सिंचन केले. परंतु, यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने अनपेक्षित सुरुवात केली. त्यामुळे मृग बहराचे गणित बिघडले.

ठळक मुद्देविम्याकडेही पाठ : कृषी अधिकाऱ्यांचा लक्षवेध, कोट्यवधींचे नुकसान होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा बाजार : लांबलेल्या पावसामुळे यंदा संत्र्याचा मृग बहर अडचणीत आला आहे. आंबट-गोड चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या येथील संत्र्याचा मृग बहर निसर्गाच्या लहरीपणामुळे हातून निसटण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल आहेत.वरूड-मोर्शीच्या संत्र्याची चव आखाती देशांनी चाखली आहे. एकेकाळी वरूड तालुक्याला ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणूनही ओळखले जात होते. वरूड तालुक्यात एकूण १९ हजार हेक्टर क्षेत्रफळ संत्र्याच्या लागवडीखाली आहे. येथील बहुतांश शेतकरी मृग बहर घेण्यास इच्छुक असतात. संत्र्याचा मृग बहर हा १०० टक्के पावसाच्या भरवशावर अवलंबून असतो. त्यात यंदा मे महिन्यात वाढलेल्या तापमानामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा मेअखेरपर्यंत बागांचे सिंचन केले. परंतु, यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने अनपेक्षित सुरुवात केली. त्यामुळे मृग बहराचे गणित बिघडले.मृग बहरासाठी एक महिन्याचा ताण आवश्यक असतो. झाडांना पाहिजे तेवढा ताण बसला नाही. पहिल्या पावसानंतर दीर्घ खंड पडल्यामुळे संत्रा झाडांनी मोठ्या प्रमाणावर नवती घेतली आहे. तालुक्यात अजूनही दमदार पाऊस बरसलेला नाही. आता फूट होण्याची शक्यता कमी असल्याने शेतकरी आंतरपीक म्हणून तूर किंवा सोयाबीनकडे वळले आहेत. ‘लोकमत’ ने ३ जूनच्या अंकात भाकीत व्यक्त केले होते, ते तंतोतंत खरे ठरले.संत्र्याचा ऑनलाइन विम्याकडे शेतकºयांनी पाठ फिरवली आहे. ती मुदत २५ जून होती.संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी जेथे झाडांची नवती निघाली नसेल किंवा झाड सुप्तावस्थेत असेल, तेथे संजीवक व १२:६१:०० फवारणीचे खत मिसळून तातडीने फवारणी करावी. दमदार पाऊस झाल्यास परिस्थिती बदलू शकते.- श्यामसुंदर ताथोडे, प्राचार्य, स्व.पंजाबराव ठाकरे कृषी विद्यालय, हातुर्णावरूड तालुक्यातील १९ हजार हेक्टर क्षेत्रावर संत्रा लागवड आहे. पैकी ९ ते १० हजार हेक्टर क्षेत्रावर मृग बहर घेतला जातो. मात्र पावसाच्या दीर्घ दडीने तो हातातून जाण्याची शक्यता आहे. कोट्यवधीचे नुकसान संभवते.- उज्ज्वल आगरकरतालुका कृषी अधिकारी, वरूड.बºयाच शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही. शासनाने संत्रा पीक विम्याची मुदत वाढवून द्यावी. संत्र्याला पीक विम्याचे कवच मिळाल्यास शासनाचा भार काही प्रमाणात हलका होईल.- सुधाकर दोडसंचालक, बाजार समिती वरुड

टॅग्स :Natureनिसर्ग