शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल, खिडक्यांवर ‘नो-रूम’

By admin | Updated: March 29, 2017 00:07 IST

लग्नप्रसंगांची धूम, शाळा- महाविद्यालयांच्या सुट्या यामुळे मे अखेरपर्यंत रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल आहेत.

अमरावती : लग्नप्रसंगांची धूम, शाळा- महाविद्यालयांच्या सुट्या यामुळे मे अखेरपर्यंत रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल आहेत. आरक्षण खिडक्यांवर लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी ‘नो-रूम’ असे फलक झळकत आहेत. त्यामुळे रेल्वेने प्रवास कसा करावा, ही विवंचना प्रवाशांना भेडसावत आहे. दरवर्षी मार्च ते मे हे तीन महिने रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल असतात. यंदाही हीच परिस्थिती असून मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, चैन्नई, बंगळुरू व कोलकाता मार्गे ये-जा करणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये आरक्षण मिळणे दुरापास्त झाले आहे. विशेषत: मुंबईकडे ये-जा करण्यासाठी भरपूर गाड्या असल्या तरी अमरावती-मुंबई एक्सप्रेस सतत हाऊसफुल्ल धावत असल्याचे दिसून येते. मुंबईमार्गे हावडा-कोलकाता मेल, गीतांजली, शालीमार एक्सप्रेस तर हावडा-पुणे ज्ञानेश्वरी डिलक्स एक्सप्रेस या गाड्या दरदिवशी धावतात. परंतु रेल्वे गाड्यांमधील गर्दी ओसरण्याचे नाव घेत नाही. दहावीच्या परीक्षा आटोपताच मंगळवारपासून अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकावर गर्दी वाढल्याचे दिसून आले. मुंबई एक्सप्रेसमध्ये ६५० च्यावर ‘वेटिंग लिस्ट’ असल्याने मुंबईमार्गे प्रवास कसा करावा, ही चिंता नागरिकांना सतावू लागली आहे. दोन महिने ‘वेटिंग’अमरावती : अमरावती- मुंबई एक्सप्रेस, गोंदिया-मुंबई विदर्भ एक्सप्रेस, हावडा-मुंबई मेलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. विशेषत: मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई मार्गे ये-जा करण्यासाठी प्रवाशांकडून आरक्षणाची मागणी असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. भुसावळ-निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेसमध्येही मे महिन्यापर्यंत आरक्षण उपलब्ध नाही. एप्रिल व मे महिन्यात लग्नतारखा असल्याने अनेकांना रेल्वेऐवजी खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करण्याचे नियोजन करावे लागत आहे. मात्र ट्रॅव्हल्स संचालकांकडून तिकिटाचे अव्वाच्या सव्वा दर आकारले जात असल्याने प्रवाशांची लूट सुरु झाली आहे. खासगी बस संचालकांकडून पुणे प्रवासाचे दर मागील काही दिवसांपासून दुप्पट झाल्याची माहिती आहे. एप्रिल व मे हे दोन महिने ट्रॅव्हल्स संचालकांसाठी सुगीचे ठरणारे आहेत. काही दलालांनी रेल्वे गाड्यांचे आगाऊ आरक्षण करून ठेवले असून या तिकिटांची चढ्या दराने विक्री केली जात आहे.मुंबई-दिल्ली-हावडा मार्गे ये- जा करणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये एप्रिल व मे महिन्यात आरक्षण मिळणे कठीण आहे. दहावीची परीक्षा आटोपल्याने गाड्यांमध्ये गर्दी वाढली आहे. ही परिस्थिती १५ जूनपर्यंत कायम राहिल.- डी.व्ही. धकाते, आरक्षण पर्यवेक्षक, अमरावती.