शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

रघुवीरचे दर सर्वाधिक, तरीही ‘सेल्फ सर्व्हिस’

By admin | Updated: September 19, 2016 00:10 IST

रघुवीर प्रतिष्ठानामध्ये कचोरीत आढळलेल्या अळीने तेथील खाद्यान्न खात्रीदायक नसल्याचे स्पष्ट झाले आहे;...

पाण्यासाठी उष्टे ग्लास : ग्राहक हक्क संरक्षण कायद्याचे दररोज उल्लंघनअमरावती : रघुवीर प्रतिष्ठानामध्ये कचोरीत आढळलेल्या अळीने तेथील खाद्यान्न खात्रीदायक नसल्याचे स्पष्ट झाले आहे; तथापि सर्वाधिक दर आकारूनही या प्रतिष्ठानात ग्राहकांना समाधानकारक सेवा पुरविली जात नाही. योग्य व समाधानकारक सेवा हा ग्राहक हक्क व संंरक्षण कायद्यानुसार ग्राहकांचा हक्क आहे. मात्र, ग्राहकांसाठी असलेल्या या कायद्याचे 'रघुवीर'कडून सातत्याने उल्लंघन होत आहे. खाद्यपदार्थांच्या विक्रीचा थेट संबंध ग्राहकांच्या आरोग्याशी निगडित आहे. खाद्यान्न विक्रेत्यांवर विश्वास ठेवूनच ग्राहक हे पदार्थ खरेदी करतात. मात्र, प्रतिष्ठित रघुवीरच्या कचोरीत आढळलेली अळी ग्राहकांच्या त्या विश्वासाला तडा देणारी ठरली आहे. तसेच ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणारी आहे. बुधवारा येथील बंडू बाबरेकर यांनी रघुवीरमधून कचोरी घेतली आणि त्या कचोरीत अळी आढळून आली. त्यांनी आल्या पावली परत फिरून रघुवीरच्या संबंधित कर्मचाऱ्याला अळी असलेली कचोरी दाखविली. त्याने लागलीच कचोरी ताब्यात घेतली. चुकीची कबुली दिली. मात्र, त्यांना पैसे परत केले नाहीत किंवा त्या मोबदल्यात दुसरा नाश्ता देण्याचे सौजन्यदेखील दाखविले नाही. ग्राहक हक्क व संरक्षण कायद्यात ग्राहकांना योग्य सेवा पुरविणे, व्यावसायिकांना बंधनकारक आहे. ग्राहकांना वस्तू किंवा खाद्यान्न विक्री करताना ग्राहकांचे समाधान होणे, ग्राहकांशी योग्य व्यवहार व वागणूक देणे या बाबी कायद्यात नमूद आहेत. मात्र, रघुवीरमधून कचोरी विकत घेणाऱ्या ग्राहकाचे समाधान तर झाले नाहीच. उलट त्याचे पैसे सुद्धा परत देण्यात आले नाहीत. ही बाब ग्राहक संरक्षण कायद्याचे उल्लंघन करणारीच आहे. दर्जेदार नाश्त्याचा दावा करणाऱ्या ‘रघुवीर’मध्ये समाधान होत नसल्याचा अनुभव आलेल्या अनेकांनी त्यांचे अनुभव मुद्दामच 'लोकमत'शी शेअर केलेत. यात डॉक्टर्स, अधिकारी, सामान्य नागरिक आणि महिलांचा समावेश आहे. ग्राहक शेकडो, पाणी पिण्यासाठी ग्लास दोनरघुवीरमध्ये ग्राहकांसाठी जेथे पाण्याची सोय करण्यात आली, तेथे एक किंवा दोन ग्लास पाणी पिण्यासाठी ठेवण्यात येतात. दररोज शेकडो ग्राहक या दोनच प्याल्यांनी पाणी पितात. ग्राहकांना त्यातून आजार संक्रमित होतो. रघुवीरमध्ये जाणारी कुणीही व्यक्ती त्यांच्या स्वत:च्या घरी कुण्या दुसऱ्या व्यक्तीने उष्टा केलेल्या प्याल्याने पाणी पीत नसतीलच; तथापि रघुवीरमध्ये मात्र अवघ्या अमरावतीत सर्वाधिक दर देऊन बहुतांश ग्राहक हक्क विसरून उष्ट्या प्याल्याने पाणी पितात. फार फार तर प्याला विसळून घेतात. जे प्याले ग्राहकांसाठी ठेवले जातात, त्याच प्याल्यांनी रघुवीरचे मालक पाणी का पीत नाहीत? जे स्वत:ला चालत नाही, ते इतरांना पैसे आकारूनही का दिले जाते? ग्राहक हक्क व संरक्षण कायद्यानुसार व्यापाऱ्यांनी ग्राहकांना समाधानकारक सेवा पुरविणे व योग्य वागणूक देऊन त्यांच्याशी सौजन्यपूर्ण व्यवहार करणे बंधनकारक आहे. रघुवीरमध्ये स्वयंसेवा आहे आणि ग्राहकांना योग्य सुविधा, वागणूक नसणे ही बाब कायद्याचे उल्लघंन करणारी आहे.- अजय गाडे, जिल्हा संघटक मंंत्री, अ.भा. ग्राहक पंचायत