शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

रघुवीरच्या लाडूत काच एफडीएत जोरदार घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:24 IST

रघुवीर मिठाईयामधून विकत घेतलेल्या मोतीचूर लाडूत चक्क काचेचा तुकडा आढळल्याने एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देखळबळ : जिल्हाधिकारी, पोलीस, अन्न प्रशासनात तक्रारी

आॅनलाईन लोकमतअमरावती : रघुवीर मिठाईयामधून विकत घेतलेल्या मोतीचूर लाडूत चक्क काचेचा तुकडा आढळल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी रघुवीर मिठाई संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी सदर ग्राहकाने एफडीएकडे सोमवारी तक्रार दिली. रघुवीरच्या संचालकाला अटक करण्याची मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली.सतीश विठ्ठलराव देशमुख यांनी २५ नोव्हेंबर रोजी श्याम चौकातील रघुवीर मिठाईया प्रतिष्ठानातून दीड किलो बुंदीचे मोतीचूर लाडू विकत घेतले. अंबादेवी मंदिरात जाऊन पूजा केली असता सतीश देशमुख यांच्या पत्नी प्रमिला देशमुख यांनी लाडू खाल्ला तेव्हा त्यांना काचेचा तुकडा आढळला. यानंतर देशमुख दाम्पत्यांनी सिटी कोतवाली ठाणे गाठून याबाबत रितसर तक्रार दिली. सदर प्रकरण अन्न व प्रशासन विभागाशी संबंधित असल्याने देशमुख व त्यांच्या मित्रांनी सोमवारी एफडीएचे सह. आयुक्त सुरेश अन्नपुरे व सहायक आयुक्त सचिन केदारे यांच्याकडे प्रकरण सादर केले. लाडुत काचेचा तुकडा निघाल्याप्रकरणी त्यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली. परंतु अन्न सुरक्षा मानदे कायद्यानुसार प्रथम रघुवीरच्या प्रतिष्ठानाची तपासणी केली जाईल. यानंतर त्यांना सुधारणा नोटीस बजावण्यात येईल, असे सह आयुक्तांनी शिष्टमंडळाला सांगितले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी एफडीए कार्यालयाबाहेर प्रचंड घोषणाबाजी केली. यानंतर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदन देण्यात आले.जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढ्यात ‘रघुवीर’चा प्रताप मांडताना आंतरराष्ट्रीय मानवाधिकारच्या पदाधिकाऱ्यांनी सदर घटनेचा निषेध केला. दरम्यान रघुवीर संचालकांनी सुद्धा सतीश देशमुख यांच्याविरुद्ध राजापेठ पोलिसात तक्रार नोंदविली आहे.यापूर्वी कचोरीत आढळली होती अळीरघुवीर प्रतिष्ठानात यापूर्वीही कचोरीत तळलेली अळी आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणात यापूर्वीही एफडीएने रघुवीर प्रतिष्ठानाला नोटीस बजावली होती. आता लाडूत काचेचा तुकडा आढळल्याने एफडीए काय कारवाई करते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.यासंबंधाने मी गंभीर नोंद घेतली आहे. जातीने लक्ष देतो. दोषी आढल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही.- अभिजित बांगर, जिल्हाधिकारी, अमरावतीतक्रारीनंतर काचेचा तुकडा मागविला. तो साखरेचा गडाही असू शकतो. त्यांनी आम्हाला तो काच दाखविला नाही.चंद्रकांत पोपट,संचालक रघुवीर प्रतिष्ठान