शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

रेबीजचा संशय, दोरखंडाने बांधले हातपाय

By admin | Updated: April 3, 2017 00:03 IST

रेबीजचा संशयित रुग्ण आक्रमक अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

पोलीस आयुक्तांच्या बंगल्यासमोरील घटना : चौकीदाराला नागपूरला हलविलेअमरावती : रेबीजचा संशयित रुग्ण आक्रमक अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणाजवळील रहिवासी राजेंद्र जाधव यांच्या बंगल्यावरील तो चौकीदार असून त्याला चवताळलेल्या अवस्थेत इर्विनच्या डॉक्टरांनी नागपूरला हलविले. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या बंगल्यासमोरच राहणारे राजेंद्र जाधव यांनी घराची देखरेख करण्यासाठी चौकीदार विनोद भारती (४५, रा.गगलानीनगर) यांची नेमणूक केली होती. मात्र, त्यांची रविवारी दुपारी अचानक प्रकृती अचानक बिघडली आणि ते चवताळत होते. जाधव यांच्या बंगल्यावर काही वर्षांपूर्वी जो चौकीदार होता त्याने एक श्वान पाळला होता. ते काही महिन्यांपूर्वी काम सोडून गेले. मात्र, श्वान जाधव यांच्या बंगल्यावरच होता. त्यानंतर चौकीदार विनोद भारती यांच्याकडे बंगल्याच्या सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र, दरम्यान तो श्वान विनोद भारती यांना चावला. त्यामुळे त्यांनी इर्विन रुग्णालयात उपचार घेतला. मात्र, त्यानंतरही विनोद भारती यांना तो श्वान चार वेळा चावल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी विनोद भारती हे चवताळलेल्या अवस्थेत बंगल्यावर आढळले. ते श्वानप्रमाणे वर्तणूक करीत होते. आरडाओरड, धावपळ करीत होते. हा प्रकार तेथून जाणाऱ्या सीआर व्हॅन पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यांनी बंगल्याची पाहणी केली असता विनोद भारती हे चवताळलेल्या अवस्थेत आढळून आले. रेबीजची अशी आहेत लक्षणेरेबीज हा आजार विषाणूजन्य असून त्याला हायड्रोफोबिया सुध्दा म्हणतात. रेबीजबाधीत श्वानाच्या संपर्कात आल्यावर त्याच्या लाळेपासून तो आजार मनुष्यापर्यंत पोहचतो. रेबीज हा आजार मनुष्यासह प्राण्यालाही होऊ शकतो. रेबीजचा बाधीत रुग्ण पाण्याला भितो. रेबीजबाधीत रुग्णांच्या मानेचे स्नायू आंकु चन पावतात तसेच ते पॅरेलाईज होतात. अशाप्रसंगी पाणी पिण्याची इच्छा असली तरी तो रुग्ण पाणी पिऊ शकत नाही. गळ्यातून पाणी खाली उतरत नाही. या स्थिती रुग्णाची मानसिक संतुलन बिघडते आणि तो आक्रमक व चवताळल्यासारखा होतो. श्वानाप्रमाणे तो भुंकताना आढळून येतो, लाळ गाळतो, सैरावैरा पळतो, आरडाओरड करून कशालाही चावा घेण्याचा प्रयत्न करतो, अशी लक्षणे आढळून येतात. रेबीजचा संशयित रुग्णाला इर्विन रुग्णालयात आणले होते. त्याची वतर्णूक श्वानाप्रमाणेच होती. यापूर्वी त्या रुग्णाला पाच ते सहा श्वान चावला आहे. त्याच्यावर उपचार सुरुच होता. मात्र,आता त्या रुग्णाची गंभीर स्थिती बघता नागपूरला हलविण्यात आले आहे. - उज्वला मोहोड, वैद्यकीय अधिकारी. रॅबीजबाधित रुग्णाच्या मानेचे स्नायू पॅरालाईज होत असल्यामुळे तो पाण्याला घाबरतो, पाणी पिण्याची इच्छा असली, तरी तो पाणी पिऊ शकत नाही. अशा स्थितीत मानसिक संतुलन बिघडून त्याचा मेंदूवरील ताबा सुटतो. या विषाणुजन्य आजारावर अ‍ॅन्टीरेबीज औषधी उपलब्ध नाहीत. - एस.एस.गावंडे, पशुशल्य चिकित्सक, महापालिका