शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
3
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
4
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
5
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
6
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
7
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
8
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
9
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
10
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
11
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
12
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
13
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
14
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
15
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
16
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
17
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
18
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
19
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
20
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात पुन्हा पावसाचे थैमान; ४० गावे ‘नॉट रिचेबल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 01:42 IST

तालुक्यातील चारही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने सिपना व तापी व गडगा नदीवरील पूल पाण्याखाली गेले आहेत. परिमाणी ४० गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची चमू मेळघाटात पोहोचली आहे.

ठळक मुद्देबैरागडचा पूल पाण्याखाली : रुग्णवाहिका अडकली, शाळांना सुटी, अतिसतर्कतेचा इशारा

पंकज लायदे/श्यामकांत पांडेय।लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : तालुक्यातील चारही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने सिपना व तापी व गडगा नदीवरील पूल पाण्याखाली गेले आहेत. परिमाणी ४० गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची चमू मेळघाटात पोहोचली आहे. ४८ तासांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस होत असल्याने सर्व माध्यमाच्या शाळांना सुटी देण्यात आली. दरम्यान, दिया, उतावली गावाजवळील पुलावरून सिपना नदीचे पाणी वाहत असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांना अतिसतर्कतेची सूचना देण्यात आली आहे. दिया-बैरागड व कुसुमकोट- राणीगाव या मार्गावरील नागरिकांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.मंंगळवार मध्यरात्रीपासून पावसाने चांगला जोर धरल्यामुळे मेळघाटातील सिपना, गडगा, तापी या मुख्य नद्यांसह परिसरातील नदी-नाले ओसांडून वाहत आहे. गुरुवारी सकाळी अतिपावसामुळे दिया गावाजवळील सिपना नदीवरील पूल व धारणीपासून पाच किलोमीटर अंतरावरील रोहणीखेडा गावाजवळील गडगा नदीवरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने दोन्ही मार्गावरील ४० पेक्षा अधिक गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. या मेळघाटातील तलाव ओवरफ्लो झाले आहेत. अतिपावसामुळे तलावातील पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे परिसरातील गावांना महसूल प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्याचे लेखी पत्र व मुनादी देण्याची सूचना ग्रामपंचायत प्रशासनाला दिली आहे. धारणी तालुक्यातील धारणी महसूल मंडळात १०८.२ मिमी, सावलीखेड्यात १३६ मिमी, धूळघाट १२६ मिमी, हरिसाल मंडळात १३० मिमी पाऊस पडला. तालुक्यातील खारी, रबांग, नांदुरी, लवादा , गावलांडोह, मांडवा, जुटपानी हे तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. तालुक्यात आतापर्यंत ७६६.३ मिमी पावसाची नोंद झाली. चौराकुंड ते खोकमार मार्गावरील नदीचा पूल वाहून गेला. हा पूल गुगामल वन्यजीव अंतर्गत चौराकुंड व्याघ्र प्रकल्पाच्या अति दुर्गम जंगलात असल्यामुळे माहिती मिळू शकली नाही. भवर नदीवरील पुलाच्या कडा तुटल्याने दुचाकीचीच वाहतूक होत आहे.या गावांचा तुटला संपर्कदिया गावाजवळच्या सिपना नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने उकुपाटी, निरगुडी, धारणमहू, केकदाबोड, चटवाबोड, भोंडीलावा, बैरागड, खामदा, खोकमार, हरदा या गावांचा संपर्क तुटला. उतावली गावाजवळून वाहणाऱ्या सिपना नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने पोहरा, हदोर्ली, चाकरदा, कारादा, पाटिया, आठनादा या गावांचा संपर्क तुटलेला आहे . गडगा नदी ओसंडून वाहत असल्यामुळे रोहणीखेडा येथील पूल पाण्याखाली आला. परिणामी रोहिणीखेडा, बोबदो, दाबिदा, खारी, अंबाडी, नागोठणा, झिल्पी, साद्रावाडी, सुसर्दा, सावलीखेडा, राणीगाव आदी ४० गावांचा संपर्क तुटला. चिखली रस्त्यावर सिपना नदीवरील पूल पाण्याखाली आल्याने चिखली,कारा,नांदुरी, कोट, तारूबांदा, आढाव ही संपर्काबाहेर आहेत. 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर