शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

रघुवीरच्या लाडूत काच एफडीएत जोरदार घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:24 IST

रघुवीर मिठाईयामधून विकत घेतलेल्या मोतीचूर लाडूत चक्क काचेचा तुकडा आढळल्याने एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देखळबळ : जिल्हाधिकारी, पोलीस, अन्न प्रशासनात तक्रारी

आॅनलाईन लोकमतअमरावती : रघुवीर मिठाईयामधून विकत घेतलेल्या मोतीचूर लाडूत चक्क काचेचा तुकडा आढळल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी रघुवीर मिठाई संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी सदर ग्राहकाने एफडीएकडे सोमवारी तक्रार दिली. रघुवीरच्या संचालकाला अटक करण्याची मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली.सतीश विठ्ठलराव देशमुख यांनी २५ नोव्हेंबर रोजी श्याम चौकातील रघुवीर मिठाईया प्रतिष्ठानातून दीड किलो बुंदीचे मोतीचूर लाडू विकत घेतले. अंबादेवी मंदिरात जाऊन पूजा केली असता सतीश देशमुख यांच्या पत्नी प्रमिला देशमुख यांनी लाडू खाल्ला तेव्हा त्यांना काचेचा तुकडा आढळला. यानंतर देशमुख दाम्पत्यांनी सिटी कोतवाली ठाणे गाठून याबाबत रितसर तक्रार दिली. सदर प्रकरण अन्न व प्रशासन विभागाशी संबंधित असल्याने देशमुख व त्यांच्या मित्रांनी सोमवारी एफडीएचे सह. आयुक्त सुरेश अन्नपुरे व सहायक आयुक्त सचिन केदारे यांच्याकडे प्रकरण सादर केले. लाडुत काचेचा तुकडा निघाल्याप्रकरणी त्यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली. परंतु अन्न सुरक्षा मानदे कायद्यानुसार प्रथम रघुवीरच्या प्रतिष्ठानाची तपासणी केली जाईल. यानंतर त्यांना सुधारणा नोटीस बजावण्यात येईल, असे सह आयुक्तांनी शिष्टमंडळाला सांगितले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी एफडीए कार्यालयाबाहेर प्रचंड घोषणाबाजी केली. यानंतर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदन देण्यात आले.जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढ्यात ‘रघुवीर’चा प्रताप मांडताना आंतरराष्ट्रीय मानवाधिकारच्या पदाधिकाऱ्यांनी सदर घटनेचा निषेध केला. दरम्यान रघुवीर संचालकांनी सुद्धा सतीश देशमुख यांच्याविरुद्ध राजापेठ पोलिसात तक्रार नोंदविली आहे.यापूर्वी कचोरीत आढळली होती अळीरघुवीर प्रतिष्ठानात यापूर्वीही कचोरीत तळलेली अळी आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणात यापूर्वीही एफडीएने रघुवीर प्रतिष्ठानाला नोटीस बजावली होती. आता लाडूत काचेचा तुकडा आढळल्याने एफडीए काय कारवाई करते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.यासंबंधाने मी गंभीर नोंद घेतली आहे. जातीने लक्ष देतो. दोषी आढल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही.- अभिजित बांगर, जिल्हाधिकारी, अमरावतीतक्रारीनंतर काचेचा तुकडा मागविला. तो साखरेचा गडाही असू शकतो. त्यांनी आम्हाला तो काच दाखविला नाही.चंद्रकांत पोपट,संचालक रघुवीर प्रतिष्ठान