शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

रघुवीरचे दर सर्वाधिक, तरीही ‘सेल्फ सर्व्हिस’

By admin | Updated: September 19, 2016 00:10 IST

रघुवीर प्रतिष्ठानामध्ये कचोरीत आढळलेल्या अळीने तेथील खाद्यान्न खात्रीदायक नसल्याचे स्पष्ट झाले आहे;...

पाण्यासाठी उष्टे ग्लास : ग्राहक हक्क संरक्षण कायद्याचे दररोज उल्लंघनअमरावती : रघुवीर प्रतिष्ठानामध्ये कचोरीत आढळलेल्या अळीने तेथील खाद्यान्न खात्रीदायक नसल्याचे स्पष्ट झाले आहे; तथापि सर्वाधिक दर आकारूनही या प्रतिष्ठानात ग्राहकांना समाधानकारक सेवा पुरविली जात नाही. योग्य व समाधानकारक सेवा हा ग्राहक हक्क व संंरक्षण कायद्यानुसार ग्राहकांचा हक्क आहे. मात्र, ग्राहकांसाठी असलेल्या या कायद्याचे 'रघुवीर'कडून सातत्याने उल्लंघन होत आहे. खाद्यपदार्थांच्या विक्रीचा थेट संबंध ग्राहकांच्या आरोग्याशी निगडित आहे. खाद्यान्न विक्रेत्यांवर विश्वास ठेवूनच ग्राहक हे पदार्थ खरेदी करतात. मात्र, प्रतिष्ठित रघुवीरच्या कचोरीत आढळलेली अळी ग्राहकांच्या त्या विश्वासाला तडा देणारी ठरली आहे. तसेच ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणारी आहे. बुधवारा येथील बंडू बाबरेकर यांनी रघुवीरमधून कचोरी घेतली आणि त्या कचोरीत अळी आढळून आली. त्यांनी आल्या पावली परत फिरून रघुवीरच्या संबंधित कर्मचाऱ्याला अळी असलेली कचोरी दाखविली. त्याने लागलीच कचोरी ताब्यात घेतली. चुकीची कबुली दिली. मात्र, त्यांना पैसे परत केले नाहीत किंवा त्या मोबदल्यात दुसरा नाश्ता देण्याचे सौजन्यदेखील दाखविले नाही. ग्राहक हक्क व संरक्षण कायद्यात ग्राहकांना योग्य सेवा पुरविणे, व्यावसायिकांना बंधनकारक आहे. ग्राहकांना वस्तू किंवा खाद्यान्न विक्री करताना ग्राहकांचे समाधान होणे, ग्राहकांशी योग्य व्यवहार व वागणूक देणे या बाबी कायद्यात नमूद आहेत. मात्र, रघुवीरमधून कचोरी विकत घेणाऱ्या ग्राहकाचे समाधान तर झाले नाहीच. उलट त्याचे पैसे सुद्धा परत देण्यात आले नाहीत. ही बाब ग्राहक संरक्षण कायद्याचे उल्लंघन करणारीच आहे. दर्जेदार नाश्त्याचा दावा करणाऱ्या ‘रघुवीर’मध्ये समाधान होत नसल्याचा अनुभव आलेल्या अनेकांनी त्यांचे अनुभव मुद्दामच 'लोकमत'शी शेअर केलेत. यात डॉक्टर्स, अधिकारी, सामान्य नागरिक आणि महिलांचा समावेश आहे. ग्राहक शेकडो, पाणी पिण्यासाठी ग्लास दोनरघुवीरमध्ये ग्राहकांसाठी जेथे पाण्याची सोय करण्यात आली, तेथे एक किंवा दोन ग्लास पाणी पिण्यासाठी ठेवण्यात येतात. दररोज शेकडो ग्राहक या दोनच प्याल्यांनी पाणी पितात. ग्राहकांना त्यातून आजार संक्रमित होतो. रघुवीरमध्ये जाणारी कुणीही व्यक्ती त्यांच्या स्वत:च्या घरी कुण्या दुसऱ्या व्यक्तीने उष्टा केलेल्या प्याल्याने पाणी पीत नसतीलच; तथापि रघुवीरमध्ये मात्र अवघ्या अमरावतीत सर्वाधिक दर देऊन बहुतांश ग्राहक हक्क विसरून उष्ट्या प्याल्याने पाणी पितात. फार फार तर प्याला विसळून घेतात. जे प्याले ग्राहकांसाठी ठेवले जातात, त्याच प्याल्यांनी रघुवीरचे मालक पाणी का पीत नाहीत? जे स्वत:ला चालत नाही, ते इतरांना पैसे आकारूनही का दिले जाते? ग्राहक हक्क व संरक्षण कायद्यानुसार व्यापाऱ्यांनी ग्राहकांना समाधानकारक सेवा पुरविणे व योग्य वागणूक देऊन त्यांच्याशी सौजन्यपूर्ण व्यवहार करणे बंधनकारक आहे. रघुवीरमध्ये स्वयंसेवा आहे आणि ग्राहकांना योग्य सुविधा, वागणूक नसणे ही बाब कायद्याचे उल्लघंन करणारी आहे.- अजय गाडे, जिल्हा संघटक मंंत्री, अ.भा. ग्राहक पंचायत